शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतिक्षा

By admin | Updated: January 31, 2017 00:26 IST

जालना :जिल्ह्यातील तब्बल ३० हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतिक्षेत आहेत.

जालना : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती २०१६ वर्ष संपून गेले तरी शिष्यवृत्ती मिळालेली नाही. जिल्ह्यातील तब्बल ३० हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने आॅक्टोबर २०१६ मध्ये प्रादेशिक उपआयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडे पाठविला. परंतु अद्यापही प्रस्ताव मंजूर करण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यासाठी मॅट्रीकपूर्व आणि इतर शिष्यवृत्ती देण्यात येते. काही दिवसांपूर्वी शासनाने शिष्यवृत्तीचे सर्व प्रक्रीया आॅनलाईन केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठही तालुक्यांचे प्रस्ताव यापूर्वीच समाजकल्याण विभागाला पाठविण्यात आले आहेत. शिष्यवृत्ती वाटपासाठी जि.प. समाजकल्याण विभागाने ५ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाला पाठवून एक वर्ष उलटले आहे. परंतु अद्यापही समाजकल्याण विभागाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाले नसल्याने जिल्ह्यातील तीस हजार विद्यार्थी एक वर्षापासून शिष्यवृत्तीच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत विद्यार्थी समाजकल्याण विभागात शिष्यवृत्ती मिळावी यासाठी खेटे घालत आहेत. दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ३७५ रूपये परीक्षा शुल्क, इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले ६०० रूपये शिष्यवृत्ती आणि इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ११०० रूपये ५ ते ७ विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती ५०० रूपये आणि इयत्ता ८ ते १० विद्यार्थ्यांना १ हजार रूपये तसेच अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्यांच्या पाल्यांना १८५० वार्षिक शिष्यवृत्ती तसेच इयत्ता नववी व दहावीत शिक्षण घेणाऱ्यांना भारत सरकारची मॅट्रीकपूर्व २२५० अशी शिष्यवृत्ती देण्यात येते. परंतु सलग दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळण्यास अडचणी येत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. २०१५ या वर्षाची शिष्यवृत्ती अद्याप बहुतांश विद्यार्थ्यांना मिळाली नाही. याविषयी जि.प. समाजकल्याण विभागाचे कर्मचाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की २०१५ चे वर्षात शासनाला शिष्यवृत्तीसाठी चार कोटी रूपये मागितले होते. त्यापैकी शासनाकडून २४ लाख रूपये प्राप्त झाले आहेत. त्याचे वाटप केले जात आहे.