शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

Lok Sabha Election 2019 : औरंगाबादेत ३४ बॅलेट युनिट, २२ कंट्रोल युनिट, २५ व्हीव्हीपॅट पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 14:41 IST

ही मतदान यंत्रे वेळेत सुरू झाली असती तर मतदानाचा टक्का निश्चित वाढला असता. 

औरंगाबाद : मतदान प्रक्रिया सुरू करताना आणि सुरू झाल्यानंतर सुमारे ३४ बॅलेट युनिट, २२ कंट्रोल युनिट आणि २५ व्हीव्हीपॅट बंद पडले. यामुळे मतदान प्रक्रियेला विलंब झाला. ही मतदान यंत्रे वेळेत सुरू झाली असती तर मतदानाचा टक्का निश्चित वाढला असता. 

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले की, मॉकपोलदरम्यान सकाळी २४ बॅलेट युनिट बंद पडले. १७ कंट्रोल युनिट आणि १८ व्हीव्हीपॅट सुरूच झाले नाहीत. १० बॅलेट युनिट आणि ५ कंट्रोल युनिट आणि ७ व्हीव्हीपॅट मतदान सुरू असताना बंद पडले. ०.७५ टक्के यंत्र मॉकपोलदरम्यान बंद पडले, तर ०.३० टक्के ईव्हीएम मतदान सुरू असताना बंद पडले. काही ठिकाणी व्हीव्हीपॅट हळू सुरू होत असल्याच्या तक्रारीही आल्या. १५ सेकंद व्हीव्हीपॅटसाठी गेले. १ हजार मतांसाठी १५ हजार सेकंदांचा वेळ जाणार असल्याचे गृहीत धरून आयोगाने १ तास मतदानाची वेळ वाढविली. शहरात जवळपास ९० बुथवर अतिरिक्त मनुष्यबळदेखील वाढवून देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

गंगापूर तालुक्यातील एका गावाचा बहिष्कार कायम

गंगापूर तालुक्यातील शहीदपूरवाडी या गावातील ग्रामस्थांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार कायम आहे. सदरील गाव वैजापूर मतदारसंघात आहे. रस्त्याचे काम मागील पाच वर्षांत रखडल्यामुळे ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. गटविकास अधिकारी, नायब तहसीलदारांनी ग्रामस्थांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यामुळे काहीही फरक पडला नाही.

शारदा मंदिरमध्ये ‘ईव्हीएम’ यंत्र पडले बंदऔरंगपुरा येथील शारदा मंदिर क न्या प्रशालेत सकाळी ‘ईव्हीएम’ यंत्र बंद पडल्यामुळे तासभर मतदान प्रक्रिया खोळंबली. मतदान केंद्रावरील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी तातडीने जिल्हा निवडणूक विभागाशी संपर्क साधून दुसऱ्या ‘ईव्हीएम’ यंत्रावर मतदान प्रक्रिया सुरू केली. या मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह फारसा दिसून आला नाही. सकाळी थोडी रांग दिसून आली; पण दुपारी १२ वाजेनंतर मात्र हे मतदान केंद्र ओस पडलेले होते. २६४ क्रमांकाच्या या केंद्रावर ६७७ मतदारांची मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

कडा कार्यालयात मतदानाला उशीरकडा कार्यालयातील मतदान केंद्र २१९ आणि २२२ वर सकाळी मतदान यंत्रात बिघाड झाला होता. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सकाळी ७ वाजता मतदान सुरु होऊ शकले नाही. केंद्रावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.  एका तासानंतर या दोन्ही केंद्रावरील यंत्रांतील बिघाड दुरुस्त झाला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019