शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांना विवरणपत्रासाठी ३१ आॅगस्टची डेडलाईन

By admin | Updated: August 30, 2014 00:01 IST

नांदेड: एलबीटी किंवा जकात यासंदर्भातील निर्णय प्रलंबित असताना महापालिकेने व्यापाऱ्यांना विवरणपत्र दाखल करण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत अंतिम मुदत दिली आहे़

नांदेड: एलबीटी किंवा जकात यासंदर्भातील निर्णय प्रलंबित असताना महापालिकेने व्यापाऱ्यांना विवरणपत्र दाखल करण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत अंतिम मुदत दिली आहे़ शहरातील व्यापाऱ्यांचा एलबीटीला विरोध असताना मनपाने दिलेल्या जाहीर सूचनेचे पालन किती व्यापारी करणार, याकडे लक्ष लागले आहे़ शहरात केवळ सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर एलबीटीचा उपक्रम हाती घेण्यात आला होता़ नंतर तो कायमस्वरूपी केला़ राज्य शासनाने महापालिका हद्दीत लागू केलेली एलबीटी चार वर्षांपासून सुरू आहे़ अनेकदा किरकोळ बाबींवरून व्यापाऱ्यांवर धाड टाकून प्रतिष्ठान बंद केले जाते़ या धाडसत्राला कंटाळून व्यापाऱ्यांनीे वेळोवेळी आंदोलने केले़ दरम्यान, राज्य शासनाने एलबीटी किंंवा जकात हा निर्णय संबंधित महापालिकेवर सोपविला़ त्यानुसार नांदेड महापालिकेने हा निर्णय अद्याप जाहीर केला नाही़ एलबीटी किंवा जकात यासंदर्भात सर्वसाधारण सभा किंवा स्थायी समितीच्या सभेत कोणताच ठराव सादर करण्यात आला नाही़ परंतु एलबीटीची अंमलबजावणी सुरू आहे़ काही व्यापाऱ्यांनी नोटीस देवूनही आपले विवरणपत्र दाखल केले नाही़ त्यामुळे अशा व्यापाऱ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे़ मुदतीनंतर जे व्यापारी विवरणपत्रे दाखल करणार नाहीत, त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे़ मागील तीन वर्षांपासून महापालिकेच्या उत्पन्नात भर घालणाऱ्या स्थानिक संस्था कराने यंदाही ४५ कोटींची वसुली केली आहे़ एकीकडे व्यापाऱ्यांनी एलबीटी विरोधात रणशिंग फुंकले असतानाच महापालिकेने सर्वाधिक वसुलीचे उद्दिष्ट साध्य केले आहे़ मनपाच्या उत्पन्न वाढीचे प्रमुख स्त्रोत असलेल्या स्थानिक संस्था कराची वसुली मोहीम यावर्षी अडथळ्यांच्या शर्यतीत पार पडली़ ऐन मार्च तोंडावर असताना फेब्रुवारी महिन्यात व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन करून एलबीटी न भरण्याचा पवित्रा घेतला होता़ त्यामुळे वसुलीचे मोठे आव्हान मनपा प्रशासनासमोर होते़ व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे एलबीटी वसुलीवर मोठा परिणाम झाला़ व्यापाऱ्यांनी एलबीटीचे नाममात्र मासिक चालान भरण्याचे ठरविल्याने मार्च महिन्यात विशेष वसुली होवू शकली नाही़ त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने वसुलीला पुन्हा खीळ बसली़ अखेर ४५ कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले़ सन २०१३- १४ या आर्थिक वर्षात एप्रिल २०१३ ते फेब्रुवारी २०१४ पर्यंत ३७ कोटी १६ लाख रूपयांची वसुली करण्यात आली़ सन २०११- १२ या वर्षात मनपाने ४३ कोटी १८ लाख एवढा महसूल प्राप्त केला होता़ मनपासमोर सन २०१४- १५ या वर्षात ७० कोटींचे उद्दिष्ट समोर आहे़ (प्रतिनिधी)