शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

३२८५ ग्राहकांची वीज तोडली

By admin | Updated: January 21, 2017 00:11 IST

औरंगाबाद : महावितरण कंपनीने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ३ हजार २८५ वीज ग्राहकांचे कनेक्शन कापले.

औरंगाबाद : महावितरण कंपनीने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ३ हजार २८५ वीज ग्राहकांचे कनेक्शन कापले. १९ कोटी ३० लाख रुपये थकबाकीसाठी त्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वारंवार सूचना देऊनही वीज बिलांचा भरणा न करणाऱ्या १७५२ ग्राहकांचा वीजपुरवठा १८ कोटी ९६ लाख रुपये थकबाकीपोटी कायमस्वरुपी खंडित करण्यात आला. तर ४ हजार १३० वीज ग्राहकांकडून १७ कोटी ६४ लाख रुपये वसूल करण्यात आले. दोन्ही जिल्ह्यांत ३१ डिसेंबर २०१६ ते आजपर्यंत वीज बिल थकबाकीदारांची वीज खंडित करण्याची मोहीम कंपनीने राबविली. या मोहिमेत औरंगाबाद शहरातील ७ कोटी २८ लाख रुपये थकबाकी असलेल्या १ हजार ९२ वीज ग्राहकांची वीज खंडित करण्यात आली. तर १३ कोटी ७ लाख रुपये थकबाकीपोटी १ हजार ४८ वीज ग्राहकांची कायमस्वरुपी वीज कापली.२५१४ वीज ग्राहकांकडून १० कोटी ४५ लाख रुपये वसूल करण्यात आले. औरंगाबाद ग्रामीणमध्ये १ कोटी ५५ लाख रुपये थकबाकी असलेल्या ५४८ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपासाठी कापला. तसेच २३० ग्राहकांचा ६६ लाख थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा कापण्यात आला. तर ९३० वीज ग्राहकांकडून ५ कोटी ५९ लाख रुपये वसूल करण्यात आले. जालना जिल्ह्यात १० कोटी ४५ लाख थकबाकी असलेल्या १६४५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. ४७४ ग्राहकांचा ५ कोटी २२ लाख रुपये थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तर ६५६ वीज ग्राहकांकडून ९ कोटी ५९ लाख रुपये वसूल करण्यात आले. (प्रतिनिधी)