शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

५ लाख ८२ हजार कुटुंब शेतीवरच

By admin | Updated: May 29, 2014 00:52 IST

रामेश्वर काकडे, नांदेड वाढत्या लोकसंख्येमुळे आता एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत आहे़ त्यात विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आल्यामुळे बहूभूधारक शेतकर्‍यांची संख्या घटत आहे़

रामेश्वर काकडे, नांदेड वाढत्या लोकसंख्येमुळे आता एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत आहे़ त्यात विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आल्यामुळे बहूभूधारक शेतकर्‍यांची संख्या घटत आहे़ आजही जिल्ह्यातील ५ लाख ८२ हजार कुटुंबाची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. असे असताना त्यातील फक्त १०६८ शेतकरी बहूभूधारक असल्याचे समोर आले आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांची संख्या वाढली़ त्यामुळे हिश्श्याला आलेल्या जमिनीच्या तुकड्यावर गुजरान करणे जिकिरीचे झाले़ त्याचा परिणाम म्हणून शेतीवर अवलंबून असलेली कुटुंब जमिनीचा तुकडा विकून व्यवसायासाठी शहराकडे धाव घेत आहेत़ तर काहींनी मध्यम मार्ग काढत शेतीला व्यवसायाची जोड दिली आहे़ शेतकर्‍यांसाठी कायमस्वरुपी जोडव्यवसायाची गरज निसर्गाने कृपा केली तर पिकते, मात्र निसर्गाची अवकृपा झाली तर शेतकर्‍यांना विविध संकटाचा सामना करावा लागतो. यामुळे बँकेकडून घेतलेले कर्जही फेडणे कठीण जाते. परिणामी शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते. यासाठी शासनाने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांसाठी कायमस्वरुपी जोडव्यवसाय तसेच शेतीमध्ये अधिकाधिक उत्पादन कसे काढता येईल, यावर भर देण्यासाठी योजना कार्यान्वित करणे आवश्यक आहे. तरच शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी होतील. १ हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी अत्यल्प भूधारक या वर्गवारीमध्ये येतात. तर १ ते ५ हेक्टर जमीन असलेले शेतकरी अल्पभूधारक तर ५ हेक्टरपेक्षा जास्त जमीन असणारे शेतकरी बहूभूधारक शेतकरी गणले जातात. यामुळे गत काही वर्षात जिल्ह्यातील बहूभूधारक शेतकर्‍यांच्या संख्येत घट झाली. त्या तुलनेत जमिनीच्या क्षेत्रात वाढ झाली नसल्याने अत्यल्पभूधारकांचे प्रमाण वाढले आहे. अल्पभूधारक कुटुंबपद्धती अस्तित्वात लहान कुटुंबामुळे तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे २०१०- या वर्षात केलेल्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या संख्येमध्ये वाढ झाली,परंतु अल्पभूधारकांचे प्रमाण वाढले. दहा वर्षांत ८२ हजार शेतकरीसंख्येत वाढ जिल्ह्यात गत दहा वर्षापूर्वी म्हणजेच २००२-१ मध्ये अत्यल्प भूधारकांची संख्या १ लाख ९४ हजार ६७५ एवढी होती. तर लहान १ लाख ७६ हजार ५३९ तर मध्यम लहान १ लाख २७०४ तर मध्यम शेतकर्‍यांची संख्या २५३३४ तर मोठ्या शेतकर्‍यांची संख्या १०५४ एवढी होती. सर्वसाधारणपणे अत्यल्प शेतकर्‍यांची संख्या १ लाख ९४ हजार ६७५ तर अल्प शेतकर्‍यांची संख्या २ लाख ७४ हजार ५७७ एवढी तर मोठ्या शेतकर्‍यांची संख्या १०५४ अशी ५ लाख ३०६ एवढी होती. दहा वर्षापूर्वी संयुक्त कुटुंबपद्धती मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होती, मात्र आता शिक्षण, नोकरी यामुळे कुटुंबांचे विभक्तीकरण होत आहे. याचा परिणाम संयुक्त कुटुंंबपद्धती बोटावर मोजण्याइतपत कुटुंबांमध्ये आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ५ लाख ८२ हजार २०० शेतकरी कुटुंंबाची संख्या आहे. यामध्ये अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांची संख्या २ लाख ४९ हजार ११२ एवढी आहे. तर लहान २ लाख ११२३२, मध्यम लहान १ लाख २१८ तर मध्यम २०५७० असे मिळून अल्पभूधारक शेतकर्‍यांची संख्या ३ लाख ३२ हजार २० एवढी आहे. तर बहूभूधारक शेतकर्‍यांची संख्या केवळ १०६८ आहे.