शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

२७ प्रस्तावांना मंजुरीची प्रतीक्षा

By admin | Updated: November 30, 2015 23:30 IST

ईट : निर्माण झालेल्या चारा टंचाईवर मात करून पशुधनाची उपासमार थांबविण्यासाठी भूम तालुक्यातील ईट परिसरातून २७ प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल करण्यात आले आहेत.

ईट : निर्माण झालेल्या चारा टंचाईवर मात करून पशुधनाची उपासमार थांबविण्यासाठी भूम तालुक्यातील ईट परिसरातून २७ प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल करण्यात आले आहेत. परंतु, प्रशासनाकडून अद्याप एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसून, तीन ठिकाणी तर मंजुरीविना छावण्या सुरू करून पशुंची सोय करण्यात आली आहे.मागील तीन-चार वर्षांपासून होत असलेल्या अत्यल्प पावसामुळे परिसरात पिण्याच्या पाण्यासह पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यंदा तर पावसाळ्यातही अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. अजूनही अनेक गावांना टँकरवर तहान भागवावी लागत आहे. गतवर्षी जूनच्या सुरूवातीला झालेल्या अत्यल्प पावसानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र, नंतर पाऊसच झाला नसल्याने खरिपाची पिके वाया गेली. त्यानंतर पाऊस पडेल या आशेवर रबीची पेरणी झाली. पेरणीवेळी जमिनीत थोडाफार ओलावा असल्याने काही प्रमाणात हरभऱ्याची उगवणही झाली. परंतु, पुन्हा पाऊसच झाला नसल्याने सध्या हे पीकही करपून जात आहे. शेतातील कुठलेच पीक हाती न लागल्याने या भागात सध्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ईटसह परिसारतील एकूण वीस गावांमधील पशुधनाची संख्या १६ हजाराच्या आसपास असून, चाराच उपलब्ध नसल्यामुळे या जनावरांची सध्या उपासमार सुरू आहे. यावर मात करण्यासाठी या भागातील एक-दोन नव्हे तर तब्बल २७ संस्थांनी प्रशासनाकडे चारा छावणीचे प्रस्ताव दाखल केले. परंतु, प्रशासनाकडून मात्र अद्याप एकाही प्रस्तावाला मंजुरीदेण्यात आलेली नाही. त्यामुळे पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे. आज ना उद्या छावणीला मंजुरी मिळेल, या आशेवर अखेर तिघांनी स्वखर्चातून छावण्या सुरू केल्या आहेत. दरम्यान, याबाबत भूमचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सर्व संस्थांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. मंजुरी मिळताच तात्काळ छावण्या सुरू केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)