शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थापनेला ४२ वर्ष पूर्ण; पण समोर कर्जाचा मोठा डोंगर

By मुजीब देवणीकर | Updated: December 9, 2024 12:35 IST

महापालिकेला केवळ जीएसटी अनुदानाचा एकमेव आधार 

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आशेचा किरण असलेल्या महापालिकेला स्थापन होऊन रविवारी ४२ वर्षे पूर्ण झाली. सोमवारी आपली महापालिका ४३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मागील चार दशकांमध्ये महापालिकेने शहराला खूप काही दिले. पण, येणारी काही वर्षे महापालिकेसाठी आर्थिक संकटाची ठरणार आहेत, त्यातून प्रशासन कसा मार्ग काढणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली तरी प्रारंभीची सहा वर्षे प्रशासकीय राजवट होती. १९८८ मध्ये मनपाची पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर १९९५, २०००, २००५, २०१० आणि शेवटची म्हणजे २०१५ मध्ये निवडणूक झाली. पाच वर्षांपासून महापालिकेत कारभारी नाहीत. शहर चारही बाजूंनी झपाट्याने वाढत आहे. तुलनेत सोयीसुविधांचा मोठा अभावही आहे. जुन्या शहरात रस्ते, एलईडी दिवे, आठवड्यातून एकदा का होईना; पाणी इ. सुविधा दिल्या. खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसविण्यात अनेक वर्षे गेली. शहराच्या विकासात स्मार्ट सिटीची बरीच मदत झाली. ७५० सीसीटीव्ही, सफारी पार्क, स्मार्ट बस इ. प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरले. शहरासाठी आनंदाची बाब म्हणजे मार्च २०२५ पर्यंत रोज पाणी मिळेल. पाणीप्रश्न साेडविताना महापालिकेचे आर्थिक कंबरडे मोडणार, हे निश्चित.

८२२ कोटींचे कर्ज त्रासदायक२,७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपाला स्वत:चा वाटा म्हणून ८२२ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. कर्ज उभारून रक्कम द्यावी लागेल. कर्जाचा हप्ता दरमहा किमान १८ ते २० कोटी राहील. अगोदरच स्मार्ट सिटीत आपला वाटा टाकण्यासाठी मनपाने २५० कोटींचे कर्ज घेलेले आहे. दरमहा कर्जाची परतफेड करण्यासाठीही रक्कम तिजोरीत राहणार नाही. याचा शहराच्या विकासावर अनेक वर्षे परिणाम होईल.

उत्पन्न वाढविण्याशिवाय पर्याय नाहीमहापालिकेला स्वत:चे उत्पन्न वाढविण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. मालमत्ता कर पाणीपट्टीतून दरवर्षी जेमतेम १३० ते १४० कोटी रुपये वसूल होतात. वसुलीचा हा आकडा ४०० कोटींपर्यंत पोहोचला तरच शहराचा विकास शक्य आहे. सध्या शासनाकडून दरमहा ३० कोटी रुपये जीएसटी अनुदान देण्यात येते. या निधीतून मनपा कर्मचाऱ्यांचा पगार होतो.

वसुली वाढणारमागील दीड वर्षात मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच १०० कोटी वसूल झाले. मार्चपर्यंत आणखी बरीच रक्कम वसूल होईल. यंदा ५०० कोटींचे उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. भविष्यात वसुलीच मनपाचा आर्थिक कणा सिद्ध होईल.- जी. श्रीकांत, प्रशासक, महापालिका.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMuncipal Corporationनगर पालिका