शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

३२८५ ग्राहकांची वीज तोडली

By admin | Updated: January 21, 2017 00:11 IST

औरंगाबाद : महावितरण कंपनीने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ३ हजार २८५ वीज ग्राहकांचे कनेक्शन कापले.

औरंगाबाद : महावितरण कंपनीने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ३ हजार २८५ वीज ग्राहकांचे कनेक्शन कापले. १९ कोटी ३० लाख रुपये थकबाकीसाठी त्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वारंवार सूचना देऊनही वीज बिलांचा भरणा न करणाऱ्या १७५२ ग्राहकांचा वीजपुरवठा १८ कोटी ९६ लाख रुपये थकबाकीपोटी कायमस्वरुपी खंडित करण्यात आला. तर ४ हजार १३० वीज ग्राहकांकडून १७ कोटी ६४ लाख रुपये वसूल करण्यात आले. दोन्ही जिल्ह्यांत ३१ डिसेंबर २०१६ ते आजपर्यंत वीज बिल थकबाकीदारांची वीज खंडित करण्याची मोहीम कंपनीने राबविली. या मोहिमेत औरंगाबाद शहरातील ७ कोटी २८ लाख रुपये थकबाकी असलेल्या १ हजार ९२ वीज ग्राहकांची वीज खंडित करण्यात आली. तर १३ कोटी ७ लाख रुपये थकबाकीपोटी १ हजार ४८ वीज ग्राहकांची कायमस्वरुपी वीज कापली.२५१४ वीज ग्राहकांकडून १० कोटी ४५ लाख रुपये वसूल करण्यात आले. औरंगाबाद ग्रामीणमध्ये १ कोटी ५५ लाख रुपये थकबाकी असलेल्या ५४८ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपासाठी कापला. तसेच २३० ग्राहकांचा ६६ लाख थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा कापण्यात आला. तर ९३० वीज ग्राहकांकडून ५ कोटी ५९ लाख रुपये वसूल करण्यात आले. जालना जिल्ह्यात १० कोटी ४५ लाख थकबाकी असलेल्या १६४५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. ४७४ ग्राहकांचा ५ कोटी २२ लाख रुपये थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तर ६५६ वीज ग्राहकांकडून ९ कोटी ५९ लाख रुपये वसूल करण्यात आले. (प्रतिनिधी)