शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

सहा महिन्यांत तयार झाले ३०० शेततळे; ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 13:04 IST

कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. येथील ८८४ पात्र लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ३०० शेतकऱ्यांनी शेततळ्यांची कामे पूर्ण केली आहेत.

ठळक मुद्देया शेततळ्यांसाठी चांगला प्रतिसाद देत सुमारे ९५७ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. यापैकी ८८४ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

- रऊफ शेख 

फुलंब्री ( औरंगाबाद ): तालुक्यात कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. येथील ८८४ पात्र लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ३०० शेतकऱ्यांनी शेततळ्यांची कामे पूर्ण केली आहेत. उर्वरित शेततळी लवकरच पूर्ण करण्यात येणार असून, ३०० हून अधिक शेततळ्यांची कामे पूर्ण केल्यामुळे आगामी काळात पिकांच्या उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृषी विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत यंदा ४१३ शेततळे देण्याचे ठरविले होते. यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या शेततळ्यांसाठी चांगला प्रतिसाद देत सुमारे ९५७ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. यापैकी ८८४ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. यापैकी गत सहा महिन्यांत तालुक्यातील ३०० शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांना शेततळे मंजुरीचे पत्र देण्यात आले आहे. यामुळे आगामी काळात उत्पादन वाढीमुळे बळीराजाला सुगीचे दिवस येतील, यात शंका नाही. 

तालुक्यात दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पिके जगविण्यासाठी शेततळ्यांशिवाय पर्याय नाही. यामुळेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. पावसाळ्यात पाऊस न झाल्यास पिकांवर ताण येतो. यामुळे हातातोंडाशी आलेले पीक पाण्याअभावी जळून जाते; मात्र आता शेततळ्यांमुळे पिकांना आधार मिळणार आहे. 

दरम्यान, फुलंब्री तालुक्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत आतापर्यंत ८८४ शेतकऱ्यांच्या शेततळ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. या सर्व लाभार्थ्यांना टप्याटप्प्याने योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तालुक्यातील शेततळ्यांमुळे उत्पादन  वाढीस मदत होईल, असा विश्वास तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहादूर यांनी व्यक्त केला आहे.

शेततळ्याचे फायदे- पाणलोट क्षेत्राच्या भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते.- आपत्कालीन स्थितीत पिकाला पाणी देणे शक्य होते.- पिकाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ.- चिभड व पाणथळ जमीन सुधारण्यासाठी उपयोग.- मत्स्यसंवर्धन करून उत्पादन काढले जाऊ शकते.- पिकावर औषधी फवारणी करण्यासाठी पाणी मिळते.- दुष्काळ परिस्थितीत जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद