शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पुरवणी परीक्षेत दहावीचा ३७ टक्के तर बारावीचा ४९ टक्के निकाल

By राम शिनगारे | Updated: August 28, 2023 17:05 IST

शिक्षण मंडळाकडून घोषणा, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवीला प्रवेश मिळणार

छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-ऑगस्टमध्ये घेलतलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यात दहावीचा निकाल ३७.२५ टक्के तर बारावीचा ४९.६४ टक्के एवढा लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी आणि पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिक्षण मंडळाने अनुतीर्ण झालेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलै- ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. दहावीच्या पुरवणी परीक्षेला औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातुन ५ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५ हजार ९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली. त्यातील १ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.२५ एवढी आहे. सप्टेंबर-ऑक्टोंबर २०२१ मध्ये घेतलेल्या पुरवणी परीक्षेत ३१.६४ टक्के, जुलै- ऑगस्ट २०२२ मध्ये घेतलेल्या पुरवणी परीक्षेत ३९.७६ टक्के विद्यार्थी औरंगाबाद विभागात उत्तीर्ण झाले होते.

बारावीच्या पुरवणी परीक्षेत औरंगाबाद विभागात ४ हजार ८५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ४ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील २ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. टक्केवारी ४९.६४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सप्टेंबर-ऑक्टोंबर २०२१ मध्ये घेतलेल्या पुरवणी परीक्षेत ३६ टक्के, जुलै- ऑगस्ट २०२२ मध्ये ४८ टक्के एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी पावणेदोन टक्क्यांनी उत्तीर्णतेचे प्रमाण वाढले आहे. दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी आणि पदवीच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे.

टॅग्स :examपरीक्षाAurangabadऔरंगाबाद