शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांना विवरणपत्रासाठी ३१ आॅगस्टची डेडलाईन

By admin | Updated: August 30, 2014 00:01 IST

नांदेड: एलबीटी किंवा जकात यासंदर्भातील निर्णय प्रलंबित असताना महापालिकेने व्यापाऱ्यांना विवरणपत्र दाखल करण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत अंतिम मुदत दिली आहे़

नांदेड: एलबीटी किंवा जकात यासंदर्भातील निर्णय प्रलंबित असताना महापालिकेने व्यापाऱ्यांना विवरणपत्र दाखल करण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत अंतिम मुदत दिली आहे़ शहरातील व्यापाऱ्यांचा एलबीटीला विरोध असताना मनपाने दिलेल्या जाहीर सूचनेचे पालन किती व्यापारी करणार, याकडे लक्ष लागले आहे़ शहरात केवळ सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर एलबीटीचा उपक्रम हाती घेण्यात आला होता़ नंतर तो कायमस्वरूपी केला़ राज्य शासनाने महापालिका हद्दीत लागू केलेली एलबीटी चार वर्षांपासून सुरू आहे़ अनेकदा किरकोळ बाबींवरून व्यापाऱ्यांवर धाड टाकून प्रतिष्ठान बंद केले जाते़ या धाडसत्राला कंटाळून व्यापाऱ्यांनीे वेळोवेळी आंदोलने केले़ दरम्यान, राज्य शासनाने एलबीटी किंंवा जकात हा निर्णय संबंधित महापालिकेवर सोपविला़ त्यानुसार नांदेड महापालिकेने हा निर्णय अद्याप जाहीर केला नाही़ एलबीटी किंवा जकात यासंदर्भात सर्वसाधारण सभा किंवा स्थायी समितीच्या सभेत कोणताच ठराव सादर करण्यात आला नाही़ परंतु एलबीटीची अंमलबजावणी सुरू आहे़ काही व्यापाऱ्यांनी नोटीस देवूनही आपले विवरणपत्र दाखल केले नाही़ त्यामुळे अशा व्यापाऱ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे़ मुदतीनंतर जे व्यापारी विवरणपत्रे दाखल करणार नाहीत, त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे़ मागील तीन वर्षांपासून महापालिकेच्या उत्पन्नात भर घालणाऱ्या स्थानिक संस्था कराने यंदाही ४५ कोटींची वसुली केली आहे़ एकीकडे व्यापाऱ्यांनी एलबीटी विरोधात रणशिंग फुंकले असतानाच महापालिकेने सर्वाधिक वसुलीचे उद्दिष्ट साध्य केले आहे़ मनपाच्या उत्पन्न वाढीचे प्रमुख स्त्रोत असलेल्या स्थानिक संस्था कराची वसुली मोहीम यावर्षी अडथळ्यांच्या शर्यतीत पार पडली़ ऐन मार्च तोंडावर असताना फेब्रुवारी महिन्यात व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन करून एलबीटी न भरण्याचा पवित्रा घेतला होता़ त्यामुळे वसुलीचे मोठे आव्हान मनपा प्रशासनासमोर होते़ व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे एलबीटी वसुलीवर मोठा परिणाम झाला़ व्यापाऱ्यांनी एलबीटीचे नाममात्र मासिक चालान भरण्याचे ठरविल्याने मार्च महिन्यात विशेष वसुली होवू शकली नाही़ त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने वसुलीला पुन्हा खीळ बसली़ अखेर ४५ कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले़ सन २०१३- १४ या आर्थिक वर्षात एप्रिल २०१३ ते फेब्रुवारी २०१४ पर्यंत ३७ कोटी १६ लाख रूपयांची वसुली करण्यात आली़ सन २०११- १२ या वर्षात मनपाने ४३ कोटी १८ लाख एवढा महसूल प्राप्त केला होता़ मनपासमोर सन २०१४- १५ या वर्षात ७० कोटींचे उद्दिष्ट समोर आहे़ (प्रतिनिधी)