शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

३० प्रकल्प कोरडे

By admin | Updated: January 7, 2015 01:05 IST

औरंगाबाद : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर बनली आहे.

औरंगाबाद : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील १०६ पैकी तब्बल ३० लघु आणि मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर उर्वरित ७६ प्रकल्पांमध्ये जेमतेम सरासरी २० टक्के पाणीसाठा आहे. औरंगाबाद जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या ४० टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये यंदा पुरेसा साठा होऊ शकलेला नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच यंदा अनेक प्रकल्प कोरडे पडले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात १६ मध्यम आणि ९० लघु प्रकल्प आहेत. यापैकी १ मध्यम आणि २९ लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे आहेत. जिल्ह्यातील सर्व लघु आणि मध्यम प्रकल्पांची एकूण क्षमता ३९० दलघमी आहे; पण या सर्व प्रकल्पांमध्ये सध्या एकूण अवघा ७९ दलघमी इतकाच पाणीसाठा आहे. एकूण क्षमतेचा विचार करता हा साठा अवघा २० टक्के आहे. गतवर्षी याच तारखेला जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये ४३ टक्के उपयुक्त साठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. २३ प्रकल्प जोत्याखालीजिल्ह्यात ३० प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून, आणखी २३ प्रकल्पांमधील साठा जोत्याखाली आहे. त्यामुळे हे प्रकल्पही लवकरच कोरडे पडणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पांवर ज्या गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत, त्या गावांना पाणीटंचाई भेडसावण्यास सुरुवात झाली आहे.