शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

स्क्रिनींगमध्ये ४८२ बालके कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:45 IST

जिल्ह्यामध्ये ० ते ६ वयोगटातील बालकांचे स्क्रिनींग करुन त्यामधून कुपोषित बालकांची निवड करण्यात आली आहे. महिला बाल कल्याण विभागामार्फत केलेल्या स्क्रिनींगनुसार ४८२ तीव्र कुपोषित बालके आणि १ हजार २७१ मध्यम कुपोषित बालके आहेत. शासनाच्या निर्देशानुसार तीव्र कुपोषित बालकांसाठी लवकरच ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यामध्ये ० ते ६ वयोगटातील बालकांचे स्क्रिनींग करुन त्यामधून कुपोषित बालकांची निवड करण्यात आली आहे. महिला बाल कल्याण विभागामार्फत केलेल्या स्क्रिनींगनुसार ४८२ तीव्र कुपोषित बालके आणि १ हजार २७१ मध्यम कुपोषित बालके आहेत. शासनाच्या निर्देशानुसार तीव्र कुपोषित बालकांसाठी लवकरच ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.अंगणवाडी सेविकांमार्फत तीव्र कुपोषित बालके व मध्यम कुपोषित बालकांच्या पालकांचे वेळोवेळी समुपदेशन करण्यात आले असून बालकांना चौरस आहार दिला जाईल असे जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी (महिला व बाल) सांगितले. अंगणवाडी केंद्रातील ० ते ६ वयोगटातील बालकांचे दरमहा वजन घेऊन त्यानुसार बालकांची श्रेणी ठरविण्यात येते. आॅक्टोबर महिन्यात घेतलेल्या एकूण ९९ हजार ९७५ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ८३ हजार १०८ बालकांचे वजन घेण्यात आले. त्यापैकी ७१ हजार ५६९ बालके सर्वसाधारण श्रेणी (८६.१२ टक्के) ९ हजार २४१ बालके मध्यम कमी वजनांची (११.१२ टक्के) २ हजार २९८ तीव्र कमी वजनांची बालके (२.७६ टक्के) आहेत. जिल्ह्याच्या मासिक प्रगती अहवालावरुन सद्य:स्थितीत असलेले आकडेवारी आहे.ग्राम बाल विकास केंद्रामध्ये बालकांना चौरस आहार तसेच औषधोपचार यासह इतर आवश्यक सुविधा असणार आहेत. कुपोषणमुक्त जिल्हा करण्यासाठी बालकल्याणकडून प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागातील बालकांची तपासणी व सकस आहार बाबत पालकांना समूपदेशन केले जात आहे.