शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

२५८ पाणी नमुने दूषित

By admin | Updated: March 19, 2015 00:18 IST

बीड : स्वच्छता मोहिमेचा सर्वत्र बोलबाला असताना पिण्याचे पाणी मात्र शुद्ध नसल्याची माहिती पुढे आली २५८ पाणी नमुने दूषितआहे.

बीड : स्वच्छता मोहिमेचा सर्वत्र बोलबाला असताना पिण्याचे पाणी मात्र शुद्ध नसल्याची माहिती पुढे आली २५८ पाणी नमुने दूषितआहे. १००१ पैकी २५८ पाणी नमुने दूषित आढळल्याने सामान्यांच्या आरोग्याशी कसा खेळ सुरु आहे? हे देखील समोर आले आहे. पातळी ३०० फुटाखाली गेल्याने अनेक भागांत क्षारयुक्त पाणी येत असून जलजन्य आजारांना निमंत्रण मिळत आहे.जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेमार्फत महिन्याकाठी पाणीतपासणी होते. विहिरी, बोअरमधील पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत जिल्हा प्रयोगशाळेत पाठविले जातात. प्रयोगशाळेचा फेबु्रवारी महिन्यातील अहवाल चिंताजनक आहे. आधीच टंचाईने प्रशासनाच्या नाकेनऊ आले आहेत. त्यात दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फेबु्रवारी महिन्यात विविध तालुक्यातील १००१ नमुने तपासणीकरता घेतले होते. त्यापैकी २५८ गावांतील नमुने दूषित असल्याचा निष्कर्ष आला आहे. दरम्यान, टंचाईचा काळ असल्याने जलस्त्रोतांची पातळी खालावलेली आहे. त्यामुळे टंचाईसोबतच पाणीगुणवत्ता राखताना प्रशासनाची तारांबळ उडत आहे. दूषित पाणी आढळलेल्या ग्रामपंचायतींना शुद्धीकरणासंदर्भात सूचना केल्या आहेत. जलरक्षकांनाही कळविले आहे. उपाययोजना सुरु असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले.दूषित पाण्यामुळे होणारे आजार..!गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, विषमज्वर, अतिसार असे विविध आजार दूषित पाणी पिल्याने होऊ शकतात. लहान मुले, वृद्धांसाठी दूषित पाणी सर्वाधिक घातक असते. (प्रतिनिधी)जलस्त्रोताच्या ५० फूट परिसरात मानवी व गुरांचे मलमूत्र नसावे. गटार नसावे, स्वच्छता हवी. नाल्यांचे पाणी मोकळे करुन द्यावे, स्त्रोतांबरोबरच टाक्यांमध्ये ब्लिचींग पावडर टाकावी. वैयक्तिक पातळीवर तुरटी फिरवणे, दहा लिटर पाण्यात लिक्वीड क्लोरिनचे ५ थेंब टाकून पाणी शुद्ध करणे असे उपाय करता येतील. दूषित पाण्याने जलजन्य आजाराची शक्यता असते, त्यामुळे शुद्ध पाणी पिणे हाच उपाय असल्याचे जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी सांगितले.पूर्वी जिल्हास्तररावरुन ब्लिचींग पावडर खरेदी करुन ग्रामपंचायतींना पुरवठा केला जायचा. दोन वर्षांपासून गटविकास अधिकाऱ्यांना व ग्रामपंचायतींना पावडर खरेदीचे अधिकार दिले आहेत. मात्र, काही ग्रामपंचायती जलशुद्धीकरणासाठी पावडर खरेदी करत नाहीत त्यामुळे दूषित पाण्यावरच तहान भागविण्याची वेळ सामान्यांवर आली आहे.