शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

५० कोटीच्या निधीस कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:47 IST

राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी व इतर प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासाठी लागणाºया निधीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीला कात्री लावण्यात आली असून ३० टक्के निधी परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ या आदेशान्वये नांदेड जिल्हा नियोजन समितीलाही जवळपास पन्नास कोटी रुपये राज्य शासनाकडे परत करावे लागणार आहेत.

अनुराग पोवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी व इतर प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासाठी लागणाºया निधीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीला कात्री लावण्यात आली असून ३० टक्के निधी परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ या आदेशान्वये नांदेड जिल्हा नियोजन समितीलाही जवळपास पन्नास कोटी रुपये राज्य शासनाकडे परत करावे लागणार आहेत.नांदेड जिल्हा नियोजन समितीचा २०१७-१८ चा वार्षिक आराखडा २३५ कोटी रुपयांचा आहे. यामध्ये १९४ कोटी महसूल योजनांसाठी तर ४१ कोटी रुपये भांडवली योजनांसाठी खर्च करणे अपेक्षित होते. मात्र शासनाने काढलेल्या कपातीच्या आदेशानंतर जिल्हा नियोजन समितीला महसुली योजनेतील ४१ कोटी ८३ लाख तर भांडवली योजनेतील ८ कोटी २३ लाख रुपये शासनाकडे परत करावे लागणार आहेत. भांडवली योजनेतून बांधकाम, रस्ते आदी विकासाच्या योजना राबवल्या जातात तर इतर योजना या महसुली योजनेअंतर्गत राबविल्या जातात. जिल्ह्याला महसूल योजनेसाठी प्राप्त झालेल्या १९४ कोटी रुपयापैकी ५४.५० कोटींच्या योजना या केंद्र पुरस्कृत योजना असतात. राज्य शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेच्या निधीमध्ये कोणतीही कपात न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या केंद्र पुरस्कृत योजनेच्या ५४ कोटी ५० लाख रुपयामधून कोणतीही कपात होणार नसल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात यांनी सांगितले.जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्यातून विविध योजनांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. शासनाकडून बीडीएसवर निधी प्राप्त झाला आहे. या प्राप्त निधीतून नांदेड जिल्हा नियोजन समितीने सहा योजनांचा १०० टक्के निधी वितरीत केला आहे. त्यामुळे या निधीचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नांदेड जिल्हा नियोजन समितीने शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे. या सहा योजना वगळता इतर योजनातील ३० टक्के निधी शासनाकडे समर्पित करण्यास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीचे ५० कोटी रुपये शासनाला परत करावे लागणार असल्याने प्रस्तावित विकास कामांचा खोळंबा होणार आहे.