शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

पैठण नगरपालिकेचे ३ कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:47 IST

तीन वर्षांपूर्वी शहरातील यात्रा मैदानावर नगर परिषद प्रशासनाने उभारलेले बेकायदेशीर वादग्रस्त व्यापारी संकुल (गाळे) प्रकरणी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पैठण न.प.च्या तीन कर्मचाºयांना तडकाफडकी निलंबित केले. यामध्ये एका मयत कर्मचाºयाचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : तीन वर्षांपूर्वी शहरातील यात्रा मैदानावर नगर परिषद प्रशासनाने उभारलेले बेकायदेशीर वादग्रस्त व्यापारी संकुल (गाळे) प्रकरणी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पैठण न.प.च्या तीन कर्मचाºयांना तडकाफडकी निलंबित केले. यामध्ये एका मयत कर्मचाºयाचा समावेश आहे.या बेकायदेशीर बांधकामप्रकरणी तत्कालीन १२ नगरसेवकांविरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. बुधवारी या बेकायदेशीर बांधकाम व अर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारीवरून दोषारोप असलेल्या पैठण नगर परिषदमधील तीन कर्मचाºयांवर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी निलंबनाची कारवाई केल्याने जिल्ह्यातील नगर परिषद कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.यात्रा मैदानातील या बांधकामप्रकरणी जिल्हा प्रशासनाने पैठण नगर परिषदमधील व्यंकटी राजाराम पापूलवार (वरिष्ठ लिपीक वसुली विभाग), कैलास भिवसन मगरे (तत्कालीन लिपीक अतिक्रमण विभाग, राज्य संवगार्तील कर्मचारी व सध्या फुलंब्री नगरपंचायत येथे कार्यालय अधीक्षक), अनिल मगन हिरे (मयत, सहायक लेखापाल) हे तीन कर्मचारी चौकशी वजा अवलोकन केल्यानंतर प्रथमदर्शनी दोषी आढळून आले होते.संबंधित कर्मचाºयांनी दोषारोप असताना आजतागायत कोणताही खुलासा केला नाही, असा ठपका ठेवत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी या तीन कर्मचाºयांना शासन सेवेतून निलंबित केले आहे.निलंबन काळात हयात दोन्ही कर्मचाºयांनी पैठण नगर परिषद कार्यालयात दररोज हजेरी द्यावी व त्याचा अहवाल नगर परिषदेने प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावा, असे जिल्हाधिकाºयांनी निलंबन आदेशात म्हटले आहे.निलंबन काळात सदरील कर्मचाºयांनी खाजगी नोकरी व अथवा इतर व्यवसाय करू नये, असे आढळून आल्यास शासकीय भविष्य निर्वाह भत्यापासून अपात्र ठरविण्यात येईल, असेही उपरोक्त आदेशात नमूद करण्यात आले आहे.४पैठण नगर परिषदेने सभागृहात ठराव घेऊन तीन वर्षांपूर्वी शहरातील यात्रा मैदानात (आरक्षित जागा) ३९ गाळे असलेले व्यापारी संकूल उभारले. या वादग्रस्त बांधकामप्रकरणी शहरातील नागरिक रमेश मानसिंग लिंबोरे यांनी २०१६ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर नगर परिषदेतील तत्कालीन १२ नगरसेवकांना याच प्रकरणी जिल्हाधिकाºयांने अपात्र घोषित केले होते.