शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

औरंगाबाद जिल्ह्यात लाभार्थ्यांनी ४ महिन्यांत खोदल्या २५० विहिरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 20:13 IST

नव्याने अमलात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत निवडलेल्या ४६५ पैकी तब्बल २५० लाभार्थी शेतकऱ्यांनी अवघ्या चारच महिन्यांत विहिरींचे खोदकाम जवळपास पूर्ण केले आहे. 

ठळक मुद्देपात्र ९१२ अर्जांपैकी ४६५ लाभार्थ्यांची नवीन विहीर अनुदानासाठी निवड करण्यात आली.

औरंगाबाद : नव्याने अमलात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत निवडलेल्या ४६५ पैकी तब्बल २५० लाभार्थी शेतकऱ्यांनी अवघ्या चारच महिन्यांत विहिरींचे खोदकाम जवळपास पूर्ण केले आहे. 

यापूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत विशेष घटक योजना राबविली जायची. मागासवर्गीय शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत विहीर खोदण्यासाठी १ लाख रुपयांचे अनुदान दिले जायचे. १ लाखात विहिरीचे काम पूर्ण होत नसल्यामुळे विहिरींचे काम अर्धवट सोडून दिले जायचे. शासनाने गेल्या आर्थिक वर्षापासून अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी डॉ. आंबेडकरांच्या नावाने कृषी स्वावलंबन योजना आणली. या योजनेंतर्गत नवीन विहिरीच्या खोदकामासाठी २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार असून, विहीर खोदल्यानंतर संबंधित लाभार्थी शेतकऱ्याला वीज कनेक्शनसाठी १० हजार रुपये, विद्युत पंपासाठी २५ हजार रुपये, तुषार सिंचन संचासाठी २५ हजार रुपयेही मागणीनुसार दिले जाणार आहेत. पूर्वी विशेष घटक योजनेंतर्गत विहीर खोदण्यासाठी १ लाख रुपयांचे अनुदान घेतले असेल, अशा शेतकऱ्यांना विहीर दुरुस्ती किंवा खोलीकरणासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत मागील आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेकडे एकूण २ हजार ६०८ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर ८७२ जणांनी यापूर्वी लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले, तर ४६३ जणांनी योजनेचे निकष पूर्ण केलेले नव्हते. त्यामुळे हे अर्ज बाद करण्यात आले. पात्र ९१२ अर्जांपैकी ४६५ लाभार्थ्यांची नवीन विहीर अनुदानासाठी निवड करण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांच्या उपस्थितीत फेब्रुवारी महिन्यात लााभार्थ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली.

जिल्ह्यात कृषी विभागाचे तालुकानिहाय ९ कृषी अधिकारी व २० कृषी विस्तार अधिकारी कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना विहीर खोदण्याची आखणी करून देण्यात आली. त्याच अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांनी विहिरींचे काम पूर्ण केले आहे. काहींचे काम प्रगतिपथावर आहे.  विहिरींची कामे होतील, त्यानुसार मोजमाप पुस्तिकेत त्यांच्या नोंदीदेखील हेच अधिकारी घेतील व त्यानुसार त्यांना अनुदानाची रक्कम वाटप करत आहेत.

विहिरींना लागले पाणीयासंदर्भात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी १२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या योजनेच्या लाभार्थ्यांना नवीन विहिरींसाठी प्रति लाभार्थी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यानुसार ४६५ लाभार्थी निवडण्यात आले. यापैकी २६ लाभार्थ्यांनी तर विहिरींची सर्व कामे पूर्ण केली असून, विहिरींना पाणीदेखील बऱ्यापैकी लागले आहे.

योजनेची वैशिट्य

- २ लाख ५० हजार : अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी नवीन विहिरीच्या खोदकामासाठी अनुदान- १० हजार रु. शेतकऱ्यांना वीज कनेक्शनसाठी- २४ हजार रु. विहिरीत विद्युत पंप घेण्यासाठी- २५ हजार रु. मागणीनुसार तुषार सिंचन संचासाठीं 

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी