शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

५० कोटीच्या निधीस कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:47 IST

राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी व इतर प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासाठी लागणाºया निधीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीला कात्री लावण्यात आली असून ३० टक्के निधी परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ या आदेशान्वये नांदेड जिल्हा नियोजन समितीलाही जवळपास पन्नास कोटी रुपये राज्य शासनाकडे परत करावे लागणार आहेत.

अनुराग पोवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी व इतर प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासाठी लागणाºया निधीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीला कात्री लावण्यात आली असून ३० टक्के निधी परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ या आदेशान्वये नांदेड जिल्हा नियोजन समितीलाही जवळपास पन्नास कोटी रुपये राज्य शासनाकडे परत करावे लागणार आहेत.नांदेड जिल्हा नियोजन समितीचा २०१७-१८ चा वार्षिक आराखडा २३५ कोटी रुपयांचा आहे. यामध्ये १९४ कोटी महसूल योजनांसाठी तर ४१ कोटी रुपये भांडवली योजनांसाठी खर्च करणे अपेक्षित होते. मात्र शासनाने काढलेल्या कपातीच्या आदेशानंतर जिल्हा नियोजन समितीला महसुली योजनेतील ४१ कोटी ८३ लाख तर भांडवली योजनेतील ८ कोटी २३ लाख रुपये शासनाकडे परत करावे लागणार आहेत. भांडवली योजनेतून बांधकाम, रस्ते आदी विकासाच्या योजना राबवल्या जातात तर इतर योजना या महसुली योजनेअंतर्गत राबविल्या जातात. जिल्ह्याला महसूल योजनेसाठी प्राप्त झालेल्या १९४ कोटी रुपयापैकी ५४.५० कोटींच्या योजना या केंद्र पुरस्कृत योजना असतात. राज्य शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेच्या निधीमध्ये कोणतीही कपात न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या केंद्र पुरस्कृत योजनेच्या ५४ कोटी ५० लाख रुपयामधून कोणतीही कपात होणार नसल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात यांनी सांगितले.जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्यातून विविध योजनांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. शासनाकडून बीडीएसवर निधी प्राप्त झाला आहे. या प्राप्त निधीतून नांदेड जिल्हा नियोजन समितीने सहा योजनांचा १०० टक्के निधी वितरीत केला आहे. त्यामुळे या निधीचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नांदेड जिल्हा नियोजन समितीने शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे. या सहा योजना वगळता इतर योजनातील ३० टक्के निधी शासनाकडे समर्पित करण्यास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीचे ५० कोटी रुपये शासनाला परत करावे लागणार असल्याने प्रस्तावित विकास कामांचा खोळंबा होणार आहे.