शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

३० % नागरिक पाण्यासाठी टँकरवर

By admin | Updated: April 15, 2016 01:51 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे़ जिल्ह्यातील ४९३ गावे आणि १५ वाड्यात पाण्याचे स्रोत आटले आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे़ जिल्ह्यातील ४९३ गावे आणि १५ वाड्यात पाण्याचे स्रोत आटले आहेत. तेथील साडेनऊ लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून ६४९ टँकरद्वारे १३३९ खेपांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. चार वर्षांपासून पुरेसा पाऊस झालेला नाही़ त्यामुळे लघु, मध्यम प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प कोरडेठाक झालेले आहेत. काही प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणी आहे़ विहीर, बोअर हे पाण्याचे स्रोतही आटत आहेत़ जायकवाडीच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ जिल्ह्यात सर्वाधिक टँकर सध्या गंगापूर तालुक्यात असून, आकडा १६६ आहे़ त्यापाठोपाठ पैठणमध्ये १५८, वैजापूरमध्ये १५६ टँकर सुरू आहेत़ सर्वात कमी टँकर सोयगाव तालुक्यात असून, संख्या केवळ २ आहे़ जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी सोयगाव वगळता इतर आठ तालुक्यांमध्ये दिवसागणिक टँकरच्या संख्येत वाढ होत आहे़ अनेक ठिकाणी टँकर भरण्यासाठी प्रशासनाला ५० ते ७० किलोमीटरपर्यंतचा फेरा मारावा लागत आहे़ ज्याठिकाणी पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणच्या खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचा सपाटा प्रशासनाकडून सुरू आहे़ सद्य:स्थितीत ४३४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे़ यातील २४१ विहिरींवरून टँकरमध्ये पाणी भरण्यात येत आहे़ तर उर्वरित १९३ विहिरींवरून नागरिकांना थेट पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे़ टंचाईची तीव्रता अधिक असल्याने विहीर अधिग्रहणाच्या संख्येतही वाढ होत आहे़