शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

५० टक्के बसचे ब्रेक कॅचर जुनाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:07 IST

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद आगारातील बसेसची अत्यंत दुरवस्था झाली असून, ५० टक्के बसेसचे ब्रेक कॅचर जुनाट झाल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. हा प्रश्न तात्काळ सोडविण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने निवेदनाद्वारे विभाग नियंत्रकांकडे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद आगारातील बसेसची अत्यंत दुरवस्था झाली असून, ५० टक्के बसेसचे ब्रेक कॅचर जुनाट झाल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. हा प्रश्न तात्काळ सोडविण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने निवेदनाद्वारे विभाग नियंत्रकांकडे केली आहे.‘एसटी’च्या चाकामध्ये ब्रेक लागण्याच्या दृष्टीने ‘कॅचर’ नावाचा महत्त्वाचा भाग (पार्ट) असतो. गेल्या काही दिवसांत अनेक बसगाड्यांचे ब्रेक कॅचर जुने झाल्याने योग्य काम करीत नसल्याच्या तक्रारी कर्मचा-यांतून होत आहेत; परंतु तरीही ब्रेकची कामे व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याची ओरड होत आहे. २१ आॅक्टोबर रोजी ब्रेक नादुरुस्त असताना बस पुण्याला पाठविण्याचा प्रकार झाला होता.चिकलठाणा विमानतळासमोर औरंगाबाद-अकोला बसचे ब्रेक नादुरुस्तीची घटना घडली, तर विभागीय कार्यशाळेत काम करून आलेल्या बसचे औरंगाबाद-पैठण मार्गावर ब्रेक कॅचर निघाले. दोन्ही घटनांच्या वेळी चालकांचे प्रसंगावधान राखून बस नियंत्रण राखले. बसच्या देखभाल-दुरुस्तीचे काम योग्य होत नसल्याने हा प्रकार होत आहे. दुरुस्तीसाठी साहित्य नसेल तर अशा एसटी बस बाजूला ठेवल्या पाहिजेत,अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे संघटक सुरेश जाधव यांनी केली.