शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

औरंगाबादकरांसाठी आले लसीचे २६ हजार डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावात लसीकरणासाठी केंद्रांवर नागरिकांच्या रांगाच रांगा लागत आहेत. पण, लसीअभावी माघारी जाण्याची वेळ नागरिकांवर ओढावत आहे. ...

औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावात लसीकरणासाठी केंद्रांवर नागरिकांच्या रांगाच रांगा लागत आहेत. पण, लसीअभावी माघारी जाण्याची वेळ नागरिकांवर ओढावत आहे. दोन, चार दिवसाला लस येतात आणि काही दिवसांत संपूनही जातात, अशी औरंगाबादची अवस्था आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयास रविवारी कोविशिल्डचे ९४ हजार ६०० डोस मिळाले. यात औरंगाबादसाठी २६ हजार डोस मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे यांनी दिली.

औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयाअंतर्गंत औरंगाबादसह जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या चार जिल्ह्यांसाठी रविवारी ९४ हजार ६०० डोस मिळाले. यातून औरंगाबाद शहरासाठी १३ हजार आणि ग्रामीण भागासाठी १३ हजार डोस देण्यात येणार आहेत, असे डाॅ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले. हे डोसही दोन ते तीन दिवसांत संपून जातील. त्यामुळे लसीची प्रतीक्षा करण्याचीच नामुष्की औरंगाबादकरांवर कायम राहणार असल्याचे दिसते.

२,१५० काेव्हॅक्सिनचे डोस

आरोग्य उपसंचालक कार्यालयास रविवारी काेव्हॅक्सिनचेही २ हजार १५० डोस मिळाले आहेत. या डोसच्या मागणीनुसार रुग्णालय, लसीकरण केंद्रांना पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड लसीच्या तुलनेत काेव्हॅक्सिन लसीचा नेहमीच कमी पुरवठा होत आहे. त्यामुळे या लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसऱ्या डोसची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.

चौकट

औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारपर्यंत (दि. ८) ३ लाख ८८ हजार ६०७ लोकांनी पहिला डोस घेतला आहे. यातील ८८ हजार १५९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. म्हणजे आतापर्यंत ४ लाख ७६ हजार ७६६ डोस देऊन झालेले आहेत.