शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

३६ जणांचा सेंद्रिय शेतीचा संकल्प

By admin | Updated: July 28, 2014 01:00 IST

भांडेगाव : विषमुक्त अन्नासाठी अल्पखर्ची सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटल्याने साटंबा व जामठी खु. या दोन गावांतील ३६ शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीनेच पीक उत्पादन घेण्याचा संकल्प केला आहे.

भांडेगाव : विषमुक्त अन्नासाठी अल्पखर्ची सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटल्याने साटंबा व जामठी खु. या दोन गावांतील ३६ शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीनेच पीक उत्पादन घेण्याचा संकल्प केला आहे.हिंगोली तालुक्यातीज साटंबा येथे अफार्म पुणे व जयवंतराव घ्यार पाटील सेवाभावी संस्थेच्या वतीने ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी पी.डी.शिंदे, डी.एस.डाखोरे यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले. रासायनिक खते वापरून पिकवलेल्या धान्यातून माणसाच्या पोटात एक प्रकारचे विष जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विषमुक्त अन्नासाठी अल्पखर्ची असलेल्या सेंद्रिय शेतीच्या उत्तम पर्यायाकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी सरपंच संजीवनी घ्यार, रामचंद्र घ्यार, मारोतराव घ्यार, राम घ्यार, अनिल तपासे यांची उपस्थिती होती. अशाच प्रकारे जामठी खु. गावातही बैठक घेण्यात आली. यावेळी प्रल्हादराव भवर, बंडू कऱ्हाळे, उत्तमराव कऱ्हाळे, भिकाजीराव भवर, उपसरपंच माधव भवर, कौतिकराव भवर, प्रकल्प अधिकारी दत्तराव भवर, संतोष भवर, संजय भवर, नामदेव घ्यार, भागवत घ्यार, समाधान टापरे, बालाजी घ्यार आदी उपस्थित होते. साटंबा येथील २५ तर जामठी खु. येथील ११ शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा संकल्प केला असून त्याबाबतची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे कृषिदूत पी.डी.शिंदे देणार आहेत. हा कार्यक्रम निवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ३ वर्षे राबविण्यात येणार आहे. या भागातील अनेक शेतकरी सेंद्रीय शेतीची कास धरत आहेत. (वार्ताहर)