शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

३० प्रकल्प कोरडे

By admin | Updated: January 7, 2015 01:05 IST

औरंगाबाद : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर बनली आहे.

औरंगाबाद : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील १०६ पैकी तब्बल ३० लघु आणि मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर उर्वरित ७६ प्रकल्पांमध्ये जेमतेम सरासरी २० टक्के पाणीसाठा आहे. औरंगाबाद जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या ४० टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये यंदा पुरेसा साठा होऊ शकलेला नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच यंदा अनेक प्रकल्प कोरडे पडले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात १६ मध्यम आणि ९० लघु प्रकल्प आहेत. यापैकी १ मध्यम आणि २९ लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे आहेत. जिल्ह्यातील सर्व लघु आणि मध्यम प्रकल्पांची एकूण क्षमता ३९० दलघमी आहे; पण या सर्व प्रकल्पांमध्ये सध्या एकूण अवघा ७९ दलघमी इतकाच पाणीसाठा आहे. एकूण क्षमतेचा विचार करता हा साठा अवघा २० टक्के आहे. गतवर्षी याच तारखेला जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये ४३ टक्के उपयुक्त साठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. २३ प्रकल्प जोत्याखालीजिल्ह्यात ३० प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून, आणखी २३ प्रकल्पांमधील साठा जोत्याखाली आहे. त्यामुळे हे प्रकल्पही लवकरच कोरडे पडणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पांवर ज्या गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत, त्या गावांना पाणीटंचाई भेडसावण्यास सुरुवात झाली आहे.