शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

प्रकल्पात ३०़३४ दलघमी पाणी

By admin | Updated: August 31, 2014 00:14 IST

नांदेड: विष्णूपुरी प्रकल्पात ३०़३४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला

नांदेड: मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पात ३०़३४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला असून प्रकल्पाची पाणीपातळी ३५०़९५ मीटरपर्यंत वाढली आहे़ सद्य:स्थितीत प्रकल्पात एकूण ३७़५५ टक्के पाणी जमा झाले आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात मागील आठवड्यात ८़८३ दलघमी पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरावर पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवले होते़ परंतु पोळ्यानंतर सुरू झालेल्या पावसामुळे हे संकट काही प्रमाणात टळले आहे़ मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुष्काळाचे सावट होते़ जिल्ह्यातील लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पातील पाणीपातळी घटली होती़ विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीसाठी संपत चालल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर प्रश्न निर्माण झाला होता़ अवघे ३५ दिवस पुरेल एवढेच पाणी विष्णूपुरीत असल्यामुळे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते़ ऐन पावसाळ्यात ही स्थिती निर्माण झाल्याने पुढील काळातील नियोजनासाठी प्रशासन सरसावले होते़ मात्र पोळ्यानंतर सलग सहाव्या दिवशीही पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला़ तर नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या संकटातून काही प्रमाणात मुक्त केले़ आशिया खंडातील सर्वात मोठी सिंचन योजना असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पात पावसाळ्यात प्रथमच चिंताजनक परिस्थिती ओढवली होती़ या प्रकल्पात ४० किलोमीटर लांब गोदावरी नदीत पाणी जमा होते़ प्रकल्पाची क्षमता ८०़७९ दलघमी आहे़ उन्हाळ्यात या प्रकल्पाची पाणीपातळी खालावत जावून जून, जुलै महिन्यात हा साठा १० दलघमीवर येवून ठेपला होता़ दिग्रस बंधाऱ्यातून घेतलेल्या ९ दलघमी पाण्यावर जुलै व आॅगस्ट महिन्याची तहान भागली़ पुढील पाण्याच्या नियोजनात मनपा प्रशासन गुंतले असतानाच या आठवड्यात झालेल्या पावसाने प्रकल्पाची पाणी पातळी उंचावली़ शनिवारी दुपारपर्यंत प्रकल्पात ३०़३४ दलघमी पाणी जमा झाले़ पूर्णा प्रकल्प क्षेत्रात होत असलेल्या पावसाने विष्णूपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा सुरू झाला आहे़ त्यामुळे पुढील पाच महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचे संकट टळले आहे़ प्रशासनाच्या सूचनेनुसार प्रकल्पातील पाणी हे पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे़ पाण्याची चोरी रोखण्यासाठी यापूर्वीच दक्षता पथक नियुक्त केले आहे़ येत्या महिन्याभरात आणखी दमदार पाऊस झाल्यास प्रकल्पाच्या टक्केवारीत भर पडणार आहे़ असे असले तरी उपलब्ध पाण्याची बचत करण्याची गरज असल्याचे आवाहन मनपाने केले आहे़ (प्रतिनिधी)