शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

३० प्रकल्प कोरडे

By admin | Updated: January 7, 2015 01:05 IST

औरंगाबाद : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर बनली आहे.

औरंगाबाद : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील १०६ पैकी तब्बल ३० लघु आणि मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर उर्वरित ७६ प्रकल्पांमध्ये जेमतेम सरासरी २० टक्के पाणीसाठा आहे. औरंगाबाद जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या ४० टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये यंदा पुरेसा साठा होऊ शकलेला नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच यंदा अनेक प्रकल्प कोरडे पडले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात १६ मध्यम आणि ९० लघु प्रकल्प आहेत. यापैकी १ मध्यम आणि २९ लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे आहेत. जिल्ह्यातील सर्व लघु आणि मध्यम प्रकल्पांची एकूण क्षमता ३९० दलघमी आहे; पण या सर्व प्रकल्पांमध्ये सध्या एकूण अवघा ७९ दलघमी इतकाच पाणीसाठा आहे. एकूण क्षमतेचा विचार करता हा साठा अवघा २० टक्के आहे. गतवर्षी याच तारखेला जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये ४३ टक्के उपयुक्त साठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. २३ प्रकल्प जोत्याखालीजिल्ह्यात ३० प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून, आणखी २३ प्रकल्पांमधील साठा जोत्याखाली आहे. त्यामुळे हे प्रकल्पही लवकरच कोरडे पडणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पांवर ज्या गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत, त्या गावांना पाणीटंचाई भेडसावण्यास सुरुवात झाली आहे.