शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

दोन दिवसांत मनपाकडून ४५ मोबाइल टॉवर सील; २०० मोबाइल टॉवर मनपाच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 20:07 IST

मागील काही दिवसांपासून महापालिकेने टॉवर सील करण्याची प्रक्रिया सुरू केली.

ठळक मुद्देशहरात वेगवेगळ्या कंपन्यांचे ५६८ अनधिकृत टॉवर आहेत. अनधिकृत टॉवरला महापालिकेकडून दुप्पट टॅक्स लावण्यात येतो.

औरंगाबाद : शहरातील मोबाइल कंपन्यांनी महापालिकेला जेरीस आणले आहे. ग्राहकाकडून कर स्वरूपात कोट्यवधी रुपये जमा करूनही ती रक्कम महापालिकेकडे भरण्यात येत नाही. त्यामुळे मागील दोन दिवसांमध्ये महापालिका प्रशासनाने शहरातील तब्बल ४५ मोबाइल टॉवर सील केले आहेत. इंडस, एटीसी या दोन कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने संबंधित कंपन्यांना ५० टक्के थकबाकी भरण्याचे आदेश दिले.

शहरात वेगवेगळ्या कंपन्यांचे ५६८ अनधिकृत टॉवर आहेत. अनधिकृत टॉवरला महापालिकेकडून दुप्पट टॅक्स लावण्यात येतो. मागील तीन वर्षांपासून महापालिकेने दुप्पट टॅक्स लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुप्पट कर लावल्यामुळे मोबाइल कंपन्या पैसे भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. मोबाइल कंपन्यांकडे दिवसेंदिवस थकबाकी वाढत आहे. ३४ कोटी रुपये कंपन्यांकडे थकीत आहेत. मागील काही दिवसांपासून महापालिकेने टॉवर सील करण्याची प्रक्रिया सुरू केली. ज्या कंपन्यांनी पैसे भरले, त्यांचे टॉवर उघडून देण्यात येत आहेत. मागील दोन दिवसांमध्ये महापालिकेने पुन्हा व्यापक प्रमाणात कारवाई सुरू केली. तब्बल ४५ मोबाइल टॉवर सील केले आहेत, अशी माहिती कर मूल्य निर्धारण अधिकारी अपर्णा थेटे यांनी दिली. महापालिकेच्या कारवाईविरोधात इंडस आणि एटीसी या दोन कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना थकबाकीतील ५० टक्के रक्कम भरण्याचे आदेश दिले. या कंपन्यांकडे एक कोटी रुपयांची थकबाकी आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ५० लाख रुपये प्राप्त होतील. मार्चअखेरपर्यंत मोबाइल कंपन्यांकडून किमान २४ कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

२०० मोबाइल टॉवर मनपाच्या रडारवरमोबाइल कंपन्या चालू वर्षीचा कर आणि मागील थकबाकी भरण्यास नकार देत आहेत. ज्या कंपन्यांकडे सर्वाधिक थकबाकी आहे, त्या कंपन्यांची किमान दोनशे मोबाइल टावर सील करण्याची प्रक्रिया मार्चअखेरपर्यंत करण्यात येणार आहे. जोपर्यंत कंपन्या पैसे भरणार नाहीत, तोपर्यंत सील उघडण्यात येणार नाही, अशी भूमिका महापालिकेची राहणार असल्याचे थेटे यांनी नमूद केले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरAurangabadऔरंगाबाद