शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

अभियांत्रिकीच्या ५० हजार जागा शिल्लक

By admin | Updated: August 12, 2014 02:01 IST

औरंगाबाद : अभियांत्रिकी शिक्षणाच्या ग्लॅमरला उतरती कळा लागल्याचे प्रवेशाअभावी शिल्लक राहिलेल्या जागांवरून स्पष्ट होते.

औरंगाबाद : अभियांत्रिकी शिक्षणाच्या ग्लॅमरला उतरती कळा लागल्याचे प्रवेशाअभावी शिल्लक राहिलेल्या जागांवरून स्पष्ट होते. यंदा समुपदेशनच्या फेरीअखेर राज्यात ६१ हजार अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या जागा शिल्लक राहिल्या असून, सध्या महाविद्यालये आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांना प्रवेश देत आहेत. त्यानंतरही सुमारे ५० हजार जागा यंदा शिल्लक राहण्याची शक्यता तंत्रशिक्षण विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. राज्यात अभियांत्रिकीचे शिक्षण देणाऱ्या शासकीय व खाजगी, अशा ३६५ संस्था असून, दीड लाख विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. यासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) तीन फेऱ्यांच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आले. तिसरी फेरी ही समुपदेशन प्रक्रियेची होती. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर, पुणे व मुंबई या सहा ठिकाणी समुपदेशन प्रवेश प्रक्रिया राबविली. त्यानंतरही ६१ हजार जागा शिल्लक राहिल्या. आता महाविद्यालयीन स्तरावर शिल्लक जागांवर प्रवेश देण्यात येत आहेत. असे असले तरी यंदा सुमारे ५० हजार जागा प्रवेशाअभावी शिल्लक राहण्याची शक्यता आहे. मागील दहा वर्षांमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाला मोठे ग्लॅमर आले होते. त्यामुळे राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांचे पेव फुटले होते. अलीकडे अभियांत्रिकीची पदवी घेतलेले हजारो विद्यार्थी बेरोजगार असून, अनेक जण किरकोळ पगारावर खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी करीत आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षणाकडे असलेला कल कमी झाला आहे.