शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

३३ गावे टँकरग्रस्त

By admin | Updated: July 8, 2014 01:02 IST

जालना : जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्याने ग्रामीण भागातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा कायम आहे.

जालना : जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्याने ग्रामीण भागातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा कायम असून तेथे टँकरद्वारे तसेच विहिरींचे अधिग्रहण करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून होत आहे. २६ गावे व १२ वाड्यांमध्ये ३३ टँकर सुरू आहेत. तर ८७ गावे आणि १४ वाड्यांसाठी १०१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ग्रामीण भागात पावसाअभावी पेरण्यांची कामे खोळंबली. मात्र पिण्याच्या पाण्यासाठीही अनेक ठिकाणी ग्रामस्थांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. जालना तालुक्यात निपाणी पोखरी, पिंप्री डुकरी, उटवद, हडप, नसडगााव या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर या गावांसह गैबांशा वाडी, आनंदनगर या वाड्यांवर विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. बदनापूर तालुक्यात नानेगाव, कुसळी, कडेगाव, राजेवाडी, वंजारवाडी, मांजरगाव, धोपटेश्वर येथे टँकरद्वारे तसेच विहिरींचे अधिग्रहण करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील कुंभारी या गावांमध्ये एका ठिकाणी खाजगी विहीर अधिग्रहण करून तर दुसऱ्या ठिकाणी शासकीय उद्भव तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अंबड तालुक्यात कौचलवाडी, लालवाडी, किनगाव, पारनेर, पिंपरखेड, रोहिलागड, सारंगपूर, जामखेड, नागझरी, चंदनापुरी ख./ रेणापुरी तसेच मसई तांडा, विठ्ठलवाडी/ नारळेवाडी, घुंगर्डे हदगाव, गणपती नगर, शिंदेवाडी, भगवाननगर, गहिनीनाथनगर या ठिकाणी टँकर व खाजगी विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. घनसावंगी तालुक्यात कोठी, बोरगाव खुर्द, शिंदखेड तांडा येथेही दोन टँकर व खाजगी विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू असल्याचे सांगण्यात आले.काही गावांमध्ये मेपासून तर काही गावांमध्ये जून व जुलै महिन्यापासून टँकर सुरू करण्यात आले आहेत.बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस नसल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. तर पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा करणारे जलाशय, तलाव कोरडे पडले आहेत. काही विहिरींची पाणीपातळीही कमी झाल्याने ग्रामीण भागात दुष्काळाचे ढग दाटून आल्याचे चित्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)आवश्यक उपाययोजना सुरूजिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक हे जिल्ह्यातील टंचाईच्या परिस्थितीवर स्वत: लक्ष ठेवून आहेत. ज्या गावांमध्ये टँकर किंवा विहिरींचे अधिग्रहण आवश्यक असेल, तेथे त्याची व्यवस्था केली जाईल, असे जिल्हाधिकारी नायक यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.जिल्ह्यात एकूण ६४ हजार लोकांना या टंचाईचा सामना करावा लागत असून गेल्या दोन महिन्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरच्या ७७ फेऱ्या झालेल्या आहेत. या गावांमधील ८० टक्के टंचाई दूर करण्यात आल्याचा दावा प्रशासनातर्फे केला जात आहे. ग्रामीण भागात १५ शासकीय तर १८ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जालना तालुक्यात ४५, बदनापूर २३, भोकरदन ७, जाफराबाद १, अंबड २२ व घनसावंगी तालुक्यात ३ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरींमधील पाणी उपसा करून त्याद्वारे गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या आठवडाभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास अधिग्रहण करण्यासाठी विहिरींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही