शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

मराठवाड्यातील २५०० कुटुंबांचे स्थलांतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 06:07 IST

पावसाळ्यातील दोन महिने कोरडे गेल्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग गडद झाले

संजय जाधव।औरंगाबाद : पावसाळ्यातील दोन महिने कोरडे गेल्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग गडद झाले असून पैठण तालुक्यातून जवळपास २५०० कुटुंबांनी रोजी-रोटीच्या शोधात महानगरांकडे स्थलांतर केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.औरंगाबादसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत केवळ ३८ टक्के पाऊस झाला. पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सलग चाळीस दिवस पावसाचा थेंबही पडलेला नाही. हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असल्याने शेतकºयांची आशा ओलावली आहे.पैठण तालुक्यातील गेवराई (मर्दा) येथील २५ तरुण कामधंद्यासाठी बाहेर पडले असून, यंदा ४० टक्के गावकºयांना ऊसतोडीसाठी जावे लागणार असल्याचे येथील उपसरपंच महंमद पठाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खादगावमधून५० तरुणांनी, तर कडेठाण गावातील८० तरुणांनी मजुरीसाठी गाव सोडलेआहे. आडूळमधील २५० तरुणांनी स्थलांतर केले असून, ३०० महिला रोजंदारी कामासाठी शेंद्रा एमआयडीसी येथे जात असल्याची माहिती सरपंच श्रीपाल राठोड यांनी दिली.>साडेसात महिन्यांत५८० शेतकरी आत्महत्यामराठवाड्यात दुष्काळाचे सावट किती गडद झाले आहे, हे आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या आकडेवारीवरून दिसून येते. १ जानेवारी ते १३ आॅगस्टपर्यंत मराठवाड्यात ५८० शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले असून सर्वाधिक ११५ आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत.औरंगाबाद जिल्ह्यात७९, जालना ५३, परभणी ७३, हिंगोली ३३, लातूर ५६ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ७८शेतकºयांनी स्वत:ला संपविले. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे५८० जणांनी आपली जीवनयात्रा संपविली असली तरी प्रशासनाने नियमाच्या कसोटीत४०० प्रकरणेच पात्र ठरविली आहेत.>पैठण तालुक्यातील हर्षी गावातून २३ जोडपी चाकण येथील औद्योगिक वसाहतीत काम शोधण्यासाठी गेले आहेत. तांडा बुदु्रकमधून १० जोडपी नगर येथील कुक्कुटपालन उद्योग,तर १५ जण चितेगाव येथे गेल्याचे सरपंच ज्ञानेश्वर चाबुकस्वार यांनी सांगितले.दावरवाडीतून ५० तर नांदरातून ३० जोडप्यांनी गाव सोडले आहे. स्थलांतराची ही आकडेवारी एकट्या पैठण तालुक्यातील आहे.अशीच परिस्थिती जालना, बीड, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यात आहे. बीडमधून दरवर्षी ऊसतोड मजुरांचे हंगामी स्थलांतर होते. मात्र, यंदा हंगामापूर्वीच स्थलांतर सुरु झाले.> ऐन पावसाळ्यात जलसाठे कोरडेमराठवाड्यातील ७९ मध्यम प्रकल्पात केवळ ४०.०३ टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा असून जायकवाडीत ५० टक्के तर माजलगाव धरणात ६ टक्के इतकेच पाणी उपलब्ध आहे. गतवर्षीच्या उन्हाळ्यात लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते. यंदाही तीच वेळ येऊ शकते. जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धरणनिहाय उपयुक्त जलसाठा असा...