शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

पुरवणी परीक्षेत दहावीचा ३७ टक्के तर बारावीचा ४९ टक्के निकाल

By राम शिनगारे | Updated: August 28, 2023 17:05 IST

शिक्षण मंडळाकडून घोषणा, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवीला प्रवेश मिळणार

छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-ऑगस्टमध्ये घेलतलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यात दहावीचा निकाल ३७.२५ टक्के तर बारावीचा ४९.६४ टक्के एवढा लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी आणि पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिक्षण मंडळाने अनुतीर्ण झालेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलै- ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. दहावीच्या पुरवणी परीक्षेला औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातुन ५ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५ हजार ९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली. त्यातील १ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.२५ एवढी आहे. सप्टेंबर-ऑक्टोंबर २०२१ मध्ये घेतलेल्या पुरवणी परीक्षेत ३१.६४ टक्के, जुलै- ऑगस्ट २०२२ मध्ये घेतलेल्या पुरवणी परीक्षेत ३९.७६ टक्के विद्यार्थी औरंगाबाद विभागात उत्तीर्ण झाले होते.

बारावीच्या पुरवणी परीक्षेत औरंगाबाद विभागात ४ हजार ८५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ४ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील २ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. टक्केवारी ४९.६४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सप्टेंबर-ऑक्टोंबर २०२१ मध्ये घेतलेल्या पुरवणी परीक्षेत ३६ टक्के, जुलै- ऑगस्ट २०२२ मध्ये ४८ टक्के एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी पावणेदोन टक्क्यांनी उत्तीर्णतेचे प्रमाण वाढले आहे. दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी आणि पदवीच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे.

टॅग्स :examपरीक्षाAurangabadऔरंगाबाद