शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

२६ गावांचा आराखडा अजूनही कागदावरच

By admin | Updated: October 4, 2016 00:52 IST

औरंगाबाद : झालर क्षेत्रातील २६ गावांसाठी विकास आराखडा एक महिन्यात मंजूर करण्यात येईल, या घोषणेला वर्ष उलटून गेले तरी अद्याप हा आराखडा कागदावरच असल्याचे दिसते.

औरंगाबाद : झालर क्षेत्रातील २६ गावांसाठी विकास आराखडा एक महिन्यात मंजूर करण्यात येईल, या घोषणेला वर्ष उलटून गेले तरी अद्याप हा आराखडा कागदावरच असल्याचे दिसते. सातारा आणि देवळाई ही झालर क्षेत्रातून वगळून त्याचा समावेश औरंगाबाद महापालिका क्षेत्रात करण्यात आला आहे. उर्वरित २६ गावांसाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत एक महिन्याच्या आत झालर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याची घोषणाही झाली. मात्र, त्यानंतरच्या वर्षभरातही तो तयार झालेला नाही. केवळ नागरिकांचे आक्षेप घेण्याचे काम वर्षभराच्या काळात झाले आहे. दरम्यानच्या काळात सिडकोने झालर क्षेत्रासाठी विकास आराखडा तयार करण्याच्या कामातून माघार घेतली आहे. शहरालगतच्या परिसराचा सध्या अनियंत्रित पद्धतीने विकास सुरूआहे. सातारा-देवळाई ही त्याची दोन प्रमुख उदाहरणे आहेत. या भागातील शेकडो बेकायदा घरांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. बाळापूर, सुंदरवाडी, सावंगी, पिसादेवी परिसरात सध्या अनियंंित्रतपणे निवासी संकुलांची उभारणी सुरू असल्याचे दिसते. भविष्य काळात या भागातील वाहतूक, ड्रेनेज, रस्ते, मैदाने आदी प्रश्न निर्माण होण्याची भीती क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. सातारा आणि देवळाईचा भाग राजकीय सोयीसाठी राज्य सरकारने महापालिकेत समाविष्ट केला. मात्र, झालर क्षेत्राचा आराखडा तयार करण्याबाबत वेग येत नसल्याचे दिसते. मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने या मुद्याला चालना मिळावी, अशी अपेक्षा बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या ‘क्रेडाई’कडून व्यक्त होत आहे.