शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

जिल्ह्यात ३२२ गावे स्मशानभूमीविना!

By admin | Updated: May 14, 2014 00:28 IST

सुनील कच्छवे , औ औरंगाबाद जिल्ह्यात अनेक गावांमध्ये साधी स्मशानभूमीची सोयही उपलब्ध झालेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सुनील कच्छवे , औरंगाबाद स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही पुरोगामी विचारांनी ‘पुढार’लेल्या महाराष्टÑातील औरंगाबाद जिल्ह्यात अनेक गावांमध्ये साधी स्मशानभूमीची सोयही उपलब्ध झालेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील १,३९२ पैकी तब्बल सव्वातीनशे गावांमध्ये स्मशानभूमीच नाही. या गावांना नागरिकांना ‘अंतिम’ संस्कारासाठी हक्काची दोन गज जागा देण्याचे औदार्य सत्ताधारी किंवा प्रशासनाने दाखविले नाही. मागील अनेक वर्षांपासून या गावांमधील नागरिक शेजारच्या गावांतील स्मशानभूमीवर अवलंबून आहेत. विशेषत: पावसाळ्यात अंतिम संस्कार करताना नातेवाईकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. पृथ्वीतलावर जन्माला आलेला प्रत्येक माणूस कधी ना कधी मरणारच. त्यामुळे मृत्यूनंतर त्याच्या आयुष्यातील शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्काराचा विधी तरी चांगल्या वातावरणात पार पडावा अशी सर्वांची अपेक्षा असते. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील ३२२ गावांमध्ये अंत्यसंस्कारासाठी जागाच उपलब्ध नाही. आजवरच्या इतिहासात ग्रामपंचायतींना हा प्रश्न सोडविणे शक्य झालेले नाही. काही गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही, तर काही ठिकाणी जागा असली तरी त्यावर शेड नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. इतर कुण्याच्या तरी खाजगी जागेत किंवा नदी, नाल्याकाठी अंत्यसंस्कार उरकावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. गावांचा ‘कारभार’ पाहणार्‍या ग्रामपंचायतींनी किंवा जिल्हा परिषद प्रशासनानेही याकडे गांभीर्याने पाहिले नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण १,३९२ महसुली खेडी आहेत. त्यापैकी आजघडीला ३२२ गावांमध्ये स्मशानभूमीसाठी हक्काची जागा नाही. स्मशानभूमीसाठी जेमतेम २० गुंठे जागा पुरेशी आहे. प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि दुर्लक्षामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना अनेक अडचणी येतात. भर पावसाळ्यात एखाद्या नागरिकावर अंत्यसंस्कार करायची वेळ आल्यास नातेवकार्इंना खूप त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्तेही नाहीत. त्यामुळे जास्त चिखल झाल्यास अंत्यसंस्कारासाठी काही काळ पाहण्याची वेळ येते. २० गावांमधील स्मशानभूमींवर अतिक्रमण जिल्ह्यातील काही गावांमध्ये सात बाराच्या उतार्‍यावर स्मशानभूमीची नोंद आहे; पण ती विशिष्ट लोकांनी बळकावली आहे. काही ठिकाणी एखाद्या शेतमालकाने फार पूर्वी स्मशानभूमीसाठी जागेचा तुकडा दिला होता; पण आता जागेचे भाव गगनाला भिडल्यामुळे त्याने ती जागा ताब्यात घेतली आहे. जिल्ह्यात २० गावांमधील स्मशानभूमीवर अतिक्रमण झाल्याची जिल्हा परिषदेकडे नोंद आहे.