शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

औरंगाबादेत २५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

By admin | Updated: May 17, 2014 01:15 IST

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील २७ पैकी २५ उमेदवारांची अनामत (डिपॉझिट) जप्त झाली आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील २७ पैकी २५ उमेदवारांची अनामत (डिपॉझिट) जप्त झाली आहे. यामध्ये आम आदमी पक्षाचे सुभाष लोमटे, बसपाचे इंद्रकुमार जेवरीकर आणि समाजवादी पार्टीचे अ‍ॅड. सदाशिव गायके यांचाही समावेश आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात २७ उमेदवारांनी मतदारांचा कौल मागितला होता. मुख्य आणि थेट लढत मात्र, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे नितीन पाटील यांच्यातच झाली. मतदारसंघात ९ लाख ८२ हजार मतदारांनी मतदान (६२ टक्के) केले. उमेदवाराने वैध मतांच्या १२.५ टक्क्यांपेक्षा कमी मते घेतल्यास त्याची अनामत रक्कम जप्त होते. त्यानुसार औरंगाबाद मतदारसंघात अनामत रक्कम वाचविण्यासाठी मतांचा हा कोटा १ लाख १० हजार इतका ठरला. चंद्रकांत खैरे आणि नितीन पाटील हेच केवळ लाखाच्या वर मते घेऊ शकले. त्यामुळे इतर २५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. निवडणुकीच्या रिंगणात समाजवादी पार्टी, बसपा, बहुजन मुक्ती पार्टी, आम आदमी पार्टी, आंबेडकर नॅशनल काँग्रेस, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, गरीब आदमी पार्टी, वेल्फेअर पार्टी यांच्या उमेदवारांबरोबरच १७ अपक्ष उमेदवारांनीही मतदारांचा कौल मागितला होता. आम आदमी पक्षाचे उमेदवार सुभाष लोमटे यांना ११,९६५ तर बसपाचे उमेदवार जेवरीकर यांना ३७,३८७ मते मिळाली. उर्वरित उमेदवारांना १० हजारांचाही पल्ला गाठता आला नाही. लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने यावेळी खुल्या प्रवर्गातील उमेदवार असेल तर २५ हजार रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवार असेल तर साडेबारा हजार रुपये एवढी अनामत रक्कम ठेवली होती. २००९ मध्ये १९ जण २००९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ पैकी १९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. तेव्हा एकूण ७ लाख १२ हजार मतदान झाले होते. डिपॉझिट वाचविण्यासाठी किमान ९० हजार मते मिळविणे आवश्यक होते. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे उत्तमसिंह पवार आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज वगळता इतरांना तेवढी मते मिळविता आली नव्हती. खैरे यांना २ लाख ५५ हजार, पवार यांना २ लाख २२ हजार आणि शांतीगिरीजी महाराजांना १ लाख ४८ हजार मते मिळाली होती.