शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

२९0 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:49 IST

जिल्ह्यात ग्रामीण भागात शौचालय बांधकामांनी घेतलेली गती प्रोत्साहन निधी नसल्याने मंदावली होती. आता १५ कोटी एवढा निधी मिळाल्याने शौचालय बांधकाम करणाºयांना प्रोत्साहन मिळणार आहे. २९0 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून २७३ अजूनही शिल्लक आहेत.

ठळक मुद्दे२७३ ग्रा.पं.त अजूनही काम बाकी : ५१ टक्क्यांपर्यंत उद्दिष्टपूर्ती, १४ कोटींच्या निधीचेही वितरण

हिंगोली : जिल्ह्यात ग्रामीण भागात शौचालय बांधकामांनी घेतलेली गती प्रोत्साहन निधी नसल्याने मंदावली होती. आता १५ कोटी एवढा निधी मिळाल्याने शौचालय बांधकाम करणाºयांना प्रोत्साहन मिळणार आहे. २९0 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून २७३ अजूनही शिल्लक आहेत.हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुक्यातील १0१ पैकी ७२, हिंगोलीत १११ पैकी ७२, वसमतला ११९ पैकी ५९, कळमनुरीत १२५ पैकी ५७, सेनगावात १0७ पैकी ३0 ग्रा.पं. हागणदारीमुक्त झाल्या आहेत. तर औंढा-२९, हिंगोली-३९, वसमत-६0, कळमनुरी-६८ व सेनगावात ७७ अशी शिल्लक ग्रा.पं.ची संख्या आहे. सेनगाव हा सर्वात पिछाडीवर असलेला तालुका आहे. केवळ २८ टक्के काम झाले आहे. तर औंढ्यात सर्वाधिक ७१ टक्के काम झाले आहे. २0१७-१८ या आर्थिक वर्षातच हागणदारीमुक्त झालेल्या ग्रा.पं.ची संख्या औंढा-३५, हिंगोली-४२, वसमत-१६, कळमनुरी-३५ तर सेनगाव २0 अशी आहे.यामध्ये यावर्षी ८५ हजार ४२६ शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट आहे. यापैकी ४३ हजार ६३३ बांधकामे पूर्ण झाली आहेत. यात हिंगोलीत १३३९२ पैकी ८७६६, औंढ्यात १२७४९ पैकी ८0६९, वसमतला -१८७0३ पैकी १0७२२, कळमनुरीत २00२६ पैकी ८२३५ तर सेनगावात २0५५६ पैकी ७८४१ एवढे उद्दिष्ट गाठले आहे.प्रत्येक तालुक्याला प्रतिदिन ११४ ते ३११ एवढे शौचालय बांधकाम केले तर उद्दिष्टपूर्ती होणार आहे. मार्चपर्यंत हे उद्दिष्ट गाठणे शक्य झाले असते. मात्र मध्यंतरी प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यासाठी निधीच नव्हता. त्यामुळे अनेकांनी शौचालय बांधकाम केले अन् हा निधीच न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला. निदान अर्धी रक्कम तरी शासनाकडून मिळणार असल्याने अनेकांनी उत्साहाने ही कामे केली होती. ऐन पावसाळ्यात या कामांना गती आली होती. नंतर गावातील काही लोकांनी बांधकाम करूनही त्यांना प्रोत्साहन अनुदान मिळत नसल्याने त्याचा परिणाम इतरांवर झाला होता.आता शासनाने १५ कोटी रुपये या योजनेसाठी दिले आहेत. तर इतर योजनांतून यासाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात पुन्हा या बांधकामांना गती मिळेल, अशी आशा दिसून येत आहे. शासनाकडे हिंगोली जिल्ह्याने अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. आणखी तीन ते चार कोटींची देणी शिल्लक राहतील, अशी परिस्थिती आहे. मात्र आता कामे करणाºयांना मार्च एण्डपर्र्यत प्रोत्साहन अनुदानाचा निधी मिळू शकतो. त्यामुळे मंदावलेली गती पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.