शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

३३ गावे टँकरग्रस्त

By admin | Updated: July 8, 2014 01:02 IST

जालना : जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्याने ग्रामीण भागातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा कायम आहे.

जालना : जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्याने ग्रामीण भागातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा कायम असून तेथे टँकरद्वारे तसेच विहिरींचे अधिग्रहण करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून होत आहे. २६ गावे व १२ वाड्यांमध्ये ३३ टँकर सुरू आहेत. तर ८७ गावे आणि १४ वाड्यांसाठी १०१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ग्रामीण भागात पावसाअभावी पेरण्यांची कामे खोळंबली. मात्र पिण्याच्या पाण्यासाठीही अनेक ठिकाणी ग्रामस्थांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. जालना तालुक्यात निपाणी पोखरी, पिंप्री डुकरी, उटवद, हडप, नसडगााव या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर या गावांसह गैबांशा वाडी, आनंदनगर या वाड्यांवर विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. बदनापूर तालुक्यात नानेगाव, कुसळी, कडेगाव, राजेवाडी, वंजारवाडी, मांजरगाव, धोपटेश्वर येथे टँकरद्वारे तसेच विहिरींचे अधिग्रहण करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील कुंभारी या गावांमध्ये एका ठिकाणी खाजगी विहीर अधिग्रहण करून तर दुसऱ्या ठिकाणी शासकीय उद्भव तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अंबड तालुक्यात कौचलवाडी, लालवाडी, किनगाव, पारनेर, पिंपरखेड, रोहिलागड, सारंगपूर, जामखेड, नागझरी, चंदनापुरी ख./ रेणापुरी तसेच मसई तांडा, विठ्ठलवाडी/ नारळेवाडी, घुंगर्डे हदगाव, गणपती नगर, शिंदेवाडी, भगवाननगर, गहिनीनाथनगर या ठिकाणी टँकर व खाजगी विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. घनसावंगी तालुक्यात कोठी, बोरगाव खुर्द, शिंदखेड तांडा येथेही दोन टँकर व खाजगी विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू असल्याचे सांगण्यात आले.काही गावांमध्ये मेपासून तर काही गावांमध्ये जून व जुलै महिन्यापासून टँकर सुरू करण्यात आले आहेत.बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस नसल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. तर पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा करणारे जलाशय, तलाव कोरडे पडले आहेत. काही विहिरींची पाणीपातळीही कमी झाल्याने ग्रामीण भागात दुष्काळाचे ढग दाटून आल्याचे चित्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)आवश्यक उपाययोजना सुरूजिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक हे जिल्ह्यातील टंचाईच्या परिस्थितीवर स्वत: लक्ष ठेवून आहेत. ज्या गावांमध्ये टँकर किंवा विहिरींचे अधिग्रहण आवश्यक असेल, तेथे त्याची व्यवस्था केली जाईल, असे जिल्हाधिकारी नायक यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.जिल्ह्यात एकूण ६४ हजार लोकांना या टंचाईचा सामना करावा लागत असून गेल्या दोन महिन्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरच्या ७७ फेऱ्या झालेल्या आहेत. या गावांमधील ८० टक्के टंचाई दूर करण्यात आल्याचा दावा प्रशासनातर्फे केला जात आहे. ग्रामीण भागात १५ शासकीय तर १८ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जालना तालुक्यात ४५, बदनापूर २३, भोकरदन ७, जाफराबाद १, अंबड २२ व घनसावंगी तालुक्यात ३ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरींमधील पाणी उपसा करून त्याद्वारे गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या आठवडाभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास अधिग्रहण करण्यासाठी विहिरींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही