शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांत ४८४ आत्महत्या; कारणे अनेक; पण कुटुंबियांची साथ, समुपदेशन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:35 IST

आत्महत्येचे मूळ कारण शेवटी निराशाच असते. बहुतांश प्रकरणात तसेच दिसते.

- योगेश पायघनऔरंगाबाद : गेल्या नऊ महिन्यांच्या काळात ४८४ जणांनी आत्महत्या केली. यामध्ये विषारी द्रव घेऊन १९९, गळफास घेऊन २२४, तर जाळून घेत ६१ जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रामुख्याने ऑगस्टमध्ये गळफासाच्या घटना वाढल्याचे दिसते. आत्महत्येचे मूळ कारण शेवटी निराशाच असते. बहुतांश प्रकरणात तसेच दिसते.  तज्ज्ञांकडून समुपदेशन, उपचार गरजेचा आहे, असा सल्ला घाटीचे मनोविकृती विभागाचे प्रमुख डाॅ. प्रदीप देशमुख यांनी दिला आहे.

लाॅकडाऊन काळात घटली होती संख्याजानेवारी ३१, फेब्रुवारी १८, मार्चमध्ये २३, एप्रिल ९, मे १६, जून ३५, जुलै २२, ऑगस्ट ४१, अशा १९५ गळाफासाच्या घटनांची शवविच्छेदनगृहात नोंद आहे. जळीत रुग्णांची व जळून मृत्यूची, विषारी औषध प्राशनाने मृत्यू संख्या लाॅकडाऊन काळात घटली होती. मात्र, ही संख्या ऑगस्टनंतर वाढताना दिसत असल्याचे घाटीचे उपाधिष्ठाता व न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डाॅ. कैलास झिने यांनी लोकमतला सांगितले.

अनलॉकमध्ये आत्महत्येचे प्रयत्न करणारे दीडपट वाढलेलाॅकडाऊन काळात आत्महत्येचा प्रयत्न करणारे समुपदेशनासाठी येणाऱ्यांचे प्रमाण अनलाॅकनंतर वाढलेले आहे. आठवड्यात किमान १५ पेशंट येत होते. हे प्रमाण लाॅकडाऊनपूर्वी १०, तर लाॅकडाऊनमध्ये २ ते ३ रुग्ण समुपदेशनासाठी घाटीत येत होते. याला कारणे अनेक असू शकतात. आता आत्महत्येचे प्रयत्न करणाऱ्यांचे प्रमाण दीड टक्का वाढलेले दिसत आहे. अनेक प्रकरणात नोकऱ्यांवर गंडांतर, आर्थिक अडचणी, व्यसने आणि कोरोनासोबत नैसर्गिक आपत्ती ही कारणे याला असू शकतात, असे डाॅ. देशमुख म्हणाले.

१९९ जणांनी घेतले विषारी औषधलिंग :     ३० वर्षांखालील     ३१ वर्षांवरील     एकूणपुरुष      ८०     ७१     १५१स्त्री          ३६    १२    ४८

२२४ जणांनी घेतला गळफासलिंग :     ३० वर्षांखालील     ३१ वर्षांवरील     एकूणपुरुष     ८२     ९२            १७४स्त्री    ३६     १४     ५०

६१ जणांनी घेतले जाळूनलिंग :     ३० वर्षांखालील     ३१ वर्षांवरील      एकूणपुरुष      १४     १८      ३२स्त्री      ११    १८     २९