शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

जिल्हा परिषदेत ५२ सदस्य नवखे !

By admin | Updated: February 25, 2017 00:29 IST

बीड जिल्हा परिषदेच्या नवनिर्र्वाचित पदाधिकाऱ्यांत ५२ सदस्य नवखे असून ते पहिल्यांदाच राजकारणाचे धडे गिरवणार आहेत.

संजय तिपाले  बीडजिल्हा परिषदेच्या नवनिर्र्वाचित पदाधिकाऱ्यांत ५२ सदस्य नवखे असून ते पहिल्यांदाच राजकारणाचे धडे गिरवणार आहेत. सोबतच ८ जुन्या पदाधिकाऱ्यांना सदस्यपद कायम ठेवण्यात यश आले. आता सभापतीपदी नव्या-जुन्यांपैकी कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे आता उत्कंठावर्धक ठरत आहे.६० सदस्यांच्या बीड जिल्हा परिषदेच्या सभागृहाने आतापर्यत दीड डझन नेते घडविले आहेत. जि.प. मधून राजकीय ‘श्रीगणेशा’ केलेल्या या सर्वांनी पुढे लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद गाठली. त्यामुळे राजकीयदृष्ट्या या सभागृहास विशेष महत्त्व आहे. पाच वर्षांपूर्वी जि.प. चे एकूण संख्याबळ ५९ होते. यावेळी मतदारसंघ पुनर्रचनेनंतर त्यात एकाची भर पडली आहे. नवीन ६० पैकी ८ सदस्यांच्या गाठीशी अनुभवाची शिदोरी आहे. राकॉचे विजयसिंह पंडित, बजरंग सोनवणे, अनूसया सोळंके, सेनेचे युद्धजित पंडित, काकू- नाना आघाडीचे संदीप क्षीरसागर, शिवसंग्रामच्या जयश्री मस्के, काँग्रेसच्या आशा दौंड, भाजपच्या सविता गोल्हार यांचा यात समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे पाच वर्षांच्या कार्यकाळात यापैकी जयश्री मस्के व सविता गोल्हार वगळता इतर सहा जण ‘किंगपोस्ट’ राहिलेले आहेत. विजयसिंह पंडित यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली तर आशा दौंड यांना उपाध्यक्षपदाचा मान मिळाला. संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, युद्धजित पंडित, अनूसया सोळंके यांनी सभापतीपदे भूषविली. हे सर्व पदाधिकारी आता नव्या ५२ सदस्यांना मार्गदर्शक ठरू शकतात.सोळंके अन् जिल्हा परिषदपूर्वापार नाते मिनी मंत्रालय व सोळंके घराण्याचे पिढ्यान्पिढ्यांचे नाते आहे. माजी उपमुख्यमंत्री स्व. सुंदरराव सोळंके १९६० च्या दशकामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांचे पुत्र प्रकाश सोळंके हे देखील जि. प. मध्ये अपक्ष निवडून गेले होते. नंतर ते आमदार, मंत्री पदावर गेले. धैर्यशील सोळंके यांनी सभापतीपद भूषविलेले आहे. आता सोळंके कुटुंबातील दोन सदस्य जि.प. त पोहचले आहेत. मंगल प्रकाश सोळंके व जयसिंह सोळंके यांनी विक्रमी मतांसह विजयश्री खेचून आणली. जयसिंह यांच्या रूपाने सोळंके घराण्यातील तिसरी पिढी जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाली.