शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

२५ लाखांचा चेंडू आता सरकारच्या कोर्टात

By admin | Updated: July 21, 2016 01:19 IST

औरंगाबाद : पूर्व विदर्भातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात आणण्याचा अहवाल तयार करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मागणाऱ्या संस्थेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे.

औरंगाबाद : पूर्व विदर्भातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात आणण्याचा अहवाल तयार करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मागणाऱ्या संस्थेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. संस्थेला निधी द्यावा, अशी शिफारस करण्याचे मराठवाडा विकास मंडळाने टाळले आहे.पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांतून वाहणाऱ्या वैनगंगा आणि वर्धा या नद्यांचे अतिरिक्त पाणी दुष्काळप्रवण मराठवाड्यात आणण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून देण्याची तयारी नागपूरच्या सेंटर फॉर रुरल वेल्फेअर या स्वयंसेवी संस्थेने दाखविली होती. अहवाल तयार करण्यासाठी अभियंते, तंत्रज्ञांची मदत घ्यावी लागणार असल्याने त्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याची मागणी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. सतीश चव्हाण यांनी मराठवाडा विकास मंडळाकडे केली होती.या संस्थेला ही रक्कम देण्यासाठी मंत्रालयातून दबाव आणला जात होता. ‘लोकमत’ने याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची मराठवाडा विकास मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.नागपूरची संस्था जर मराठवाड्यात पाणी आणण्यास पुढाकार घेत असेल, तर २५ लाखांऐवजी ५ लाख रुपयांपर्यंतचा निधी देण्यास हरकत नसावी, अशी भूमिका जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांनी मांडली; परंतु मंडळाचे अध्यक्ष आणि विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी तूर्त हा विषय स्थगित ठेवण्याच्या सूचना केल्या. या संस्थेला निधी देण्याची शिफारस करण्याचेही बैठकीत टाळण्यात आले. संस्थेचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीस्तव राज्य सरकारकडे सादर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.शासन निर्णय घेईलपूर्व विदर्भातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी अहवाल तयार करून देण्याची तयारी नागपूरच्या संस्थेने दाखविली आहे. त्यासाठी त्यांनी २५ लाखांची मागणी केली आहे. हा विषय मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागाशी संबंधित आहे. त्यामुळे संस्थेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून, शासनच याबाबत निर्णय घेईल.- डॉ.उमाकांत दांगट, विभागीय आयुक्त