शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज महानगरात ६ महिन्यांत २८ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:45 IST

वाळूज महानगर परिसरात ६ महिन्यांत घडलेल्या अपघातांत २८ जणाचा बळी गेला आहे.

वाळूज महानगर: वाळूज महानगर परिसरातील विविध ठिकाणी ६ महिन्यांत घडलेल्या अपघातांत २८ जणाचा बळी गेला असून, यात २५ पुरुष तर ३ महिलांचा समावेश आहे. तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा अपघाताचे प्रमाण दुपटीने वाढल्याचे आकडेवरील दिसून येते.

वाळूज महानगर परिसरात वाढत्या अपघाताच्या घटना लक्षात घेवून पोलीस प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात असून, नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. तरीही वाहनांची वाढती संख्या व बेशिस्त वाहतुकीमुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच आहे.

जानेवारी ते जून या सहा महिन्यांत विविध ठिकाणी झालेल्या २६ अपघातांच्या घटनांत २८ नागरिकांचा बळी गेला असून, ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. गतवर्षभरात अपघातांच्या घटनांत २८ जणांचा मृत्यू झाला होता. यात जानेवारी ते जून या ६ महिन्यांत १२ तर जुलै ते डिसेंबर या काळात १६ जणांचा मृत्यू झाला होता.

वाळूज महानगरातून औरंगाबाद-नगर व मुंबई-नागपूर हे दोन महामार्ग जातात. या महामार्गावर अवजड व इतर वाहनांची वर्दळ असते. अवजड वाहने, बेदरकार वाहनचालक व बेशिस्त वाहतूक यामुळे सारख्या अपघाताच्या घटना घडत असून, यात नाहक निष्पाप लोकांचा बळी जात आहे.

वाढत्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेसह नागरिकांना कठोर भूमिका घेवून स्थानिक पातळीवर अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :WalujवाळूजAccidentअपघात