शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन रंगणार औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:02 IST

औरंगाबाद : देगलूर येथे आयोजित केलेले ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन रद्द केल्यानंतर ते आता २५ व २६ सप्टेंबर ...

औरंगाबाद : देगलूर येथे आयोजित केलेले ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन रद्द केल्यानंतर ते आता २५ व २६ सप्टेंबर रोजी औरंगााबादेत आयोजित केले जाणार आहे. यासाठी लोकसंवाद फाउंडेशनतर्फे ४१ वे साहित्य संमेलन आयोजित करण्याचे दिलेले निमंत्रण मराठवाडा साहित्य परिषदेने (मसाप) स्वीकारले असल्याची घोषणा अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी केली.

देगलूर येथे मार्चमध्ये आयोजित केलेले ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन कोरोनामुळे स्थगित करण्यात आले होते. आयोजक संस्थेची दीर्घकाळ वाट पाहिल्यानंतर ते रद्द करण्याचा निर्णय ‘मसाप’ने घेतला. अलीकडे लोकसंवाद फाउंडेशनने संमेलन आयोजित करण्याचे निमंत्रण ‘मसाप’ला दिले. त्यावर ‘मसाप’च्या कार्यकारिणीमध्ये चर्चा करण्यात आली. त्यात हे निमंत्रण स्वीकारले आहे. यानंतर ‘मसाप’चे अध्यक्ष ठाले पाटील आणि ‘लोकसंवाद’चे अध्यक्ष डॉ. राजेश करपे यांच्यासह सहकारी डॉ. राम चव्हाण, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. गणेश मोहिते, डॉ. हंसराज जाधव, डॉ. रविकिरण सावंत, सुदाम मुळे पाटील यांच्यासोबत संमेलन आयोजनासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत हे संमेलन कसलाही भपकेबाजपणा न करता कमीत कमी खर्चात साधेपणाने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय कोरोनासंदर्भात राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही ‘मसाप’ने आयोजकांना दिल्या आहेत. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देगलूरचे ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार राहतील, असेही ठाले पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या संमेलनाची घोषणा करताना ठाले पाटील यांच्यासह परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे व कार्यकारिणी सदस्य डॉ. रामचंद्र काळुंखे उपस्थित होते.