शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज परिसरात ५ महिन्यांत २५ जणांनी संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 19:57 IST

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये युवकांची संख्या मोठी 

ठळक मुद्देमहिन्याला सरासरी ५ आत्महत्यामानसिक ताणातून टोकाचे पाऊल

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : वाळूज महानगर परिसरात दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. कौटुंबिक कलह, आर्थिक चणचण, आजारपण आदी कारणांच्या ताणतणावातून चालू वर्षातील गत पाच महिन्यांत तब्बल २५ जणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविल्याची धक्कादायक बाब पोलीस ठाण्यातील नोंदीवरून समोर आली आहे. विशेष म्हणजे यात २० ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक असल्याने आत्महत्येचा विषय चिंतेचा बनला आहे. 

औद्योगिक क्षेत्रामुळे बहुभाषक व बहुसांस्कृतिक ओळख निर्माण झालेल्या वाळूज महानगरात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. याबरोबरच आता आत्महत्येचे प्रकार वाढल्याचे पोलीस दप्तरीच्या नोंदी दर्शवीत आहेत. या भागात बहुतांशी कामगार वर्ग वास्तव्यास आहे. कामानिमित्त घरदार सोडून आलेल्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आर्थिक चणचणीमुळे कौटुंबिक वाद, व्यसनाधीनता वाढते. शिवाय सहनशीलताही घटते. कौटुंबिक कलह, आर्थिक चणचण, आजारपण, दारू, भीती, पे्रमभंग आदी कारणांच्या मानसिक ताणतणावातून अल्पवयीन शाळकरी मुलांबरोबरच तरुण-तरुणी व महिला-पुरुष आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. 

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील बजाजनगर, वडगाव कोल्हाटी, जोगेश्वरी, रांजणगाव, साजापूर, विटावा, कमळापूर आदी भागांतील २५ जणांनी गळफास व विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या केली आहे. यात दोन अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.विशेष म्हणजे या आत्महत्या करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण २० ते ३० वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींचे आहे. मानसिक तणाव हे आत्महत्येमागचे मूळ कारण असल्याचे तज्ज्ञ व्यक्तींकडून सांगितले जाते. मानसिकदृष्ट्या खचलेल्या मनामुळे आत्महत्येचे सारखे विचार सतत येत असल्याने, अशा व्यक्तींची वेळीच दखल घेतली गेली नाही, तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. आजच्या युवा पिढीत सहनशीलतेचा अभाव आहे. 

महिन्याला सरासरी ५ आत्महत्याचालू वर्षात पहिल्या ५ महिन्यांतच १६ पुरुष व ९ महिला, अशा एकूण तब्बल २५ जणांनी आत्महत्या केली. यात दोन अल्पवयीन असून, तब्बल १४ जण २० ते ३० वर्षे या वयोगटातील आहेत. उर्वरित ३१ ते ४५ या वयोगटातील आहेत. मानसिक तणावातून दर महिन्याला सरासरी ५ जण आत्महत्या करून आपले जीवन संपवीत आहेत. शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांना तणावमुक्त ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी स्थानिक पातळीवर चर्चासत्र, व्याख्याने आयोजित करून तरुण वर्गाला मार्गदर्शन करणे आवश्यक झाले आहे. 

यांनी केली आत्महत्याआत्महत्या करणाऱ्यांत स्वप्नील काटकर, युवराज जगदाळे, गुंजन निशाद, रघुनाथ गाजरे, मीना जोगदंड, गणेश खुने, संजय पाटील, सुरेश वानखेडे, माया चव्हाण, पवन जंजाळ, गणेश सोनवणे, राजेंद्र निकम, संगीता राऊत, सुनीता टेकाळे, लक्ष्मीकांत धारासूरकर, रिजवान चाऊस, गणेश त्रिभुवन, अनुष्का डोळस, परमेश्वर मार्कंडे, मनीषा मोरे, शारदा ढवळे, सुनील भोटकर, विशाल व्यवहारे, शाहेदाबानू माजीद, पुंडलिक सोनाळे यांचा समावेश आहे.