शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

पुरवणी परीक्षेत दहावीचा ३७ टक्के तर बारावीचा ४९ टक्के निकाल

By राम शिनगारे | Updated: August 28, 2023 17:05 IST

शिक्षण मंडळाकडून घोषणा, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवीला प्रवेश मिळणार

छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-ऑगस्टमध्ये घेलतलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यात दहावीचा निकाल ३७.२५ टक्के तर बारावीचा ४९.६४ टक्के एवढा लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी आणि पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिक्षण मंडळाने अनुतीर्ण झालेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलै- ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. दहावीच्या पुरवणी परीक्षेला औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातुन ५ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५ हजार ९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली. त्यातील १ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.२५ एवढी आहे. सप्टेंबर-ऑक्टोंबर २०२१ मध्ये घेतलेल्या पुरवणी परीक्षेत ३१.६४ टक्के, जुलै- ऑगस्ट २०२२ मध्ये घेतलेल्या पुरवणी परीक्षेत ३९.७६ टक्के विद्यार्थी औरंगाबाद विभागात उत्तीर्ण झाले होते.

बारावीच्या पुरवणी परीक्षेत औरंगाबाद विभागात ४ हजार ८५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ४ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील २ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. टक्केवारी ४९.६४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सप्टेंबर-ऑक्टोंबर २०२१ मध्ये घेतलेल्या पुरवणी परीक्षेत ३६ टक्के, जुलै- ऑगस्ट २०२२ मध्ये ४८ टक्के एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी पावणेदोन टक्क्यांनी उत्तीर्णतेचे प्रमाण वाढले आहे. दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी आणि पदवीच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे.

टॅग्स :examपरीक्षाAurangabadऔरंगाबाद