शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

प्रकल्पात ३०़३४ दलघमी पाणी

By admin | Updated: August 31, 2014 00:14 IST

नांदेड: विष्णूपुरी प्रकल्पात ३०़३४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला

नांदेड: मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पात ३०़३४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला असून प्रकल्पाची पाणीपातळी ३५०़९५ मीटरपर्यंत वाढली आहे़ सद्य:स्थितीत प्रकल्पात एकूण ३७़५५ टक्के पाणी जमा झाले आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात मागील आठवड्यात ८़८३ दलघमी पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरावर पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवले होते़ परंतु पोळ्यानंतर सुरू झालेल्या पावसामुळे हे संकट काही प्रमाणात टळले आहे़ मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुष्काळाचे सावट होते़ जिल्ह्यातील लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पातील पाणीपातळी घटली होती़ विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीसाठी संपत चालल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर प्रश्न निर्माण झाला होता़ अवघे ३५ दिवस पुरेल एवढेच पाणी विष्णूपुरीत असल्यामुळे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते़ ऐन पावसाळ्यात ही स्थिती निर्माण झाल्याने पुढील काळातील नियोजनासाठी प्रशासन सरसावले होते़ मात्र पोळ्यानंतर सलग सहाव्या दिवशीही पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला़ तर नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या संकटातून काही प्रमाणात मुक्त केले़ आशिया खंडातील सर्वात मोठी सिंचन योजना असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पात पावसाळ्यात प्रथमच चिंताजनक परिस्थिती ओढवली होती़ या प्रकल्पात ४० किलोमीटर लांब गोदावरी नदीत पाणी जमा होते़ प्रकल्पाची क्षमता ८०़७९ दलघमी आहे़ उन्हाळ्यात या प्रकल्पाची पाणीपातळी खालावत जावून जून, जुलै महिन्यात हा साठा १० दलघमीवर येवून ठेपला होता़ दिग्रस बंधाऱ्यातून घेतलेल्या ९ दलघमी पाण्यावर जुलै व आॅगस्ट महिन्याची तहान भागली़ पुढील पाण्याच्या नियोजनात मनपा प्रशासन गुंतले असतानाच या आठवड्यात झालेल्या पावसाने प्रकल्पाची पाणी पातळी उंचावली़ शनिवारी दुपारपर्यंत प्रकल्पात ३०़३४ दलघमी पाणी जमा झाले़ पूर्णा प्रकल्प क्षेत्रात होत असलेल्या पावसाने विष्णूपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा सुरू झाला आहे़ त्यामुळे पुढील पाच महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचे संकट टळले आहे़ प्रशासनाच्या सूचनेनुसार प्रकल्पातील पाणी हे पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे़ पाण्याची चोरी रोखण्यासाठी यापूर्वीच दक्षता पथक नियुक्त केले आहे़ येत्या महिन्याभरात आणखी दमदार पाऊस झाल्यास प्रकल्पाच्या टक्केवारीत भर पडणार आहे़ असे असले तरी उपलब्ध पाण्याची बचत करण्याची गरज असल्याचे आवाहन मनपाने केले आहे़ (प्रतिनिधी)