शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
5
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
6
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
7
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
8
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
9
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
10
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
11
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
12
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
13
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
14
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
15
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
16
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
17
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
18
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
19
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
20
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

४५ वर्षांपासून रखडलेले संतपीठ १५ दिवसांत मार्गी लावणार; उच्चशिक्षणमंत्र्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 19:24 IST

संतपीठाची स्थापना करण्याची घोषणा १९७५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी केली होती.

ठळक मुद्देविद्यापीठाच्या अखत्यारीत सुरू करू संतपीठाच्या इमारतीचे भूमिपूजन २२ वर्षांपूर्वी केले होते.

औरंगाबाद : पैठण येथे संतपीठाची घोषणा होऊन ४५ वर्षे झाली आहेत. संतपीठाच्या इमारतीचे भूमिपूजन २२ वर्षांपूर्वी केले होते. त्यानंतर २०१४ मध्ये इमारतीचे उद्घाटन झाले. मात्र, संतपीठ काही सुरू झालेले नाही. ४५ वर्षांपासून रखडलेला संतपीठाचा विषय येत्या १५ दिवसांत मार्गी लावणार असल्याचा दावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केला.

संतपीठाची स्थापना करण्याची घोषणा १९७५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी केली होती. त्यानंतर मराठवाड्याच्या विकासासाठी ४२ कलमी कार्यकमांतर्गत हे संतपीठ उभारण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी २३ जानेवारी १९८१ रोजी घेतला. तेव्हापासून आतापर्यंत सतत समित्यांची स्थापना, घोषणाच करण्यात येत आहेत. यानंतर अनेक सरकारे आली आणि गेली तरी संतपीठ काही स्थापन झाले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एका कार्यक्रमानिमित्त उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत गुरुवारी आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी येत्या १५ दिवसांत संतपीठाचा विषय मार्गी लावण्याचा दावा केला.

संतपीठाला विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी उच्चशिक्षण विभागाच्या सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती येत्या आठ दिवसांत अहवाल देईल. यामध्ये संतपीठात शिकविण्यात येणारे अभ्यासक्रम ठरविण्यात येतील. मागील सरकारने संतपीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यावर कोणतेही उत्तर आले नाही. यामुळे राज्य शासनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत हे संतपीठ सुरू करणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यापीठात असलेले ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र सुरू राहणार आहे. यासाठी निधीचा पुरवठा यूजीसीकडून करण्यात येत होता. मात्र, त्यांनी मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही केंद्राला लागणारा निधी विद्यापीठ आणि राज्य शासन खर्च करील, असेही त्यांनी सांगितले.

संतपीठाच्या उभारणीचा प्रवास- १९७५ साली तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी संतपीठ स्थापन करण्याची घोषणा केली.- ४२ कलमी कार्यक्रमांतर्गत संतपीठ उभारण्याचा निर्णय २३ जानेवारी १९८१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांनी जाहीर केला.- २३ मार्च १९८१ रोजी बाळासाहेब भारदे यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यांची समिती स्थापन.- १९९१-९२ च्या अर्थसंकल्पात संतपीठासाठी १ कोटी रुपयांचा निधी.- ४ नोव्हेंबर १९९८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन.- २०११ मध्ये राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने संतपीठाचे हस्तांतरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे केले.- २ फेब्रुवारी २०११ रोजी संतपीठातील अभ्यासक्रम जून महिन्यापासून सुरू करण्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश.- १३ फेब्रुवारी २०१४ रोजी तत्कालीन सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन.- २०१८ च्या नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनात तत्कालीन सांस्कृतिक तथा उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बैठक घेत संतपीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी औरंगाबादचे माजी उपमहापौर संजय जोशी, तत्कालीन प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर आणि मंत्रालयातील सहसचिव डॉ. सिद्धार्थ खरात यांची समिती स्थापन.- समितीने अहवाल तयार करून संतपीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला.- १२ मार्च २०२० रोजी उदय सामंत यांनी येत्या १५ दिवसांत संतपीठ सुरू करण्याची घोषणा केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणState Governmentराज्य सरकार