शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

कांदाचाळीसाठी अखेर तीन कोटीचा निधी !

By admin | Updated: August 5, 2016 00:13 IST

कळंब : तालुक्यातील पाचशेच्या आसपास कांदा चाळ उभा करणारे शेतकरी कृषी विभागाकडून अनुदान मिळावे म्हणून हेलपाटे मारत होते.

कळंब : तालुक्यातील पाचशेच्या आसपास कांदा चाळ उभा करणारे शेतकरी कृषी विभागाकडून अनुदान मिळावे म्हणून हेलपाटे मारत होते. दुष्काळी झळा सोसून कासावीस झालेल्या या शेतकरी जिल्हा कृषी कार्यालयाकडे यासाठी निधीच नसल्याने हैराण झाले होते. कांदा चाळ उभारून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची ही शोकांतिका ैै‘लोकमत’ने ठळकपणे प्रसिद्ध करून ऐरणीवर आणली होती. अखेर कृषी विभागाला जाग आली असून मंगळवारी जिल्हा कृषी कार्यालयास यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.अलीकडील काळात उस्मानाबाद जिल्ह्यात कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. यामुळेच कळंब तालुक्यासह विविध भागात कांदा लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. परंतु मुळात नाशवंत पदार्थ असलेल्या कांदा उत्पादनाबाबतीत बाजारपेठेची उपलब्धतता, साठवणुकीची सोय नसणे, अस्थिर दर याचा मोठा फटका बसतो. विकावा तरी तोटा व ठेवावा तरी तोटा अशी वारंवार स्थिती निर्माण होत असल्याने काढणीपश्चात साठवणुकीची सोय निर्माण गरजेचे झाले होते. यानुसार एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जिल्हा कृषी कार्यालयाने काढणीपश्चात व्यवस्थापन व पणन सुविधा उभारण्यासाठी ५० टक्के अनुदानावर कांदा चाळ उभारणी प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती.कळंब तालुक्यात जवळपास ९०० च्या आसपास कांदा चाळींना यानुसार मंजुरी देण्यात आली होती. यातील ५०० च्या आसपास देयके कृषी विभागाला सादर करण्यात आली होती. परंतु उद्दिष्टापेक्षा जास्त मंजुरी दिल्याने प्राप्त निधी अपुरा पडू लागला होता. यामुळे तालुक्यातील केवळ ३० ते ३५ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले होते. ऐन दुष्काळात कांदा चाळ उभी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पै पै गोळा करून मोठा खर्च केला होता. परंतु जिल्हा कृषी कार्यालयाकडे निधी उपलब्ध नसल्याने शेतकरी हैराण झाले होते. या संदर्भात लोकमतने वारंवार सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या हा प्रश्न निदर्शनास आणून दिला होता. (वार्ताहर)