शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

मराठवाड्यातील २५०० कुटुंबांचे स्थलांतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 06:07 IST

पावसाळ्यातील दोन महिने कोरडे गेल्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग गडद झाले

संजय जाधव।औरंगाबाद : पावसाळ्यातील दोन महिने कोरडे गेल्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग गडद झाले असून पैठण तालुक्यातून जवळपास २५०० कुटुंबांनी रोजी-रोटीच्या शोधात महानगरांकडे स्थलांतर केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.औरंगाबादसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत केवळ ३८ टक्के पाऊस झाला. पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सलग चाळीस दिवस पावसाचा थेंबही पडलेला नाही. हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असल्याने शेतकºयांची आशा ओलावली आहे.पैठण तालुक्यातील गेवराई (मर्दा) येथील २५ तरुण कामधंद्यासाठी बाहेर पडले असून, यंदा ४० टक्के गावकºयांना ऊसतोडीसाठी जावे लागणार असल्याचे येथील उपसरपंच महंमद पठाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खादगावमधून५० तरुणांनी, तर कडेठाण गावातील८० तरुणांनी मजुरीसाठी गाव सोडलेआहे. आडूळमधील २५० तरुणांनी स्थलांतर केले असून, ३०० महिला रोजंदारी कामासाठी शेंद्रा एमआयडीसी येथे जात असल्याची माहिती सरपंच श्रीपाल राठोड यांनी दिली.>साडेसात महिन्यांत५८० शेतकरी आत्महत्यामराठवाड्यात दुष्काळाचे सावट किती गडद झाले आहे, हे आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या आकडेवारीवरून दिसून येते. १ जानेवारी ते १३ आॅगस्टपर्यंत मराठवाड्यात ५८० शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले असून सर्वाधिक ११५ आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत.औरंगाबाद जिल्ह्यात७९, जालना ५३, परभणी ७३, हिंगोली ३३, लातूर ५६ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ७८शेतकºयांनी स्वत:ला संपविले. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे५८० जणांनी आपली जीवनयात्रा संपविली असली तरी प्रशासनाने नियमाच्या कसोटीत४०० प्रकरणेच पात्र ठरविली आहेत.>पैठण तालुक्यातील हर्षी गावातून २३ जोडपी चाकण येथील औद्योगिक वसाहतीत काम शोधण्यासाठी गेले आहेत. तांडा बुदु्रकमधून १० जोडपी नगर येथील कुक्कुटपालन उद्योग,तर १५ जण चितेगाव येथे गेल्याचे सरपंच ज्ञानेश्वर चाबुकस्वार यांनी सांगितले.दावरवाडीतून ५० तर नांदरातून ३० जोडप्यांनी गाव सोडले आहे. स्थलांतराची ही आकडेवारी एकट्या पैठण तालुक्यातील आहे.अशीच परिस्थिती जालना, बीड, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यात आहे. बीडमधून दरवर्षी ऊसतोड मजुरांचे हंगामी स्थलांतर होते. मात्र, यंदा हंगामापूर्वीच स्थलांतर सुरु झाले.> ऐन पावसाळ्यात जलसाठे कोरडेमराठवाड्यातील ७९ मध्यम प्रकल्पात केवळ ४०.०३ टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा असून जायकवाडीत ५० टक्के तर माजलगाव धरणात ६ टक्के इतकेच पाणी उपलब्ध आहे. गतवर्षीच्या उन्हाळ्यात लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते. यंदाही तीच वेळ येऊ शकते. जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धरणनिहाय उपयुक्त जलसाठा असा...