शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

जिल्ह्यात २८१ टँकरने पाणी

By admin | Updated: May 3, 2016 00:04 IST

लातूर : लातूर शहरासह जिल्हा भरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भीषण पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत़

तीव्र टंचाई : दहा तालुक्यात ७९१ गावातून १३०० विहीरींचे अधिग्रहणलातूर : लातूर शहरासह जिल्हा भरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भीषण पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत़ जिल्ह्यातील एकूण ७९१ गावातून १३०० विहीरींचे अधिग्रहण जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ टंचाईग्रस्त २५४ वाढी तांड्यावर २८१ टँकरने सध्याला पाणीपुरवठा केला जात आहे़ लातूर जिल्ह्यातील जळकोट उदगीर देवणी अहमदपूर आदी तालुक्यातील डोंगराळ भागातील खेड्या-पाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ विशेष म्हणजे जळकोट तालुक्यातील वाढी तांड्यावर पाण्याचे मोठे दुर्भीक्ष आहे़ एकूण १० तालुक्यातील ७९१ गावांमध्ये १ हजार ३०० विहीरींचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे़ तर जिल्ह्यातील २१० गावे आणि ४४ वाड्यांवर एकूण २५४ ठिकाणी २८१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ यामध्ये लातूर तालुका ३१ गावे आणि १ वाड्यावर ४२ टँकर तर ११० गावात १९२ विहीरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे़ औसा तालुक्यातील २१ गावे आणि २ वाड्यामध्ये २४ टँकरद्वारे, ११६ गावात १९३ विहीरींचे अधिग्रहण, रेणापूर तालुक्यातील १६ गावे आणि ४ वाड्यामध्ये २१ टँकर आणि ७३ गावाामध्ये १०४ विहीरींचे अधिग्रहण, उदगीर तालुक्यातील ३१ गावे व १४ वाड्यात ४५ टँकरदने सध्याला पाणीपुरवठा केला जात आहे़ याच तालुक्यातील ७७ गावांसाठी १२१ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ अहमदपूर तालुक्यातील ३१ गावे आणि ९ वाड्यांवर ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ याच तालुक्यातील १०२ गावांसाठी १४५ विहीरींचे अधिग्रहण प्रशासनाकडून करण्यात आले आहे़ चाकूर तालुक्यातील २५ गावे १ वाड्यामध्ये २८ टँकर तर ८३ गावांसाठी ११७ विहीरींचे अधिग्रहण, देवणी तालुक्यातील १३ गावे आणि ३ वाड्या १३ टँकरद्वारे तर ३४ गावात ५४ विहीरींचे अधिग्रहण, जळकोट तालुक्यातील २० गावे आणि ७ वाड्यामध्ये २६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ जळकोट तालुक्यातील ३८ गावात ५३ विहीरींचे अधिग्रहण, निलंगा तालुक्यातील १६ गावे आणि ३ वाड्यांमध्ये २५ टँकरने पाणीपुरवठा तर १२१ गावांसाठी २५७ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ तर शिरुर अनंतपाळ तालुक्यातील ६ गावांसाठी ६ टँकरने सध्याला पाणीपरुवठा केला जात आहे़ पाणीटंचाई लक्षात घेता तालुक्यातील ३७ गावांसाठी ६४ विहीरींचे अधिग्रहण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ उपाययोजना : १६७ नव्या विंधन विहीरी़़़जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २०१५ -१६ अंतर्गत लातूर जिल्हा परीषदेच्या वतीने नळ योजना विशेष दुरुस्तीच्या २२ योजना तर नविन १६७ विंधन विहीरी, १० विशेष दुरुस्ती, २५ पुरक नळयोजना, ८४ विहीरींचे खोलीकरण व गाळ काढणे आदी उपाययोजना मंजूर करण्यात आल्या आहेत़