शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

२५८ पाणी नमुने दूषित

By admin | Updated: March 19, 2015 00:18 IST

बीड : स्वच्छता मोहिमेचा सर्वत्र बोलबाला असताना पिण्याचे पाणी मात्र शुद्ध नसल्याची माहिती पुढे आली २५८ पाणी नमुने दूषितआहे.

बीड : स्वच्छता मोहिमेचा सर्वत्र बोलबाला असताना पिण्याचे पाणी मात्र शुद्ध नसल्याची माहिती पुढे आली २५८ पाणी नमुने दूषितआहे. १००१ पैकी २५८ पाणी नमुने दूषित आढळल्याने सामान्यांच्या आरोग्याशी कसा खेळ सुरु आहे? हे देखील समोर आले आहे. पातळी ३०० फुटाखाली गेल्याने अनेक भागांत क्षारयुक्त पाणी येत असून जलजन्य आजारांना निमंत्रण मिळत आहे.जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेमार्फत महिन्याकाठी पाणीतपासणी होते. विहिरी, बोअरमधील पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत जिल्हा प्रयोगशाळेत पाठविले जातात. प्रयोगशाळेचा फेबु्रवारी महिन्यातील अहवाल चिंताजनक आहे. आधीच टंचाईने प्रशासनाच्या नाकेनऊ आले आहेत. त्यात दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फेबु्रवारी महिन्यात विविध तालुक्यातील १००१ नमुने तपासणीकरता घेतले होते. त्यापैकी २५८ गावांतील नमुने दूषित असल्याचा निष्कर्ष आला आहे. दरम्यान, टंचाईचा काळ असल्याने जलस्त्रोतांची पातळी खालावलेली आहे. त्यामुळे टंचाईसोबतच पाणीगुणवत्ता राखताना प्रशासनाची तारांबळ उडत आहे. दूषित पाणी आढळलेल्या ग्रामपंचायतींना शुद्धीकरणासंदर्भात सूचना केल्या आहेत. जलरक्षकांनाही कळविले आहे. उपाययोजना सुरु असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले.दूषित पाण्यामुळे होणारे आजार..!गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, विषमज्वर, अतिसार असे विविध आजार दूषित पाणी पिल्याने होऊ शकतात. लहान मुले, वृद्धांसाठी दूषित पाणी सर्वाधिक घातक असते. (प्रतिनिधी)जलस्त्रोताच्या ५० फूट परिसरात मानवी व गुरांचे मलमूत्र नसावे. गटार नसावे, स्वच्छता हवी. नाल्यांचे पाणी मोकळे करुन द्यावे, स्त्रोतांबरोबरच टाक्यांमध्ये ब्लिचींग पावडर टाकावी. वैयक्तिक पातळीवर तुरटी फिरवणे, दहा लिटर पाण्यात लिक्वीड क्लोरिनचे ५ थेंब टाकून पाणी शुद्ध करणे असे उपाय करता येतील. दूषित पाण्याने जलजन्य आजाराची शक्यता असते, त्यामुळे शुद्ध पाणी पिणे हाच उपाय असल्याचे जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी सांगितले.पूर्वी जिल्हास्तररावरुन ब्लिचींग पावडर खरेदी करुन ग्रामपंचायतींना पुरवठा केला जायचा. दोन वर्षांपासून गटविकास अधिकाऱ्यांना व ग्रामपंचायतींना पावडर खरेदीचे अधिकार दिले आहेत. मात्र, काही ग्रामपंचायती जलशुद्धीकरणासाठी पावडर खरेदी करत नाहीत त्यामुळे दूषित पाण्यावरच तहान भागविण्याची वेळ सामान्यांवर आली आहे.