शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

विधि विद्यापीठाने सोडली करोडीची ५० एकर जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 16:54 IST

कांचनवाडीत बांधकामाची मागितली परवानगी

ठळक मुद्देविद्यापीठ प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले पत्र या जागेवर भौतिक सुविधा विकसित करणे अशक्य

औरंगाबाद : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, औरंगाबादला देण्यात आलेली करोडी भागातील ५० एकर जमीन विद्यापीठ प्रशासनाने राज्य शासनाला परत केली आहे. या जागेवर भौतिक सुविधा विकसित करणे अशक्य असल्यामुळे विद्यापीठाच्या कुलपतींनी नकार दिल्यामुळे ही जमीन परत करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

औरंगाबादेत महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाची घोषणा आघाडी सरकारच्या काळात झाली होती; मात्र याठिकाणी घोषणा झाल्यानंतर नागपूर, मुंबई येथूनही विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी होऊ लागली. शेवटी राज्य शासनाने मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे तीन महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली. यातील मुंबई आणि नागपूर येथील विधि विद्यापीठाचा विकास वेगाने होत आहे. दोन्ही विद्यापीठांना ५० एकर जागा देण्यात आल्या आहेत. औरंगाबादेतील विद्यापीठालाही राज्य शासनाने करोडी भागातील ५० एकर जमीन दिली होती. ही जमीन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. उच्च शिक्षण विभागाने विधि विद्यापीठाला दिली; मात्र तत्कालीन कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश यांनी जागेची पाहणी करीत पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याविषयी चाचपणी केली.

या ठिकाणी जायकवाडी धरणातून पाणी आणणे कठीण आहे, तसेच त्याठिकाणी पाण्याचे स्रोतही नसल्यामुळे या जागेला नकार दिला होता. यानंतर विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीत करोडीची जागा नाकारण्यात आली. याचवेळी कांचनवाडी परिसरातील ९ एकर जागा विधि विद्यापीठाला जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली. याच जागेत विधि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था केलेली आहे. या जमिनीलगत असलेल्या वाल्मी संस्थेकडे विद्यापीठ प्रशासनाने १७ एकर जागा मागितली; मात्र वाल्मी प्रशासनाने जागा हस्तांतरित करण्यास नकार दिला. यामुळे विधि विद्यापीठाच्या जागेचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. यातच विद्यापीठ प्रशासनाने करोडी येथील ५० एकर जागा परत केल्यामुळे कांचनवाडी परिसरातील केवळ ९ एकर जागाच विद्यापीठाकडे राहिली आहे. येत्या काळात जागेचा प्रश्न  सुटण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कांचनवाडीत बांधकामाची मागितली परवानगीविधि विद्यापीठ प्रशासनाने कांचनवाडी परिसरातील ९ एकर जागेतच विद्यापीठाच्या प्रशासकीय, वसतिगृहे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवासाच्या इमारती बांधकामाची परवानगी राज्य शासनाकडे मागितली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात १२ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्तावही दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादState Governmentराज्य सरकार