शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

जिल्ह्यात २८१ टँकरने पाणी

By admin | Updated: May 3, 2016 00:04 IST

लातूर : लातूर शहरासह जिल्हा भरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भीषण पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत़

तीव्र टंचाई : दहा तालुक्यात ७९१ गावातून १३०० विहीरींचे अधिग्रहणलातूर : लातूर शहरासह जिल्हा भरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भीषण पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत़ जिल्ह्यातील एकूण ७९१ गावातून १३०० विहीरींचे अधिग्रहण जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ टंचाईग्रस्त २५४ वाढी तांड्यावर २८१ टँकरने सध्याला पाणीपुरवठा केला जात आहे़ लातूर जिल्ह्यातील जळकोट उदगीर देवणी अहमदपूर आदी तालुक्यातील डोंगराळ भागातील खेड्या-पाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ विशेष म्हणजे जळकोट तालुक्यातील वाढी तांड्यावर पाण्याचे मोठे दुर्भीक्ष आहे़ एकूण १० तालुक्यातील ७९१ गावांमध्ये १ हजार ३०० विहीरींचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे़ तर जिल्ह्यातील २१० गावे आणि ४४ वाड्यांवर एकूण २५४ ठिकाणी २८१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ यामध्ये लातूर तालुका ३१ गावे आणि १ वाड्यावर ४२ टँकर तर ११० गावात १९२ विहीरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे़ औसा तालुक्यातील २१ गावे आणि २ वाड्यामध्ये २४ टँकरद्वारे, ११६ गावात १९३ विहीरींचे अधिग्रहण, रेणापूर तालुक्यातील १६ गावे आणि ४ वाड्यामध्ये २१ टँकर आणि ७३ गावाामध्ये १०४ विहीरींचे अधिग्रहण, उदगीर तालुक्यातील ३१ गावे व १४ वाड्यात ४५ टँकरदने सध्याला पाणीपुरवठा केला जात आहे़ याच तालुक्यातील ७७ गावांसाठी १२१ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ अहमदपूर तालुक्यातील ३१ गावे आणि ९ वाड्यांवर ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ याच तालुक्यातील १०२ गावांसाठी १४५ विहीरींचे अधिग्रहण प्रशासनाकडून करण्यात आले आहे़ चाकूर तालुक्यातील २५ गावे १ वाड्यामध्ये २८ टँकर तर ८३ गावांसाठी ११७ विहीरींचे अधिग्रहण, देवणी तालुक्यातील १३ गावे आणि ३ वाड्या १३ टँकरद्वारे तर ३४ गावात ५४ विहीरींचे अधिग्रहण, जळकोट तालुक्यातील २० गावे आणि ७ वाड्यामध्ये २६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ जळकोट तालुक्यातील ३८ गावात ५३ विहीरींचे अधिग्रहण, निलंगा तालुक्यातील १६ गावे आणि ३ वाड्यांमध्ये २५ टँकरने पाणीपुरवठा तर १२१ गावांसाठी २५७ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ तर शिरुर अनंतपाळ तालुक्यातील ६ गावांसाठी ६ टँकरने सध्याला पाणीपरुवठा केला जात आहे़ पाणीटंचाई लक्षात घेता तालुक्यातील ३७ गावांसाठी ६४ विहीरींचे अधिग्रहण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ उपाययोजना : १६७ नव्या विंधन विहीरी़़़जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २०१५ -१६ अंतर्गत लातूर जिल्हा परीषदेच्या वतीने नळ योजना विशेष दुरुस्तीच्या २२ योजना तर नविन १६७ विंधन विहीरी, १० विशेष दुरुस्ती, २५ पुरक नळयोजना, ८४ विहीरींचे खोलीकरण व गाळ काढणे आदी उपाययोजना मंजूर करण्यात आल्या आहेत़