शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

२५ लाखांचा चेंडू आता सरकारच्या कोर्टात

By admin | Updated: July 21, 2016 01:19 IST

औरंगाबाद : पूर्व विदर्भातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात आणण्याचा अहवाल तयार करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मागणाऱ्या संस्थेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे.

औरंगाबाद : पूर्व विदर्भातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात आणण्याचा अहवाल तयार करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मागणाऱ्या संस्थेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. संस्थेला निधी द्यावा, अशी शिफारस करण्याचे मराठवाडा विकास मंडळाने टाळले आहे.पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांतून वाहणाऱ्या वैनगंगा आणि वर्धा या नद्यांचे अतिरिक्त पाणी दुष्काळप्रवण मराठवाड्यात आणण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून देण्याची तयारी नागपूरच्या सेंटर फॉर रुरल वेल्फेअर या स्वयंसेवी संस्थेने दाखविली होती. अहवाल तयार करण्यासाठी अभियंते, तंत्रज्ञांची मदत घ्यावी लागणार असल्याने त्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याची मागणी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. सतीश चव्हाण यांनी मराठवाडा विकास मंडळाकडे केली होती.या संस्थेला ही रक्कम देण्यासाठी मंत्रालयातून दबाव आणला जात होता. ‘लोकमत’ने याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची मराठवाडा विकास मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.नागपूरची संस्था जर मराठवाड्यात पाणी आणण्यास पुढाकार घेत असेल, तर २५ लाखांऐवजी ५ लाख रुपयांपर्यंतचा निधी देण्यास हरकत नसावी, अशी भूमिका जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांनी मांडली; परंतु मंडळाचे अध्यक्ष आणि विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी तूर्त हा विषय स्थगित ठेवण्याच्या सूचना केल्या. या संस्थेला निधी देण्याची शिफारस करण्याचेही बैठकीत टाळण्यात आले. संस्थेचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीस्तव राज्य सरकारकडे सादर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.शासन निर्णय घेईलपूर्व विदर्भातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी अहवाल तयार करून देण्याची तयारी नागपूरच्या संस्थेने दाखविली आहे. त्यासाठी त्यांनी २५ लाखांची मागणी केली आहे. हा विषय मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागाशी संबंधित आहे. त्यामुळे संस्थेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून, शासनच याबाबत निर्णय घेईल.- डॉ.उमाकांत दांगट, विभागीय आयुक्त