शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

वाळूज परिसरात ५ महिन्यांत २५ जणांनी संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 19:57 IST

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये युवकांची संख्या मोठी 

ठळक मुद्देमहिन्याला सरासरी ५ आत्महत्यामानसिक ताणातून टोकाचे पाऊल

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : वाळूज महानगर परिसरात दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. कौटुंबिक कलह, आर्थिक चणचण, आजारपण आदी कारणांच्या ताणतणावातून चालू वर्षातील गत पाच महिन्यांत तब्बल २५ जणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविल्याची धक्कादायक बाब पोलीस ठाण्यातील नोंदीवरून समोर आली आहे. विशेष म्हणजे यात २० ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक असल्याने आत्महत्येचा विषय चिंतेचा बनला आहे. 

औद्योगिक क्षेत्रामुळे बहुभाषक व बहुसांस्कृतिक ओळख निर्माण झालेल्या वाळूज महानगरात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. याबरोबरच आता आत्महत्येचे प्रकार वाढल्याचे पोलीस दप्तरीच्या नोंदी दर्शवीत आहेत. या भागात बहुतांशी कामगार वर्ग वास्तव्यास आहे. कामानिमित्त घरदार सोडून आलेल्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आर्थिक चणचणीमुळे कौटुंबिक वाद, व्यसनाधीनता वाढते. शिवाय सहनशीलताही घटते. कौटुंबिक कलह, आर्थिक चणचण, आजारपण, दारू, भीती, पे्रमभंग आदी कारणांच्या मानसिक ताणतणावातून अल्पवयीन शाळकरी मुलांबरोबरच तरुण-तरुणी व महिला-पुरुष आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. 

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील बजाजनगर, वडगाव कोल्हाटी, जोगेश्वरी, रांजणगाव, साजापूर, विटावा, कमळापूर आदी भागांतील २५ जणांनी गळफास व विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या केली आहे. यात दोन अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.विशेष म्हणजे या आत्महत्या करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण २० ते ३० वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींचे आहे. मानसिक तणाव हे आत्महत्येमागचे मूळ कारण असल्याचे तज्ज्ञ व्यक्तींकडून सांगितले जाते. मानसिकदृष्ट्या खचलेल्या मनामुळे आत्महत्येचे सारखे विचार सतत येत असल्याने, अशा व्यक्तींची वेळीच दखल घेतली गेली नाही, तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. आजच्या युवा पिढीत सहनशीलतेचा अभाव आहे. 

महिन्याला सरासरी ५ आत्महत्याचालू वर्षात पहिल्या ५ महिन्यांतच १६ पुरुष व ९ महिला, अशा एकूण तब्बल २५ जणांनी आत्महत्या केली. यात दोन अल्पवयीन असून, तब्बल १४ जण २० ते ३० वर्षे या वयोगटातील आहेत. उर्वरित ३१ ते ४५ या वयोगटातील आहेत. मानसिक तणावातून दर महिन्याला सरासरी ५ जण आत्महत्या करून आपले जीवन संपवीत आहेत. शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांना तणावमुक्त ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी स्थानिक पातळीवर चर्चासत्र, व्याख्याने आयोजित करून तरुण वर्गाला मार्गदर्शन करणे आवश्यक झाले आहे. 

यांनी केली आत्महत्याआत्महत्या करणाऱ्यांत स्वप्नील काटकर, युवराज जगदाळे, गुंजन निशाद, रघुनाथ गाजरे, मीना जोगदंड, गणेश खुने, संजय पाटील, सुरेश वानखेडे, माया चव्हाण, पवन जंजाळ, गणेश सोनवणे, राजेंद्र निकम, संगीता राऊत, सुनीता टेकाळे, लक्ष्मीकांत धारासूरकर, रिजवान चाऊस, गणेश त्रिभुवन, अनुष्का डोळस, परमेश्वर मार्कंडे, मनीषा मोरे, शारदा ढवळे, सुनील भोटकर, विशाल व्यवहारे, शाहेदाबानू माजीद, पुंडलिक सोनाळे यांचा समावेश आहे.