शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २८१ टँकरने पाणी

By admin | Updated: May 3, 2016 00:04 IST

लातूर : लातूर शहरासह जिल्हा भरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भीषण पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत़

तीव्र टंचाई : दहा तालुक्यात ७९१ गावातून १३०० विहीरींचे अधिग्रहणलातूर : लातूर शहरासह जिल्हा भरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भीषण पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत़ जिल्ह्यातील एकूण ७९१ गावातून १३०० विहीरींचे अधिग्रहण जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ टंचाईग्रस्त २५४ वाढी तांड्यावर २८१ टँकरने सध्याला पाणीपुरवठा केला जात आहे़ लातूर जिल्ह्यातील जळकोट उदगीर देवणी अहमदपूर आदी तालुक्यातील डोंगराळ भागातील खेड्या-पाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ विशेष म्हणजे जळकोट तालुक्यातील वाढी तांड्यावर पाण्याचे मोठे दुर्भीक्ष आहे़ एकूण १० तालुक्यातील ७९१ गावांमध्ये १ हजार ३०० विहीरींचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे़ तर जिल्ह्यातील २१० गावे आणि ४४ वाड्यांवर एकूण २५४ ठिकाणी २८१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ यामध्ये लातूर तालुका ३१ गावे आणि १ वाड्यावर ४२ टँकर तर ११० गावात १९२ विहीरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे़ औसा तालुक्यातील २१ गावे आणि २ वाड्यामध्ये २४ टँकरद्वारे, ११६ गावात १९३ विहीरींचे अधिग्रहण, रेणापूर तालुक्यातील १६ गावे आणि ४ वाड्यामध्ये २१ टँकर आणि ७३ गावाामध्ये १०४ विहीरींचे अधिग्रहण, उदगीर तालुक्यातील ३१ गावे व १४ वाड्यात ४५ टँकरदने सध्याला पाणीपुरवठा केला जात आहे़ याच तालुक्यातील ७७ गावांसाठी १२१ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ अहमदपूर तालुक्यातील ३१ गावे आणि ९ वाड्यांवर ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ याच तालुक्यातील १०२ गावांसाठी १४५ विहीरींचे अधिग्रहण प्रशासनाकडून करण्यात आले आहे़ चाकूर तालुक्यातील २५ गावे १ वाड्यामध्ये २८ टँकर तर ८३ गावांसाठी ११७ विहीरींचे अधिग्रहण, देवणी तालुक्यातील १३ गावे आणि ३ वाड्या १३ टँकरद्वारे तर ३४ गावात ५४ विहीरींचे अधिग्रहण, जळकोट तालुक्यातील २० गावे आणि ७ वाड्यामध्ये २६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ जळकोट तालुक्यातील ३८ गावात ५३ विहीरींचे अधिग्रहण, निलंगा तालुक्यातील १६ गावे आणि ३ वाड्यांमध्ये २५ टँकरने पाणीपुरवठा तर १२१ गावांसाठी २५७ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ तर शिरुर अनंतपाळ तालुक्यातील ६ गावांसाठी ६ टँकरने सध्याला पाणीपरुवठा केला जात आहे़ पाणीटंचाई लक्षात घेता तालुक्यातील ३७ गावांसाठी ६४ विहीरींचे अधिग्रहण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ उपाययोजना : १६७ नव्या विंधन विहीरी़़़जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २०१५ -१६ अंतर्गत लातूर जिल्हा परीषदेच्या वतीने नळ योजना विशेष दुरुस्तीच्या २२ योजना तर नविन १६७ विंधन विहीरी, १० विशेष दुरुस्ती, २५ पुरक नळयोजना, ८४ विहीरींचे खोलीकरण व गाळ काढणे आदी उपाययोजना मंजूर करण्यात आल्या आहेत़