शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजार नागरिकांचे आक्षेप

By admin | Updated: August 6, 2016 00:23 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी औरंगाबाद महापालिकेस शहर विकास आराखडा सादर केला होता. या विकास आराखड्यात फेरबदल करून तो नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता.

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी औरंगाबाद महापालिकेस शहर विकास आराखडा सादर केला होता. या विकास आराखड्यात फेरबदल करून तो नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. या आराखड्यावर शहरातील तब्बल अडीच हजार नागरिकांनी आक्षेप दाखल केले होते. आक्षेपांची सुनावणी घेण्यासाठी शासनाने समिती गठीत केली होती. समितीने २३ जून ते १९ जुलै २०१६ पर्यंत मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे सुनावणी घेतली.मागील तीन दशकांमध्ये औरंगाबाद शहराची झपाट्याने वाढ लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने आगामी २० वर्षांसाठी शहर विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये या आराखड्याचे काम सुरू झाले. यासाठी शासनाने स्वतंत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. २०१४ च्या अखेरीस विकास आराखडा तयार करून नगररचना उपसंचालक यांच्याकडे सादर करण्यात आला. नगररचना विभागाने आठ महिन्यांनंतर विकास आराखडा महापालिकेला सादर केला. महापालिकेने विकास आराखडा फेब्रुवारीमध्ये दुरुस्तीसह प्रकाशित केला. या आराखड्यावर नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या. हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी चार शासकीय सदस्य तर तीन निमशासकीय सदस्य नियुक्त करण्यात आले. समितीने २३ जून ते १९ जुलैपर्यंत नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. महापालिकेने जेथे बांधकाम परवानग्या दिल्या आहेत, तेथे सुधारित आराखड्यात आरक्षणे टाकण्यात आली आहेत. जेथे वसाहती आहेत, तेथे खेळाची मैदाने, रुग्णालयांचे आरक्षण ठेवले आहे. शासनाच्या आराखड्यात ज्यांच्या जमिनी यलो होत्या, नंतर त्या ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आल्या. रस्त्यांचे मार्ग चुकीच्या पद्धतीने बदलण्यात आले असल्याचा आरोप नागरिकांनी सुनावणीच्या वेळी केला होता.यापूर्वीचे आराखडेयापूर्वी औरंगाबाद शहरासाठी १९७५, १९९१ आणि २००२ साली विकास आराखडे तयार करण्यात आले. येणाऱ्या २० वर्षांचे नियोजन प्रत्येक आराखड्यात करण्यात येते.