शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील ३२ जनावरांना ‘लम्पी’ची लागण; जनावरांचे बाजार, प्रदर्शन, शर्यतीस बंदी

By विजय सरवदे | Updated: September 13, 2022 14:51 IST

जिल्ह्यातील औरंगाबादसह सिल्लोड, सोयगाव, पैठण आणि गंगापूर या पाच तालुक्यांतील ८ गावांमध्ये ३२ जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ३२ पशुधनाला लम्पी रोगाची लागण झाली असून, हळूहळू हा रोग पाय पसरू लागला आहे. त्यामुळे पशुधन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या रोगाने एकाही जनावराचा मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यातील औरंगाबादसह सिल्लोड, सोयगाव, पैठण आणि गंगापूर या पाच तालुक्यांतील ८ गावांमध्ये ३२ जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. यात औरंगाबाद तालुक्यातील तिसगाव, सिल्लोड तालुक्यातील बाळापूर, सोयगाव तालुक्यातील फर्दापूर, पैठण तालुक्यातील शेकटा, ढाकेफळ, कौडगाव, तर गंगापूर तालुक्यातील गंगापूर या गावांचा समावेश आहे. असे असले तरी यापैकी २९ जनावरे औषधोपचारानंतर बरे झाली आहेत. या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या उपचारासाठी कोणत्याही प्रकारचे लसीकरण व उपचाराचे सेवा शुल्क न आकारण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. इतर प्राण्यांमध्ये संसर्ग पसरू नये यासाठी पशू मालकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

संसर्ग कळवा, अन्यथा कारवाईया रोगाची लक्षणे आढळून आल्यास संबंधित पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेत लेखी स्वरूपात माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माहिती लपविल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे. उपचारासाठी शासकीय पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्यात यावेत. संसर्गित पशू मृत झाल्यास त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, नगर पंचायत, महापालिका यांच्यावर राहणार आहे. याच्या उपाययोजनेसाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय रॅपिड ॲक्शन टीम तयार करण्यात आल्या आहेत.

जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषितदरम्यान, लम्पी प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र घोषित केले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील जनावरांचे बाजार, जत्रा, प्रदर्शन, जनावरांची ने-आण, शर्यतीवर बंदी घातली आहे.

जिल्ह्यातील पशुधनाची स्थितीएकूण पशुधन- ६, २६, ८८८गायवर्गीय- ५, ३४, ३९४म्हैसवर्गीय- ९२, ४९४एकूण बाधित तालुके- ५एकूण बाधीत गावांची संख्या- ८५ किमी परिघातील गावांची संख्या- २९बाधीत पशुधन- ३२बरे झालेले पशुधन- २९लसीकरण केलेले पशुधन- ५५२५मृत जनावरे- ००

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादagricultureशेती