शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

औरंगाबाद जिल्ह्यात २४९ व्यक्तींना एचआयव्हीची लागण; सात गरोदर मातांचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 19:52 IST

रुग्णांच्या संख्येत काही वर्षांच्या तुलनेत घट झाल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मंगेश गायकवाड यांनी सांगितले.

औरंगाबाद : जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथकाच्या अधिपत्याखालील जिल्ह्यात २३ आयसीटीसी केंद्रांत एप्रिल ते आॅगस्टदरम्यान ३३ हजार ४४६ जणांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. यात २४९ व्यक्तींना एचआयव्हीची लागण झाल्याचे निदर्शनास आले. रुग्णांच्या संख्येत काही वर्षांच्या तुलनेत घट झाल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मंगेश गायकवाड यांनी सांगितले.

जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण समिती व एचआयव्ही, टीबी समन्वय समितीची त्रैमासिक आढावा बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी मंगेश गायकवाड यांनी ही माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक डॉ.जमादार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. लड्डा, डॉ. जी. एम. कुडलीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गणेश कल्याणकर, विजय देशमुख, डॉ. एम. टी. साळवे, संजय पवार, ज्योती वाडेकर यांची उपस्थिती होती.

पाच महिन्यांत ३१ हजार ९१८ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ गरोदर मातांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले. जिल्ह्यात ५ हजार ३९१ रुग्ण एआरटी केंद्रांत औषधोपचार घेत असल्याची माहिती मंगेश गायकवाड यांनी दिली. 

रुग्णांचे केले जाते मोफत समुपदेशनडॉ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले, घाटी रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, मनपा रुग्णालय, मोबाईल व्हॅन, अशा २३ आयसीटीसी केंद्रांत आणि ५० प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर माता, सामान्य रुग्ण, संशयित क्षयरोगी व जोखीम गटातील व्यक्तींची मोफत एचआयव्ही रक्तचाचणी व समुपदेशन केले जाते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय