शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
4
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
5
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
6
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
7
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
8
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
9
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
10
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
11
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
12
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
13
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
14
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
15
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
16
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
17
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
18
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
19
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
20
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

३० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतिक्षा

By admin | Updated: January 31, 2017 00:26 IST

जालना :जिल्ह्यातील तब्बल ३० हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतिक्षेत आहेत.

जालना : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती २०१६ वर्ष संपून गेले तरी शिष्यवृत्ती मिळालेली नाही. जिल्ह्यातील तब्बल ३० हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने आॅक्टोबर २०१६ मध्ये प्रादेशिक उपआयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडे पाठविला. परंतु अद्यापही प्रस्ताव मंजूर करण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यासाठी मॅट्रीकपूर्व आणि इतर शिष्यवृत्ती देण्यात येते. काही दिवसांपूर्वी शासनाने शिष्यवृत्तीचे सर्व प्रक्रीया आॅनलाईन केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठही तालुक्यांचे प्रस्ताव यापूर्वीच समाजकल्याण विभागाला पाठविण्यात आले आहेत. शिष्यवृत्ती वाटपासाठी जि.प. समाजकल्याण विभागाने ५ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाला पाठवून एक वर्ष उलटले आहे. परंतु अद्यापही समाजकल्याण विभागाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाले नसल्याने जिल्ह्यातील तीस हजार विद्यार्थी एक वर्षापासून शिष्यवृत्तीच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत विद्यार्थी समाजकल्याण विभागात शिष्यवृत्ती मिळावी यासाठी खेटे घालत आहेत. दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ३७५ रूपये परीक्षा शुल्क, इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले ६०० रूपये शिष्यवृत्ती आणि इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ११०० रूपये ५ ते ७ विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती ५०० रूपये आणि इयत्ता ८ ते १० विद्यार्थ्यांना १ हजार रूपये तसेच अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्यांच्या पाल्यांना १८५० वार्षिक शिष्यवृत्ती तसेच इयत्ता नववी व दहावीत शिक्षण घेणाऱ्यांना भारत सरकारची मॅट्रीकपूर्व २२५० अशी शिष्यवृत्ती देण्यात येते. परंतु सलग दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळण्यास अडचणी येत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. २०१५ या वर्षाची शिष्यवृत्ती अद्याप बहुतांश विद्यार्थ्यांना मिळाली नाही. याविषयी जि.प. समाजकल्याण विभागाचे कर्मचाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की २०१५ चे वर्षात शासनाला शिष्यवृत्तीसाठी चार कोटी रूपये मागितले होते. त्यापैकी शासनाकडून २४ लाख रूपये प्राप्त झाले आहेत. त्याचे वाटप केले जात आहे.