शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
4
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
5
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
7
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
8
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
9
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
10
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
11
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
12
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
14
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
15
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
16
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
17
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
18
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
19
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
20
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल

३३ गावे टँकरग्रस्त

By admin | Updated: July 8, 2014 01:02 IST

जालना : जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्याने ग्रामीण भागातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा कायम आहे.

जालना : जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्याने ग्रामीण भागातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा कायम असून तेथे टँकरद्वारे तसेच विहिरींचे अधिग्रहण करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून होत आहे. २६ गावे व १२ वाड्यांमध्ये ३३ टँकर सुरू आहेत. तर ८७ गावे आणि १४ वाड्यांसाठी १०१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ग्रामीण भागात पावसाअभावी पेरण्यांची कामे खोळंबली. मात्र पिण्याच्या पाण्यासाठीही अनेक ठिकाणी ग्रामस्थांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. जालना तालुक्यात निपाणी पोखरी, पिंप्री डुकरी, उटवद, हडप, नसडगााव या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर या गावांसह गैबांशा वाडी, आनंदनगर या वाड्यांवर विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. बदनापूर तालुक्यात नानेगाव, कुसळी, कडेगाव, राजेवाडी, वंजारवाडी, मांजरगाव, धोपटेश्वर येथे टँकरद्वारे तसेच विहिरींचे अधिग्रहण करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील कुंभारी या गावांमध्ये एका ठिकाणी खाजगी विहीर अधिग्रहण करून तर दुसऱ्या ठिकाणी शासकीय उद्भव तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अंबड तालुक्यात कौचलवाडी, लालवाडी, किनगाव, पारनेर, पिंपरखेड, रोहिलागड, सारंगपूर, जामखेड, नागझरी, चंदनापुरी ख./ रेणापुरी तसेच मसई तांडा, विठ्ठलवाडी/ नारळेवाडी, घुंगर्डे हदगाव, गणपती नगर, शिंदेवाडी, भगवाननगर, गहिनीनाथनगर या ठिकाणी टँकर व खाजगी विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. घनसावंगी तालुक्यात कोठी, बोरगाव खुर्द, शिंदखेड तांडा येथेही दोन टँकर व खाजगी विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू असल्याचे सांगण्यात आले.काही गावांमध्ये मेपासून तर काही गावांमध्ये जून व जुलै महिन्यापासून टँकर सुरू करण्यात आले आहेत.बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस नसल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. तर पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा करणारे जलाशय, तलाव कोरडे पडले आहेत. काही विहिरींची पाणीपातळीही कमी झाल्याने ग्रामीण भागात दुष्काळाचे ढग दाटून आल्याचे चित्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)आवश्यक उपाययोजना सुरूजिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक हे जिल्ह्यातील टंचाईच्या परिस्थितीवर स्वत: लक्ष ठेवून आहेत. ज्या गावांमध्ये टँकर किंवा विहिरींचे अधिग्रहण आवश्यक असेल, तेथे त्याची व्यवस्था केली जाईल, असे जिल्हाधिकारी नायक यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.जिल्ह्यात एकूण ६४ हजार लोकांना या टंचाईचा सामना करावा लागत असून गेल्या दोन महिन्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरच्या ७७ फेऱ्या झालेल्या आहेत. या गावांमधील ८० टक्के टंचाई दूर करण्यात आल्याचा दावा प्रशासनातर्फे केला जात आहे. ग्रामीण भागात १५ शासकीय तर १८ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जालना तालुक्यात ४५, बदनापूर २३, भोकरदन ७, जाफराबाद १, अंबड २२ व घनसावंगी तालुक्यात ३ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरींमधील पाणी उपसा करून त्याद्वारे गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या आठवडाभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास अधिग्रहण करण्यासाठी विहिरींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही