शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

४० गावांना तीव्र झळा...

By admin | Updated: June 27, 2014 00:27 IST

मारूती कदम , उमरगा पावसाने यंदाही हुलकावणी दिल्याने तालुक्यातील ९६ पैकी जवळपास ४० गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़

मारूती कदम , उमरगापावसाने यंदाही हुलकावणी दिल्याने तालुक्यातील ९६ पैकी जवळपास ४० गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ एका गावात टँकर तर २० गावांसाठी ३० अधिग्रहणे करण्यात आली असून, ६० साठवण तलाव कोरडेठाक पडले आहेत़उमरगा तालुक्याची पावसाची सरासरी ९५० मिमी आहे़ गतवर्षी सरासरपीपैकी ८५० मि़मी़पाऊस झाला होता़ तर तालुक्यात कमी-अधिक ठिकाणी पाऊस झाल्याने काही ठिकाणचे तलाव भरले तर काही ठिकाणचे निम्म्यापर्यंतच भरले होते़ गत सहा वर्षे कमी अधिक प्रमाणात पावसाचे प्रमाण असेच राहिले आहे़ सद्यस्थितीत तालुक्यातील ६० साठवण तलाव कोरडेठाक पडले आहे़ बेनितुरा, कोळसूर, तुरोरी, जकापूर या तलावाही अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे़ उन्हाची तीव्रता कायम असली तरी पावसाची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे़ गत काही दिवसांपासून ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे़ उमरगा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी धरणातही अत्यल्प पाणीसाठा आहे़ त्यामुळे शहराला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे़ तालुक्यातील चिंचोली (ज़), गुरूवाडी, चिंचकोटा, डिग्गी, कदेर, पळसगाव, बेंळंब तांडा, काटेवाडी, चिरेवाडी, बोरी, गुंजोटी, नारंगवाडी, केसरजवळगा, समुद्राळ, एकोंडी (ज़), मळगी, भगतवाडी आदी गावात तीव्र टंचाई निर्माण झाली आहे़ चिंचोली (ज़) येथे गत दोन महिन्यापासून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे़ तर २० गावांसाठी ३० ठिकाणी विहिरी, कुपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ तर प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे पाठविलेले ३० प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत़ एकूणच वाढत्या उन्हाच्या तीव्रतेत आणि पावसाने पाठ फिरविल्याने पाणीटंचाई उग्र रूप धारण करीत आहे़ ८९ लाखांचा कृती आराखडातालुक्यात निर्माण झालेल्या व संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने ८८ लाख, ९२ हजार रूपयांचा कृती आराखडा तयार केला आहे़ सदरील आराखडा मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे़ वन्य प्राणी गावकुसालापावसाने ओढ दिल्याने साठवण तलाव, विहिरी, शेततळी आदी ठिकाणचे पाणीसाठे कोरडेठाक पडले आहेत़ वनक्षेत्रातही पिण्याचा पाण्याचा अभाव असल्याने वानर, ससे, मोर, कोल्हे, तरस आदी वन्य प्राणी गावाच्या शिवारातील जलस्त्रोतांवर तहान भागविण्यासाठी येत असल्याचे दिसत आहे़ वनविभागाने वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे़