शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

२४६ ग्रा.पं.त मग्रारोहयो ठप्प

By admin | Updated: June 22, 2017 23:23 IST

हिंगोली : जिल्ह्यात२४६ ग्रामपंचायतींनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत छदामही खर्च केला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात२४६ ग्रामपंचायतींनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत छदामही खर्च केला नाही. ग्रामपंचायतींचा १ लाख ७६ हजार कामांचा आराखडा प्रस्तावित केला असला तरीही प्रशासकीय औदासीन्य आणि मजुरांअभावी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनतेही एकही काम पूर्ण नाही.हिंगोली जिल्ह्यात ५६९ ग्रामपंचायती आहेत. मात्र अनेक ग्रामपंचायतींची मग्रारोहयोच्या कामांकडे पाठ आहे. विशेषत: वसमत तालुक्यात तर ८९ टक्के ग्रामपंचायती ही कामेच करायला तयार नाहीत. यात औंढ्यात १0२ पैकी २३, वसमतला ११९ पैकी १0६, हिंगोलीत ११ पैकी २७, कळमनुरीत १२५ पैकी ७३, सेनगावात ११२ पैकी १७ ग्रामपंचायतींचा खर्च शून्य आहे.एकीकडे मग्रारोहयोत सिंचन विहिरी, शेततळे ही कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधी कायम बोंब ठोकत असले तरीही अधिकाऱ्यांना त्याचे काहीच गांभिर्य नाही. विशेष म्हणजे समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत जिल्ह्याला ११ प्रकारच्या कामांसाठी भरघोस उद्दिष्ट मिळाले. कामांचा मात्र पत्ता नाही. यात सिंचन विहिरींचे १0 हजारांचे उद्दिष्ट असून त्यापैकी ५९६ कामे सुरू झाली आहेत. विहिरींचे ८६८५ प्रस्ताव आले अन् मान्यता २२११ प्रस्तावांना तर प्रशासकीय मान्यता ११६७ जणांना मिळाली. सुरू झालेल्या कामांनाही मे महिन्यात हात लावला. ही कामे पावसाळ्यात पूर्ण कशी करायची? हा प्रश्न आहे.यात औंढा-१३0, वसमत-२३, कळमनुरी-९१, हिंगोली-२२२, सेनगाव-१३0 कामांचा समावेश आहे.शेततळ्यांच्या तर कामांनाच सुरुवात नाही. मागेल त्याला शेततळेमध्येच जी कामे झाली ती झाली. यात ५६६0 एवढे उद्दिष्ट आहे. २५६ प्रस्ताव आल्यावर ६४ ला तांत्रिक त्यापैकी ३५ ला प्रशासकीय मान्यता दिली. एकही काम सुरू नाही. भूसंजीवनही व्हर्मी कंपोस्टिंगच्या २२00 च्या उद्दिष्टापोटी ६२५ प्रस्ताव आले. ३३७ ला तांत्रिक व त्यापैकी १८९ ला प्रशासकीय मान्यता दिली. कामे ठप्प आहेत. तेवढेच उद्दिष्ट असलेल्या नाडेप कंपोस्टिंगचीही हीच बोंब आहे. ४0७ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता असूनही काम सुरू नाही. फळबागांचे १८00 हेक्टरचे उद्दिष्ट आहे. ७५ चे प्रस्ताव आले. २४ ला तांत्रिक व त्यापैकी ९ ला प्रशासकीय मान्यता दिली. ही कामे सुरू झाली. निर्मल शौचालय व शोषखड्ड्यांचे ४२00 एवढे उद्दिष्ट आहे. यात २८ कामे सुरू झाली आहेत. समृद्ध गाव तलावांचा ११00 एवढे उद्दिष्ट असूनही प्रस्तावच नाही. रोपवाटिकेचे २२ लाख रोपांचे उद्दिष्ट असून २६ कामे सुरू आहेत. नंदनवन वृक्ष लागवडीची २ कामे होत आहेत. तर समृद्ध ग्राम योजनेत १६00 एवढे उद्दिष्ट असताना ४४१ प्रस्ताव आले. तांत्रिक मान्यतेनंतर प्रक्रिया ठप्प आहे.