शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

औरंगाबाद जिल्ह्यासाठी ४ हजार ईव्हीएमचा कोटा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:23 IST

लोकसभा निवडणुका निर्धारित वेळेत होवोत अथवा तत्पूर्वी होवोत, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रिक व्होटिंग मशिन्स मागणीचा आढावा घेतला असून, जिल्ह्यासाठी ४ हजार नवीन मशिन्सचा कोटा निश्चित झाल्याचे पत्र जिल्हा निवडणूक विभागाला आयोगाने पाठविले आहे

ठळक मुद्देनिवडणुकांची लगबग : जुलैपासून सुरू होणार वेगाने तयारी; निवडणूक आयोगाने घेतला मशीनचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लोकसभा निवडणुका निर्धारित वेळेत होवोत अथवा तत्पूर्वी होवोत, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रिक व्होटिंग मशिन्स मागणीचा आढावा घेतला असून, जिल्ह्यासाठी ४ हजार नवीन मशिन्सचा कोटा निश्चित झाल्याचे पत्र जिल्हा निवडणूक विभागाला आयोगाने पाठविले आहे. त्यानुसार जुलै ते सप्टेंबरपर्यंत मशिन्सची जमवाजमव करण्याची तयारी सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.राज्याला २ लाख २५ हजार ईव्हीएम मिळतील. गरजेपेक्षा १७५ पट मशिन्सची मागणी करण्यात आली होती. २,५७७ मतदान केंद्रांची नोंद सध्या जिल्हा प्रशासनाकडे आहे. त्यानुसार बॅलेट व कंट्रोल युनिटच्या मागणीनुसार ४ हजारांच्या आसपास युनिट मिळतील.मार्च अखेरपर्यंत २६ लाख ५० हजार ३७९ एकूण मतदार जिल्ह्यात आहेत. त्यामध्ये १४ लाख ६ हजार ८२३ पुरुष आणि १२ लाख ४३ हजार ५३८ महिला मतदारांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत २३ लाख १४ हजार ९७ मतदार होते. चार वर्षांत जिल्ह्यामध्ये ३ लाख ३६ हजार २१७ मतदार वाढले आहेत.३५० हून अधिक मतदान केंद्रे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी वाढण्याची शक्यता सध्या आहे. जानेवारीअखेरीस मतदार नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आला असला तरी नोंदणी नियमितपणे सुरू आहे.जिल्ह्यात गंगापूर-खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव, पूर्व, पश्चिम, मध्य हे मतदारसंघ येतात. पैठण, फुलंब्री, सिल्लोड हे विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. भौगोलिकदृष्ट्या मतदारसंघाच्या रचनेत काहीही बदल होणारनाही.मतदारसंघ मागच्या वेळी ज्या भौगोलिक सीमेत होता, तेवढाच यावेळीदेखील राहील. विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान केंद्रसंख्या ही वाढलेल्या मतदार संख्येमुळे वाढणार आहे.३ लाख ३६ हजार मतदार वाढलेजिल्ह्यात २०१४ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत चार वर्षांत ३ लाख ३६ हजार २१७ मतदार वाढले आहेत. ८५ हजार नवमतदारांची भर दरवर्षी पडली आहे. यापुढे होणाºया नोंदणी कार्यक्रमात सुमारे १ लाख मतदार नव्याने नोंदणी होण्याची शक्यता आहे. मतदार नोंदणी वर्षभर सुरूच राहणार आहे.२३ लाख १४ हजार ९७ मतदार होते२०१४ साली २३ लाख १४ हजार ९७ मतदार होते. त्यासाली लोकसभा निवडणुकीसाठी २४ एप्रिल रोजी मतदान, तर १६ मे २०१४ रोजी मतमोजणी झाली होती.डिसेंबर २०१८ मध्ये लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता सध्या तरी कमीच आहे. निर्धारित वेळेत निवडणुका होतील, कारण निवडणूक आयोगाकडून अद्याप त्याअनुषंगाने काहीही सूचना आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबाद