शहरं
Join us  
Trending Stories
1
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
2
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
3
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
4
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
5
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
6
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
7
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
8
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
9
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
10
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
11
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
12
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
13
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
14
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
15
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
16
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
17
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
18
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
19
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
20
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद

३३ गावे टँकरग्रस्त

By admin | Updated: July 8, 2014 01:02 IST

जालना : जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्याने ग्रामीण भागातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा कायम आहे.

जालना : जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्याने ग्रामीण भागातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा कायम असून तेथे टँकरद्वारे तसेच विहिरींचे अधिग्रहण करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून होत आहे. २६ गावे व १२ वाड्यांमध्ये ३३ टँकर सुरू आहेत. तर ८७ गावे आणि १४ वाड्यांसाठी १०१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ग्रामीण भागात पावसाअभावी पेरण्यांची कामे खोळंबली. मात्र पिण्याच्या पाण्यासाठीही अनेक ठिकाणी ग्रामस्थांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. जालना तालुक्यात निपाणी पोखरी, पिंप्री डुकरी, उटवद, हडप, नसडगााव या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर या गावांसह गैबांशा वाडी, आनंदनगर या वाड्यांवर विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. बदनापूर तालुक्यात नानेगाव, कुसळी, कडेगाव, राजेवाडी, वंजारवाडी, मांजरगाव, धोपटेश्वर येथे टँकरद्वारे तसेच विहिरींचे अधिग्रहण करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील कुंभारी या गावांमध्ये एका ठिकाणी खाजगी विहीर अधिग्रहण करून तर दुसऱ्या ठिकाणी शासकीय उद्भव तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अंबड तालुक्यात कौचलवाडी, लालवाडी, किनगाव, पारनेर, पिंपरखेड, रोहिलागड, सारंगपूर, जामखेड, नागझरी, चंदनापुरी ख./ रेणापुरी तसेच मसई तांडा, विठ्ठलवाडी/ नारळेवाडी, घुंगर्डे हदगाव, गणपती नगर, शिंदेवाडी, भगवाननगर, गहिनीनाथनगर या ठिकाणी टँकर व खाजगी विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. घनसावंगी तालुक्यात कोठी, बोरगाव खुर्द, शिंदखेड तांडा येथेही दोन टँकर व खाजगी विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू असल्याचे सांगण्यात आले.काही गावांमध्ये मेपासून तर काही गावांमध्ये जून व जुलै महिन्यापासून टँकर सुरू करण्यात आले आहेत.बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस नसल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. तर पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा करणारे जलाशय, तलाव कोरडे पडले आहेत. काही विहिरींची पाणीपातळीही कमी झाल्याने ग्रामीण भागात दुष्काळाचे ढग दाटून आल्याचे चित्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)आवश्यक उपाययोजना सुरूजिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक हे जिल्ह्यातील टंचाईच्या परिस्थितीवर स्वत: लक्ष ठेवून आहेत. ज्या गावांमध्ये टँकर किंवा विहिरींचे अधिग्रहण आवश्यक असेल, तेथे त्याची व्यवस्था केली जाईल, असे जिल्हाधिकारी नायक यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.जिल्ह्यात एकूण ६४ हजार लोकांना या टंचाईचा सामना करावा लागत असून गेल्या दोन महिन्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरच्या ७७ फेऱ्या झालेल्या आहेत. या गावांमधील ८० टक्के टंचाई दूर करण्यात आल्याचा दावा प्रशासनातर्फे केला जात आहे. ग्रामीण भागात १५ शासकीय तर १८ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जालना तालुक्यात ४५, बदनापूर २३, भोकरदन ७, जाफराबाद १, अंबड २२ व घनसावंगी तालुक्यात ३ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरींमधील पाणी उपसा करून त्याद्वारे गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या आठवडाभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास अधिग्रहण करण्यासाठी विहिरींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही