शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३२२ गावे स्मशानभूमीविना!

By admin | Updated: May 14, 2014 00:28 IST

सुनील कच्छवे , औ औरंगाबाद जिल्ह्यात अनेक गावांमध्ये साधी स्मशानभूमीची सोयही उपलब्ध झालेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सुनील कच्छवे , औरंगाबाद स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही पुरोगामी विचारांनी ‘पुढार’लेल्या महाराष्टÑातील औरंगाबाद जिल्ह्यात अनेक गावांमध्ये साधी स्मशानभूमीची सोयही उपलब्ध झालेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील १,३९२ पैकी तब्बल सव्वातीनशे गावांमध्ये स्मशानभूमीच नाही. या गावांना नागरिकांना ‘अंतिम’ संस्कारासाठी हक्काची दोन गज जागा देण्याचे औदार्य सत्ताधारी किंवा प्रशासनाने दाखविले नाही. मागील अनेक वर्षांपासून या गावांमधील नागरिक शेजारच्या गावांतील स्मशानभूमीवर अवलंबून आहेत. विशेषत: पावसाळ्यात अंतिम संस्कार करताना नातेवाईकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. पृथ्वीतलावर जन्माला आलेला प्रत्येक माणूस कधी ना कधी मरणारच. त्यामुळे मृत्यूनंतर त्याच्या आयुष्यातील शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्काराचा विधी तरी चांगल्या वातावरणात पार पडावा अशी सर्वांची अपेक्षा असते. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील ३२२ गावांमध्ये अंत्यसंस्कारासाठी जागाच उपलब्ध नाही. आजवरच्या इतिहासात ग्रामपंचायतींना हा प्रश्न सोडविणे शक्य झालेले नाही. काही गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही, तर काही ठिकाणी जागा असली तरी त्यावर शेड नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. इतर कुण्याच्या तरी खाजगी जागेत किंवा नदी, नाल्याकाठी अंत्यसंस्कार उरकावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. गावांचा ‘कारभार’ पाहणार्‍या ग्रामपंचायतींनी किंवा जिल्हा परिषद प्रशासनानेही याकडे गांभीर्याने पाहिले नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण १,३९२ महसुली खेडी आहेत. त्यापैकी आजघडीला ३२२ गावांमध्ये स्मशानभूमीसाठी हक्काची जागा नाही. स्मशानभूमीसाठी जेमतेम २० गुंठे जागा पुरेशी आहे. प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि दुर्लक्षामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना अनेक अडचणी येतात. भर पावसाळ्यात एखाद्या नागरिकावर अंत्यसंस्कार करायची वेळ आल्यास नातेवकार्इंना खूप त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्तेही नाहीत. त्यामुळे जास्त चिखल झाल्यास अंत्यसंस्कारासाठी काही काळ पाहण्याची वेळ येते. २० गावांमधील स्मशानभूमींवर अतिक्रमण जिल्ह्यातील काही गावांमध्ये सात बाराच्या उतार्‍यावर स्मशानभूमीची नोंद आहे; पण ती विशिष्ट लोकांनी बळकावली आहे. काही ठिकाणी एखाद्या शेतमालकाने फार पूर्वी स्मशानभूमीसाठी जागेचा तुकडा दिला होता; पण आता जागेचे भाव गगनाला भिडल्यामुळे त्याने ती जागा ताब्यात घेतली आहे. जिल्ह्यात २० गावांमधील स्मशानभूमीवर अतिक्रमण झाल्याची जिल्हा परिषदेकडे नोंद आहे.