शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

३५० वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: April 20, 2015 00:30 IST

संजय कुलकर्णी , जालना शहराजवळील सिंदखेडराजा मार्गावर असलेल्या वनपरिक्षेत्रातील (उत्तर विभाग) सुमारे ३५० प्राण्यांची ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती होत आहे.

संजय कुलकर्णी , जालनाशहराजवळील सिंदखेडराजा मार्गावर असलेल्या वनपरिक्षेत्रातील (उत्तर विभाग) सुमारे ३५० प्राण्यांची ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती होत आहे. येथील पाणवठे कोरडेच राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून महिन्यातून दोनच वेळा वन विभागाकडून टँकरद्वारे पाणी टाकले जात आहे.जालना शहरातील कन्हैय्यानगर वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत ५० हेक्टर क्षेत्रात असलेल्या या वनपरिक्षेत्रामध्ये मोर, हरीण, काळवीट, नीलगायी, ससे असे सुमारे ३५० प्राणी आहेत. गेल्या तीन-चार वर्षात ५ हेक्टर क्षेत्रात पर्यावरणप्रेमींसाठी वन उद्यान तयार करण्यात आले आहे. परंतु वन्यप्राण्यांसाठी या परिसरात असलेल्या दोन पाणवठ्यांपैकी एक पाणवठा नेहमीच कोरडा असतो. रविवारी सायंकाळी हा पाणवठा कोरडाच आढळून आला. तर दुसऱ्या पाणवठ्यात पाणी कमी प्रमाणात होते. सध्या उन्हाचा पारा ४१ अंशापर्यंत पोहोचलेला असून उन्हाच्या कडाक्यात पाण्यासाठी वनपरिक्षेत्रातील प्राण्यांची भटकंती सुरू असल्याचे चित्र दिसून आले. या परिक्षेत्राच्या शेजारी असलेल्या काही शेतांमध्ये प्राणी पाण्याच्या शोधार्थ जात आहेत.वनपरिक्षेत्रात असलेल्या वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून या ठिकाणी दोन पाणवठे तयार केलेले आहेत. मागील तीन-चार वर्षात या क्षेत्रात एकूण ५० हेक्टरपैकी ५ हेक्टरमध्ये वनउद्यान तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेक पर्यावरणप्रेमी दररोज या ठिकाणी विरंगुळा म्हणून येतात. सकाळी व सायंकाळी जॉगींगसाठी नियमितपणे येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. पाणवठे कोरडे असल्याचे पाहून काहीजण अधून-मधून टँकरने पाणी आणून तेथे टाकतात. मात्र हे काम वन विभागाकडून नियमितपणे होणे आवश्यक आहे. मोर, हरीण, काळवीट, नीलगायी यासारख्या वन्यप्राणांची संख्या या वनपरिक्षेत्रात अधिक आहे. पाणवठे अनेकवेळा कोरडे राहत असल्याने या प्राण्यांनी पाण्याच्या शोधार्थ परिसरातील शेतांमध्ये आपला मोर्चा वळविल्याचे काही जणांनी सांगितले. पाण्यासाठी प्राण्यांची हेळसांड होत आहे.