शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

५९८ फुकट्या प्रवाशांवर कारवाई

By admin | Updated: July 10, 2017 00:32 IST

नांदेड : दक्षिण - मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणाऱ्या गाड्यांमध्ये धाड टाकून ५९८ विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दक्षिण - मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणाऱ्या गाड्यांमध्ये अचानक धाड टाकून तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली़ यामध्ये ५९८ विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून १ लाख ८९ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला़ तसेच २० विनापरवाना रेल्वेत खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात आली़दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तसेच तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली जाते़ शनिवारी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक श्रीमती नेहा रत्नाकर यांच्या पथकाने नांदेड विभागातून धावणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबविली़ मोहिमेत सहायक वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप कुमार, सहायक वाणिज्य व्यवस्थापक अंजी नायक यांचा समावेश होता़ सदर पथकाने पहाटे ४ वाजतापासून कारवाईस सुरूवात करून एका दिवसात एक लाख ८९ हजार रुपये दंड वसूल करून ५९८ प्रवाशांवर कारवाई केली़ यामध्ये नांदेड - आदिलाबाद, औरंगाबाद, परळी अशा विविध भागात धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये अचानक धाडी टाकण्यात आल्या. कारवाईसाठी बसेस, जीपचा वापर करण्यात आला. धावणाऱ्या रेल्वेमध्ये सेक्शनमध्ये अचानक धाड पडल्याने विनातिकीट प्रवाशांचे धाबे दणाणले. यामध्ये ५९८ विनातिकीट प्रवासी सापडले. तसेच अनियमित प्रवास करणे आणि परवानगीशिवाय जास्त सामान घेवून जाण्यामुळे काही प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यातही काही प्रवाशांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. या विनातिकीट प्रवाशांकडून १ लाख ८९ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत रेल्वे सुरक्षा अधिकारी, ३३ तिकीट तपासणीस, ६ कार्यालयीन कर्मचारी, ५ वाणिज्य निरीक्षक, ३ ट्रॅफिक निरीक्षक, ८ रेल्वे पोलीस फोर्सचे जवान सहभागी होते़ या पथकाने नांदेड विभागातून धावणाऱ्या जवळपास सर्वच गाड्या तपासल्या़ यामध्ये बरेच प्रवासी सीझन तिकीट घेऊन आरक्षित डब्यात बसले होते तसेच दूधवाले जनरल तिकीट घेऊन प्रवास करत होते. त्यांना अशा प्रकारे प्रवास करता येणार नसल्याचे सांगण्यात आले़ तसेच त्यांनी एम.व्ही.एस.टी. तिकीट घेऊनच प्रवास करावा.