शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
2
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
3
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
4
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
5
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
6
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
7
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
8
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
9
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
10
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
11
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
13
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
14
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
15
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
16
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
17
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
18
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
19
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
20
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

३५० वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: April 20, 2015 00:30 IST

संजय कुलकर्णी , जालना शहराजवळील सिंदखेडराजा मार्गावर असलेल्या वनपरिक्षेत्रातील (उत्तर विभाग) सुमारे ३५० प्राण्यांची ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती होत आहे.

संजय कुलकर्णी , जालनाशहराजवळील सिंदखेडराजा मार्गावर असलेल्या वनपरिक्षेत्रातील (उत्तर विभाग) सुमारे ३५० प्राण्यांची ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती होत आहे. येथील पाणवठे कोरडेच राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून महिन्यातून दोनच वेळा वन विभागाकडून टँकरद्वारे पाणी टाकले जात आहे.जालना शहरातील कन्हैय्यानगर वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत ५० हेक्टर क्षेत्रात असलेल्या या वनपरिक्षेत्रामध्ये मोर, हरीण, काळवीट, नीलगायी, ससे असे सुमारे ३५० प्राणी आहेत. गेल्या तीन-चार वर्षात ५ हेक्टर क्षेत्रात पर्यावरणप्रेमींसाठी वन उद्यान तयार करण्यात आले आहे. परंतु वन्यप्राण्यांसाठी या परिसरात असलेल्या दोन पाणवठ्यांपैकी एक पाणवठा नेहमीच कोरडा असतो. रविवारी सायंकाळी हा पाणवठा कोरडाच आढळून आला. तर दुसऱ्या पाणवठ्यात पाणी कमी प्रमाणात होते. सध्या उन्हाचा पारा ४१ अंशापर्यंत पोहोचलेला असून उन्हाच्या कडाक्यात पाण्यासाठी वनपरिक्षेत्रातील प्राण्यांची भटकंती सुरू असल्याचे चित्र दिसून आले. या परिक्षेत्राच्या शेजारी असलेल्या काही शेतांमध्ये प्राणी पाण्याच्या शोधार्थ जात आहेत.वनपरिक्षेत्रात असलेल्या वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून या ठिकाणी दोन पाणवठे तयार केलेले आहेत. मागील तीन-चार वर्षात या क्षेत्रात एकूण ५० हेक्टरपैकी ५ हेक्टरमध्ये वनउद्यान तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेक पर्यावरणप्रेमी दररोज या ठिकाणी विरंगुळा म्हणून येतात. सकाळी व सायंकाळी जॉगींगसाठी नियमितपणे येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. पाणवठे कोरडे असल्याचे पाहून काहीजण अधून-मधून टँकरने पाणी आणून तेथे टाकतात. मात्र हे काम वन विभागाकडून नियमितपणे होणे आवश्यक आहे. मोर, हरीण, काळवीट, नीलगायी यासारख्या वन्यप्राणांची संख्या या वनपरिक्षेत्रात अधिक आहे. पाणवठे अनेकवेळा कोरडे राहत असल्याने या प्राण्यांनी पाण्याच्या शोधार्थ परिसरातील शेतांमध्ये आपला मोर्चा वळविल्याचे काही जणांनी सांगितले. पाण्यासाठी प्राण्यांची हेळसांड होत आहे.