शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

औरंगाबाद जिल्ह्यासाठी ४ हजार ईव्हीएमचा कोटा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:23 IST

लोकसभा निवडणुका निर्धारित वेळेत होवोत अथवा तत्पूर्वी होवोत, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रिक व्होटिंग मशिन्स मागणीचा आढावा घेतला असून, जिल्ह्यासाठी ४ हजार नवीन मशिन्सचा कोटा निश्चित झाल्याचे पत्र जिल्हा निवडणूक विभागाला आयोगाने पाठविले आहे

ठळक मुद्देनिवडणुकांची लगबग : जुलैपासून सुरू होणार वेगाने तयारी; निवडणूक आयोगाने घेतला मशीनचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लोकसभा निवडणुका निर्धारित वेळेत होवोत अथवा तत्पूर्वी होवोत, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रिक व्होटिंग मशिन्स मागणीचा आढावा घेतला असून, जिल्ह्यासाठी ४ हजार नवीन मशिन्सचा कोटा निश्चित झाल्याचे पत्र जिल्हा निवडणूक विभागाला आयोगाने पाठविले आहे. त्यानुसार जुलै ते सप्टेंबरपर्यंत मशिन्सची जमवाजमव करण्याची तयारी सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.राज्याला २ लाख २५ हजार ईव्हीएम मिळतील. गरजेपेक्षा १७५ पट मशिन्सची मागणी करण्यात आली होती. २,५७७ मतदान केंद्रांची नोंद सध्या जिल्हा प्रशासनाकडे आहे. त्यानुसार बॅलेट व कंट्रोल युनिटच्या मागणीनुसार ४ हजारांच्या आसपास युनिट मिळतील.मार्च अखेरपर्यंत २६ लाख ५० हजार ३७९ एकूण मतदार जिल्ह्यात आहेत. त्यामध्ये १४ लाख ६ हजार ८२३ पुरुष आणि १२ लाख ४३ हजार ५३८ महिला मतदारांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत २३ लाख १४ हजार ९७ मतदार होते. चार वर्षांत जिल्ह्यामध्ये ३ लाख ३६ हजार २१७ मतदार वाढले आहेत.३५० हून अधिक मतदान केंद्रे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी वाढण्याची शक्यता सध्या आहे. जानेवारीअखेरीस मतदार नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आला असला तरी नोंदणी नियमितपणे सुरू आहे.जिल्ह्यात गंगापूर-खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव, पूर्व, पश्चिम, मध्य हे मतदारसंघ येतात. पैठण, फुलंब्री, सिल्लोड हे विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. भौगोलिकदृष्ट्या मतदारसंघाच्या रचनेत काहीही बदल होणारनाही.मतदारसंघ मागच्या वेळी ज्या भौगोलिक सीमेत होता, तेवढाच यावेळीदेखील राहील. विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान केंद्रसंख्या ही वाढलेल्या मतदार संख्येमुळे वाढणार आहे.३ लाख ३६ हजार मतदार वाढलेजिल्ह्यात २०१४ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत चार वर्षांत ३ लाख ३६ हजार २१७ मतदार वाढले आहेत. ८५ हजार नवमतदारांची भर दरवर्षी पडली आहे. यापुढे होणाºया नोंदणी कार्यक्रमात सुमारे १ लाख मतदार नव्याने नोंदणी होण्याची शक्यता आहे. मतदार नोंदणी वर्षभर सुरूच राहणार आहे.२३ लाख १४ हजार ९७ मतदार होते२०१४ साली २३ लाख १४ हजार ९७ मतदार होते. त्यासाली लोकसभा निवडणुकीसाठी २४ एप्रिल रोजी मतदान, तर १६ मे २०१४ रोजी मतमोजणी झाली होती.डिसेंबर २०१८ मध्ये लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता सध्या तरी कमीच आहे. निर्धारित वेळेत निवडणुका होतील, कारण निवडणूक आयोगाकडून अद्याप त्याअनुषंगाने काहीही सूचना आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबाद