शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

३३ हजार विद्यार्थी पोषण आहाराविना

By admin | Updated: May 31, 2016 00:04 IST

आष्टी : तालुक्यात टंचाईच्या उपाययोजना करताना सुटीत विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरु ठेवावी असे आदेश आहेत. मात्र,

आष्टी : तालुक्यात टंचाईच्या उपाययोजना करताना सुटीत विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरु ठेवावी असे आदेश आहेत. मात्र, तालुक्यातील एक शाळा सोडता इतर शाळांनी शासनच्या आदेशाला केराची टोपली दाखिवली आहे. केवळ पाण्याचा प्रश्न सांगता खिचडीला खोडा दिला असल्याने ३३ हजार विद्यार्थी खिचडीविना आहेत. शिक्षण विभाग मात्र याकडे डोळेझाक करीत आसल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.तालुक्यात जि.प. च्या २७५ तर खाजगी ७५ अशा ३५० शाळा आहेत. मात्र, यापैकी फक्त एका शाळेत म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचाळा येथे मध्यान्ह भोजन योजना सुरू आहे. पहिली ते आठवी असे ३३ हजार विद्यार्थी आहेत. त्यांना पोषण आहार मिळावा यासाठी मिहन्याकाठी तेरा लाख रूपये खर्च शासन करत आहे. मात्र, आष्टी तालुक्यातील शिक्षण विभाग अपवाद ठरत आहे. उन्हाळी सुटीत दिला जाणारा पोषण आहार पाणी टंचाईचे कारण दाखवून दिला जात नसल्याने दुष्काळात तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे खिचडीपासून वंचित राहत आहेत.पाणी टंचाई असेल तर टँकरने पाणीपुरवठा करत खिचडी शिकवावी असे आदेश असतांना याकडे दुर्लक्ष का होत आहे ? मग शिक्षण विभाग मग लाखो रूपये खर्च का विनाकारण करत आहे ? शाळेत पोषण आहार न देणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी होत आहे. स्वयंपाकी, इंधन, भाजीपाला, बिस्कीट यासाठी दरमहा तेरा लाख रूपये खर्च होतो. गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव म्हणाले की, शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांनी पाणी नसल्याचे लेखी दिल्याने पोषण आहार दिला जात नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)