शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या तिजोरीत २७ कोटी धुळखात !

By admin | Updated: January 28, 2015 00:56 IST

आशपाक पठाण , लातूर प्रभागात रस्ता नाही, गटारी नाहीत, कर्मचारी नसल्याने काम होत नाही, विद्युत दिवे बंद पडले आहेत आदी नगरसेवकांच्या व नागरिकांच्या प्रश्नाला प्रशासनाचे

आशपाक पठाण , लातूरप्रभागात रस्ता नाही, गटारी नाहीत, कर्मचारी नसल्याने काम होत नाही, विद्युत दिवे बंद पडले आहेत आदी नगरसेवकांच्या व नागरिकांच्या प्रश्नाला प्रशासनाचे हे उत्तर ठरलेलेच़ महापालिका नवीन आहे, शासनाकडून निधी नाही त्यामुळे कामे नाहीत अशी ओरड करणाऱ्या मनपा प्रशासनाच्या तिजोरीत एक दोन नव्हे तर तब्बल २७ कोटी रूपये शिल्लक आहेत़ निधी शिल्लक असल्याची कुणकुण नगरसेवकांना लागल्याने प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये धुसफुस सुरू झाली आहे़लातूर शहर महापालिका कार्यक्षेत्रात प्राथमिक सोयी सुविधांच्या विकास कामांसाठी ४ एप्रिल २०१३ रोजी २० कोटी रूपयांचे विशेष अनुदान मिळाले होते़ त्यापैकी केवळ २ कोटी १५ लाख ३२ हजार २०३ रूपये खर्च करण्यात आले़ या विशेष अनुदानातील १७ कोटी ८४ लाख ६७ हजार ७९७ रूपये तिजोरीत धुळखात पडले आहेत़ २०१२-१३ च्या टंचाई कालावधीसाठी तातडीची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी २८ मार्च २०१३ ते १० आॅक्टोबर २०१४ दरम्यान पाच टप्प्यात १ कोटी ९८ लाख ४९ हजार रूपये निधी प्राप्त झाला़ त्यापैकी १ कोटी ६० लाख २४ हजार २८७ रूपये खर्च करण्यात आले आहेत, यातून ३८ लाख २४ हजार ७१३ रूपये शिल्लक आहेत़ दलितेत्तर योजनेतून २६ मार्च २०१२ ते १८ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत सात टप्प्यात २ कोटी ८९ लाख ५० हजार रूपये निधी मिळाला ९५ लाख १६ हजार ५९३ रूपये खर्च करण्यात आले असून १ कोटी ९३ लाख ३३ हजार ४०७ रूपये शिल्लक आहेत़ दलित वस्ती सुधार योजनेतील १९ नोव्हेंबर २०१२ ते ६ डिसेंबर २०१४ या कालावधीत पाच टप्प्यात आलेल्या ८ कोटी ९९ लाख ३० हजार रूपयांपैकी केवळ ४ कोटी ६६ लाख ५६ हजार ९३१ रूपये खर्च झाले असून ४ कोटी ३२ लाख ७३ हजार शिल्लक आहेत़ अग्निशमन बळकटीकरणासाठी ३ मे २०१३ ते १८ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत चार टप्प्यात २ कोटी १३ लाख ७१ हजार २२० रूपये अनुदान आले आहे़ यातील केवळ ५१ लाख ८५ हजार ५८० रूपये खर्च करण्यात आले आहेत़ १० डिसेंबर २०१४ मध्ये २ कोटी ४ लाख ४१ हजार ४११ रूपये अनुदान मिळाले आहे, त्यापैकी ३० लाख ८९ हजार ४२ रूपये खर्च करण्यात आले आहेत़ सहा योजनेच्या अनुदानातील रक्कम : चंद्रकांत चिकटे ४लातूर शहर महापालिका कार्यक्षेत्रात प्राथमिक सोयी सुविधांच्या विकास कामासाठी विशेष अनुदान, दलित्तेतर योजना, दलितवस्ती सुधार योजना, रस्ता योजना,अग्निशमन बळकटीकरणासाठी आलेल्या अनुदानापैकी २७ कोटींची रक्कम शिल्लक आहे़ शासनाच्या विविध योजनेतून २०१२ ते २०१४ या कालावधीत महापालिकेला मिळालेल्या निधीतून कोट्यवधींचा निधी धुळखात पडला आहे़ मनपा प्रशासन निधी खर्च करण्यात अपयशी ठरल्याची तक्रार रिपाइंचे गटनेते चंद्रकांत चिकटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी केली आहे़ निवेदनासोबत त्यांनी शासनाचा प्राप्त निधी व शिल्लक निधीची यादीच त्यांनी जोडली आहे़ यासंदर्भात मनपा आयुक्त सुधाकर तेलंग म्हणाले, शासनाकडून आलेला निधी खर्च करण्यासाठी सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी लागते़ त्यानंतर काम निश्चिती, अंदाजपत्रक तयार करणे, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविले जाते़ एवढी सर्व प्रक्रिया झाल्यावर प्रशासकीय टेंडरची प्रक्रिया केली जाते़ या कामांसाठी वेळ लागतो़