शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

जिल्ह्यात ३९ गावे जोखीमग्रस्त

By admin | Updated: May 7, 2014 00:45 IST

अनुराग पोवळे , नांदेड जिल्ह्यात साथरोगांना आळा बसावा यासाठी जिल्ह्यात मान्सूनपूर्व उपाययोजनांना प्रारंभ करण्यात आला

अनुराग पोवळे , नांदेड जिल्ह्यात साथरोगांना आळा बसावा यासाठी जिल्ह्यात मान्सूनपूर्व उपाययोजनांना प्रारंभ करण्यात आला असून आरोग्य विभागाच्या वतीने साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कृती योजना हाती घेण्यात आली आहे़ जिल्ह्यातील ३९ गावे साथ जोखीमग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत़ या गावांमध्ये अग्रक्रमाने उपाययोजना राबविण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत़ मागील तीन वर्षांच्या काळात जलजन्य साथउद्रेक उद्भवलेली, मोठी यात्रा भरणारी आणि एकच पाण्याचा स्त्रोत असलेल्या गावांचा साथरोगदृष्ट्या जोखीमग्रस्त असलेल्या गावांचा समावेश आहे़ याशिवाय टंचाईग्रस्त, टँकरने पाणीपुरवठा होत असलेली गावे आणि नदीकाठच्या गावांनाही जोखीमग्रस्त समजण्यात येईल, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे़ या गावांची यादी तयार करून जिल्ह्यात ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि ३७७ उपकेंद्रांना देण्यात आली आहे़ साथरोगाच्या दृष्टीने जोखीमग्रस्त असलेल्या गावांमध्ये अर्धापूर तालुक्यातील कलदगाव, माहूर तालुक्यातील अनमाळ व रूई, किनवट तालुक्यातील परोटीतांडा, कुपटी, पांगरपहाड, मांडवी, रिठातांडा, जलधारा व सावरगाव, बिलोली तालुक्यातील अर्जापूर, सगरोळी, बडूर, लघूळ, बेळकोणी खु़, लोहगाव आणि केरूर, भोकर तालुक्यातील थेरबन, नांदेड तालुक्यातील लिंबगाव, जैतापूर, लोहा तालुक्यातील हळदव व मारतळा, हिमायतनगर तालुक्यातील कार्ला, महादापूर, हदगाव तालुक्यातील उंचाडा, गारगव्हाण, पिंपळगाव, राजवाडी, हरडफ, खरबी व हदगाव, उमरी तालुक्यातील जामगाव, उमरी, कंधार तालुक्यातील हटक्याळ, बारूळ, दैठणा, धर्माबाद तालुक्यातील कारेगाव, मुदखेड तालुक्यातील मुदखेड आणि मुखेड तालुक्यातील तुपदाळ या गावांचा समावेश आहे़ मोठी यात्रा भरणार्‍या गावांनाही आरोग्य विभागाने जोखीमग्रस्तच ठरवले आहे़ त्यात माहूर, माळेगाव, रत्नेश्वरी, दाभड आणि शिकारघाट या गावांचा समावेश आहे़ या जोखीमग्रस्त गावात साथ प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍याने आठवड्यातून एक भेट द्यावी, पाणीस्त्रोतांचे परीक्षण करावे, परीक्षणात तपासणीचा अहवाल नकारात्मक असेल तर पाणीपुरवठा करणार्‍या यंत्रणेस सतर्क करण्याचेही आदेश दिले आहेत़ संबंधित ग्रामपंचायतीमध्ये ब्लिचिंग पावडर पुरेशा प्रमाणात असल्याची खात्री करावी, टँकरने होणारा पाणीपुरवठा शुद्ध आहे की नाही याची खात्री करावी, वैद्यकीय अधिकार्‍यांनी किमान १५ दिवसातून एकदा तरी अशा गावांना भेट देवून माहिती घ्यावी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधीसाठा तपासावा आणि साथउद्रेक उद्भवल्यास उद्रेकाची माहिती मुख्यालयाला कळविण्याबाबत सूचना दिल्या आहेत़ आरोग्य विभागाने साथरोगांना आळा घालण्यासाठी साथरोग नियंत्रण कृती योजना हाती घेतली आहे़ त्यानुसार वैद्यकीय पथकांची स्थापना करणे, प्राथमिक केंद्रांना प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषधी पुरवठा उपलब्ध करून देणे, नियंत्रण कक्षांंची स्थापना, प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान एका वैद्यकीय अधिकार्‍यांची उपलब्धता राहणे याची खबरदारी घेण्यात येईल़ डॉ़ दुर्गादास रोडे, जिल्हा साथरोग अधिकारी, जिल्हा परिषद