शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

वाळूज महानगरात ६ महिन्यांत २८ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:45 IST

वाळूज महानगर परिसरात ६ महिन्यांत घडलेल्या अपघातांत २८ जणाचा बळी गेला आहे.

वाळूज महानगर: वाळूज महानगर परिसरातील विविध ठिकाणी ६ महिन्यांत घडलेल्या अपघातांत २८ जणाचा बळी गेला असून, यात २५ पुरुष तर ३ महिलांचा समावेश आहे. तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा अपघाताचे प्रमाण दुपटीने वाढल्याचे आकडेवरील दिसून येते.

वाळूज महानगर परिसरात वाढत्या अपघाताच्या घटना लक्षात घेवून पोलीस प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात असून, नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. तरीही वाहनांची वाढती संख्या व बेशिस्त वाहतुकीमुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच आहे.

जानेवारी ते जून या सहा महिन्यांत विविध ठिकाणी झालेल्या २६ अपघातांच्या घटनांत २८ नागरिकांचा बळी गेला असून, ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. गतवर्षभरात अपघातांच्या घटनांत २८ जणांचा मृत्यू झाला होता. यात जानेवारी ते जून या ६ महिन्यांत १२ तर जुलै ते डिसेंबर या काळात १६ जणांचा मृत्यू झाला होता.

वाळूज महानगरातून औरंगाबाद-नगर व मुंबई-नागपूर हे दोन महामार्ग जातात. या महामार्गावर अवजड व इतर वाहनांची वर्दळ असते. अवजड वाहने, बेदरकार वाहनचालक व बेशिस्त वाहतूक यामुळे सारख्या अपघाताच्या घटना घडत असून, यात नाहक निष्पाप लोकांचा बळी जात आहे.

वाढत्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेसह नागरिकांना कठोर भूमिका घेवून स्थानिक पातळीवर अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :WalujवाळूजAccidentअपघात