शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पैठण नगरपालिकेचे ३ कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:47 IST

तीन वर्षांपूर्वी शहरातील यात्रा मैदानावर नगर परिषद प्रशासनाने उभारलेले बेकायदेशीर वादग्रस्त व्यापारी संकुल (गाळे) प्रकरणी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पैठण न.प.च्या तीन कर्मचाºयांना तडकाफडकी निलंबित केले. यामध्ये एका मयत कर्मचाºयाचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : तीन वर्षांपूर्वी शहरातील यात्रा मैदानावर नगर परिषद प्रशासनाने उभारलेले बेकायदेशीर वादग्रस्त व्यापारी संकुल (गाळे) प्रकरणी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पैठण न.प.च्या तीन कर्मचाºयांना तडकाफडकी निलंबित केले. यामध्ये एका मयत कर्मचाºयाचा समावेश आहे.या बेकायदेशीर बांधकामप्रकरणी तत्कालीन १२ नगरसेवकांविरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. बुधवारी या बेकायदेशीर बांधकाम व अर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारीवरून दोषारोप असलेल्या पैठण नगर परिषदमधील तीन कर्मचाºयांवर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी निलंबनाची कारवाई केल्याने जिल्ह्यातील नगर परिषद कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.यात्रा मैदानातील या बांधकामप्रकरणी जिल्हा प्रशासनाने पैठण नगर परिषदमधील व्यंकटी राजाराम पापूलवार (वरिष्ठ लिपीक वसुली विभाग), कैलास भिवसन मगरे (तत्कालीन लिपीक अतिक्रमण विभाग, राज्य संवगार्तील कर्मचारी व सध्या फुलंब्री नगरपंचायत येथे कार्यालय अधीक्षक), अनिल मगन हिरे (मयत, सहायक लेखापाल) हे तीन कर्मचारी चौकशी वजा अवलोकन केल्यानंतर प्रथमदर्शनी दोषी आढळून आले होते.संबंधित कर्मचाºयांनी दोषारोप असताना आजतागायत कोणताही खुलासा केला नाही, असा ठपका ठेवत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी या तीन कर्मचाºयांना शासन सेवेतून निलंबित केले आहे.निलंबन काळात हयात दोन्ही कर्मचाºयांनी पैठण नगर परिषद कार्यालयात दररोज हजेरी द्यावी व त्याचा अहवाल नगर परिषदेने प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावा, असे जिल्हाधिकाºयांनी निलंबन आदेशात म्हटले आहे.निलंबन काळात सदरील कर्मचाºयांनी खाजगी नोकरी व अथवा इतर व्यवसाय करू नये, असे आढळून आल्यास शासकीय भविष्य निर्वाह भत्यापासून अपात्र ठरविण्यात येईल, असेही उपरोक्त आदेशात नमूद करण्यात आले आहे.४पैठण नगर परिषदेने सभागृहात ठराव घेऊन तीन वर्षांपूर्वी शहरातील यात्रा मैदानात (आरक्षित जागा) ३९ गाळे असलेले व्यापारी संकूल उभारले. या वादग्रस्त बांधकामप्रकरणी शहरातील नागरिक रमेश मानसिंग लिंबोरे यांनी २०१६ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर नगर परिषदेतील तत्कालीन १२ नगरसेवकांना याच प्रकरणी जिल्हाधिकाºयांने अपात्र घोषित केले होते.