शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

व्यापाऱ्यांना विवरणपत्रासाठी ३१ आॅगस्टची डेडलाईन

By admin | Updated: August 30, 2014 00:01 IST

नांदेड: एलबीटी किंवा जकात यासंदर्भातील निर्णय प्रलंबित असताना महापालिकेने व्यापाऱ्यांना विवरणपत्र दाखल करण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत अंतिम मुदत दिली आहे़

नांदेड: एलबीटी किंवा जकात यासंदर्भातील निर्णय प्रलंबित असताना महापालिकेने व्यापाऱ्यांना विवरणपत्र दाखल करण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत अंतिम मुदत दिली आहे़ शहरातील व्यापाऱ्यांचा एलबीटीला विरोध असताना मनपाने दिलेल्या जाहीर सूचनेचे पालन किती व्यापारी करणार, याकडे लक्ष लागले आहे़ शहरात केवळ सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर एलबीटीचा उपक्रम हाती घेण्यात आला होता़ नंतर तो कायमस्वरूपी केला़ राज्य शासनाने महापालिका हद्दीत लागू केलेली एलबीटी चार वर्षांपासून सुरू आहे़ अनेकदा किरकोळ बाबींवरून व्यापाऱ्यांवर धाड टाकून प्रतिष्ठान बंद केले जाते़ या धाडसत्राला कंटाळून व्यापाऱ्यांनीे वेळोवेळी आंदोलने केले़ दरम्यान, राज्य शासनाने एलबीटी किंंवा जकात हा निर्णय संबंधित महापालिकेवर सोपविला़ त्यानुसार नांदेड महापालिकेने हा निर्णय अद्याप जाहीर केला नाही़ एलबीटी किंवा जकात यासंदर्भात सर्वसाधारण सभा किंवा स्थायी समितीच्या सभेत कोणताच ठराव सादर करण्यात आला नाही़ परंतु एलबीटीची अंमलबजावणी सुरू आहे़ काही व्यापाऱ्यांनी नोटीस देवूनही आपले विवरणपत्र दाखल केले नाही़ त्यामुळे अशा व्यापाऱ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे़ मुदतीनंतर जे व्यापारी विवरणपत्रे दाखल करणार नाहीत, त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे़ मागील तीन वर्षांपासून महापालिकेच्या उत्पन्नात भर घालणाऱ्या स्थानिक संस्था कराने यंदाही ४५ कोटींची वसुली केली आहे़ एकीकडे व्यापाऱ्यांनी एलबीटी विरोधात रणशिंग फुंकले असतानाच महापालिकेने सर्वाधिक वसुलीचे उद्दिष्ट साध्य केले आहे़ मनपाच्या उत्पन्न वाढीचे प्रमुख स्त्रोत असलेल्या स्थानिक संस्था कराची वसुली मोहीम यावर्षी अडथळ्यांच्या शर्यतीत पार पडली़ ऐन मार्च तोंडावर असताना फेब्रुवारी महिन्यात व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन करून एलबीटी न भरण्याचा पवित्रा घेतला होता़ त्यामुळे वसुलीचे मोठे आव्हान मनपा प्रशासनासमोर होते़ व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे एलबीटी वसुलीवर मोठा परिणाम झाला़ व्यापाऱ्यांनी एलबीटीचे नाममात्र मासिक चालान भरण्याचे ठरविल्याने मार्च महिन्यात विशेष वसुली होवू शकली नाही़ त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने वसुलीला पुन्हा खीळ बसली़ अखेर ४५ कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले़ सन २०१३- १४ या आर्थिक वर्षात एप्रिल २०१३ ते फेब्रुवारी २०१४ पर्यंत ३७ कोटी १६ लाख रूपयांची वसुली करण्यात आली़ सन २०११- १२ या वर्षात मनपाने ४३ कोटी १८ लाख एवढा महसूल प्राप्त केला होता़ मनपासमोर सन २०१४- १५ या वर्षात ७० कोटींचे उद्दिष्ट समोर आहे़ (प्रतिनिधी)