शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

विधि विद्यापीठाने सोडली करोडीची ५० एकर जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 16:54 IST

कांचनवाडीत बांधकामाची मागितली परवानगी

ठळक मुद्देविद्यापीठ प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले पत्र या जागेवर भौतिक सुविधा विकसित करणे अशक्य

औरंगाबाद : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, औरंगाबादला देण्यात आलेली करोडी भागातील ५० एकर जमीन विद्यापीठ प्रशासनाने राज्य शासनाला परत केली आहे. या जागेवर भौतिक सुविधा विकसित करणे अशक्य असल्यामुळे विद्यापीठाच्या कुलपतींनी नकार दिल्यामुळे ही जमीन परत करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

औरंगाबादेत महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाची घोषणा आघाडी सरकारच्या काळात झाली होती; मात्र याठिकाणी घोषणा झाल्यानंतर नागपूर, मुंबई येथूनही विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी होऊ लागली. शेवटी राज्य शासनाने मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे तीन महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली. यातील मुंबई आणि नागपूर येथील विधि विद्यापीठाचा विकास वेगाने होत आहे. दोन्ही विद्यापीठांना ५० एकर जागा देण्यात आल्या आहेत. औरंगाबादेतील विद्यापीठालाही राज्य शासनाने करोडी भागातील ५० एकर जमीन दिली होती. ही जमीन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. उच्च शिक्षण विभागाने विधि विद्यापीठाला दिली; मात्र तत्कालीन कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश यांनी जागेची पाहणी करीत पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याविषयी चाचपणी केली.

या ठिकाणी जायकवाडी धरणातून पाणी आणणे कठीण आहे, तसेच त्याठिकाणी पाण्याचे स्रोतही नसल्यामुळे या जागेला नकार दिला होता. यानंतर विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीत करोडीची जागा नाकारण्यात आली. याचवेळी कांचनवाडी परिसरातील ९ एकर जागा विधि विद्यापीठाला जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली. याच जागेत विधि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था केलेली आहे. या जमिनीलगत असलेल्या वाल्मी संस्थेकडे विद्यापीठ प्रशासनाने १७ एकर जागा मागितली; मात्र वाल्मी प्रशासनाने जागा हस्तांतरित करण्यास नकार दिला. यामुळे विधि विद्यापीठाच्या जागेचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. यातच विद्यापीठ प्रशासनाने करोडी येथील ५० एकर जागा परत केल्यामुळे कांचनवाडी परिसरातील केवळ ९ एकर जागाच विद्यापीठाकडे राहिली आहे. येत्या काळात जागेचा प्रश्न  सुटण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कांचनवाडीत बांधकामाची मागितली परवानगीविधि विद्यापीठ प्रशासनाने कांचनवाडी परिसरातील ९ एकर जागेतच विद्यापीठाच्या प्रशासकीय, वसतिगृहे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवासाच्या इमारती बांधकामाची परवानगी राज्य शासनाकडे मागितली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात १२ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्तावही दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादState Governmentराज्य सरकार