आशपाक पठाण , लातूरप्रभागात रस्ता नाही, गटारी नाहीत, कर्मचारी नसल्याने काम होत नाही, विद्युत दिवे बंद पडले आहेत आदी नगरसेवकांच्या व नागरिकांच्या प्रश्नाला प्रशासनाचे हे उत्तर ठरलेलेच़ महापालिका नवीन आहे, शासनाकडून निधी नाही त्यामुळे कामे नाहीत अशी ओरड करणाऱ्या मनपा प्रशासनाच्या तिजोरीत एक दोन नव्हे तर तब्बल २७ कोटी रूपये शिल्लक आहेत़ निधी शिल्लक असल्याची कुणकुण नगरसेवकांना लागल्याने प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये धुसफुस सुरू झाली आहे़लातूर शहर महापालिका कार्यक्षेत्रात प्राथमिक सोयी सुविधांच्या विकास कामांसाठी ४ एप्रिल २०१३ रोजी २० कोटी रूपयांचे विशेष अनुदान मिळाले होते़ त्यापैकी केवळ २ कोटी १५ लाख ३२ हजार २०३ रूपये खर्च करण्यात आले़ या विशेष अनुदानातील १७ कोटी ८४ लाख ६७ हजार ७९७ रूपये तिजोरीत धुळखात पडले आहेत़ २०१२-१३ च्या टंचाई कालावधीसाठी तातडीची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी २८ मार्च २०१३ ते १० आॅक्टोबर २०१४ दरम्यान पाच टप्प्यात १ कोटी ९८ लाख ४९ हजार रूपये निधी प्राप्त झाला़ त्यापैकी १ कोटी ६० लाख २४ हजार २८७ रूपये खर्च करण्यात आले आहेत, यातून ३८ लाख २४ हजार ७१३ रूपये शिल्लक आहेत़ दलितेत्तर योजनेतून २६ मार्च २०१२ ते १८ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत सात टप्प्यात २ कोटी ८९ लाख ५० हजार रूपये निधी मिळाला ९५ लाख १६ हजार ५९३ रूपये खर्च करण्यात आले असून १ कोटी ९३ लाख ३३ हजार ४०७ रूपये शिल्लक आहेत़ दलित वस्ती सुधार योजनेतील १९ नोव्हेंबर २०१२ ते ६ डिसेंबर २०१४ या कालावधीत पाच टप्प्यात आलेल्या ८ कोटी ९९ लाख ३० हजार रूपयांपैकी केवळ ४ कोटी ६६ लाख ५६ हजार ९३१ रूपये खर्च झाले असून ४ कोटी ३२ लाख ७३ हजार शिल्लक आहेत़ अग्निशमन बळकटीकरणासाठी ३ मे २०१३ ते १८ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत चार टप्प्यात २ कोटी १३ लाख ७१ हजार २२० रूपये अनुदान आले आहे़ यातील केवळ ५१ लाख ८५ हजार ५८० रूपये खर्च करण्यात आले आहेत़ १० डिसेंबर २०१४ मध्ये २ कोटी ४ लाख ४१ हजार ४११ रूपये अनुदान मिळाले आहे, त्यापैकी ३० लाख ८९ हजार ४२ रूपये खर्च करण्यात आले आहेत़ सहा योजनेच्या अनुदानातील रक्कम : चंद्रकांत चिकटे ४लातूर शहर महापालिका कार्यक्षेत्रात प्राथमिक सोयी सुविधांच्या विकास कामासाठी विशेष अनुदान, दलित्तेतर योजना, दलितवस्ती सुधार योजना, रस्ता योजना,अग्निशमन बळकटीकरणासाठी आलेल्या अनुदानापैकी २७ कोटींची रक्कम शिल्लक आहे़ शासनाच्या विविध योजनेतून २०१२ ते २०१४ या कालावधीत महापालिकेला मिळालेल्या निधीतून कोट्यवधींचा निधी धुळखात पडला आहे़ मनपा प्रशासन निधी खर्च करण्यात अपयशी ठरल्याची तक्रार रिपाइंचे गटनेते चंद्रकांत चिकटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी केली आहे़ निवेदनासोबत त्यांनी शासनाचा प्राप्त निधी व शिल्लक निधीची यादीच त्यांनी जोडली आहे़ यासंदर्भात मनपा आयुक्त सुधाकर तेलंग म्हणाले, शासनाकडून आलेला निधी खर्च करण्यासाठी सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी लागते़ त्यानंतर काम निश्चिती, अंदाजपत्रक तयार करणे, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविले जाते़ एवढी सर्व प्रक्रिया झाल्यावर प्रशासकीय टेंडरची प्रक्रिया केली जाते़ या कामांसाठी वेळ लागतो़
महापालिकेच्या तिजोरीत २७ कोटी धुळखात !
By admin | Updated: January 28, 2015 00:56 IST