शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

३२८५ ग्राहकांची वीज तोडली

By admin | Updated: January 21, 2017 00:11 IST

औरंगाबाद : महावितरण कंपनीने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ३ हजार २८५ वीज ग्राहकांचे कनेक्शन कापले.

औरंगाबाद : महावितरण कंपनीने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ३ हजार २८५ वीज ग्राहकांचे कनेक्शन कापले. १९ कोटी ३० लाख रुपये थकबाकीसाठी त्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वारंवार सूचना देऊनही वीज बिलांचा भरणा न करणाऱ्या १७५२ ग्राहकांचा वीजपुरवठा १८ कोटी ९६ लाख रुपये थकबाकीपोटी कायमस्वरुपी खंडित करण्यात आला. तर ४ हजार १३० वीज ग्राहकांकडून १७ कोटी ६४ लाख रुपये वसूल करण्यात आले. दोन्ही जिल्ह्यांत ३१ डिसेंबर २०१६ ते आजपर्यंत वीज बिल थकबाकीदारांची वीज खंडित करण्याची मोहीम कंपनीने राबविली. या मोहिमेत औरंगाबाद शहरातील ७ कोटी २८ लाख रुपये थकबाकी असलेल्या १ हजार ९२ वीज ग्राहकांची वीज खंडित करण्यात आली. तर १३ कोटी ७ लाख रुपये थकबाकीपोटी १ हजार ४८ वीज ग्राहकांची कायमस्वरुपी वीज कापली.२५१४ वीज ग्राहकांकडून १० कोटी ४५ लाख रुपये वसूल करण्यात आले. औरंगाबाद ग्रामीणमध्ये १ कोटी ५५ लाख रुपये थकबाकी असलेल्या ५४८ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपासाठी कापला. तसेच २३० ग्राहकांचा ६६ लाख थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा कापण्यात आला. तर ९३० वीज ग्राहकांकडून ५ कोटी ५९ लाख रुपये वसूल करण्यात आले. जालना जिल्ह्यात १० कोटी ४५ लाख थकबाकी असलेल्या १६४५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. ४७४ ग्राहकांचा ५ कोटी २२ लाख रुपये थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तर ६५६ वीज ग्राहकांकडून ९ कोटी ५९ लाख रुपये वसूल करण्यात आले. (प्रतिनिधी)