शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

२४६ ग्रा.पं.त मग्रारोहयो ठप्प

By admin | Updated: June 22, 2017 23:23 IST

हिंगोली : जिल्ह्यात२४६ ग्रामपंचायतींनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत छदामही खर्च केला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात२४६ ग्रामपंचायतींनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत छदामही खर्च केला नाही. ग्रामपंचायतींचा १ लाख ७६ हजार कामांचा आराखडा प्रस्तावित केला असला तरीही प्रशासकीय औदासीन्य आणि मजुरांअभावी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनतेही एकही काम पूर्ण नाही.हिंगोली जिल्ह्यात ५६९ ग्रामपंचायती आहेत. मात्र अनेक ग्रामपंचायतींची मग्रारोहयोच्या कामांकडे पाठ आहे. विशेषत: वसमत तालुक्यात तर ८९ टक्के ग्रामपंचायती ही कामेच करायला तयार नाहीत. यात औंढ्यात १0२ पैकी २३, वसमतला ११९ पैकी १0६, हिंगोलीत ११ पैकी २७, कळमनुरीत १२५ पैकी ७३, सेनगावात ११२ पैकी १७ ग्रामपंचायतींचा खर्च शून्य आहे.एकीकडे मग्रारोहयोत सिंचन विहिरी, शेततळे ही कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधी कायम बोंब ठोकत असले तरीही अधिकाऱ्यांना त्याचे काहीच गांभिर्य नाही. विशेष म्हणजे समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत जिल्ह्याला ११ प्रकारच्या कामांसाठी भरघोस उद्दिष्ट मिळाले. कामांचा मात्र पत्ता नाही. यात सिंचन विहिरींचे १0 हजारांचे उद्दिष्ट असून त्यापैकी ५९६ कामे सुरू झाली आहेत. विहिरींचे ८६८५ प्रस्ताव आले अन् मान्यता २२११ प्रस्तावांना तर प्रशासकीय मान्यता ११६७ जणांना मिळाली. सुरू झालेल्या कामांनाही मे महिन्यात हात लावला. ही कामे पावसाळ्यात पूर्ण कशी करायची? हा प्रश्न आहे.यात औंढा-१३0, वसमत-२३, कळमनुरी-९१, हिंगोली-२२२, सेनगाव-१३0 कामांचा समावेश आहे.शेततळ्यांच्या तर कामांनाच सुरुवात नाही. मागेल त्याला शेततळेमध्येच जी कामे झाली ती झाली. यात ५६६0 एवढे उद्दिष्ट आहे. २५६ प्रस्ताव आल्यावर ६४ ला तांत्रिक त्यापैकी ३५ ला प्रशासकीय मान्यता दिली. एकही काम सुरू नाही. भूसंजीवनही व्हर्मी कंपोस्टिंगच्या २२00 च्या उद्दिष्टापोटी ६२५ प्रस्ताव आले. ३३७ ला तांत्रिक व त्यापैकी १८९ ला प्रशासकीय मान्यता दिली. कामे ठप्प आहेत. तेवढेच उद्दिष्ट असलेल्या नाडेप कंपोस्टिंगचीही हीच बोंब आहे. ४0७ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता असूनही काम सुरू नाही. फळबागांचे १८00 हेक्टरचे उद्दिष्ट आहे. ७५ चे प्रस्ताव आले. २४ ला तांत्रिक व त्यापैकी ९ ला प्रशासकीय मान्यता दिली. ही कामे सुरू झाली. निर्मल शौचालय व शोषखड्ड्यांचे ४२00 एवढे उद्दिष्ट आहे. यात २८ कामे सुरू झाली आहेत. समृद्ध गाव तलावांचा ११00 एवढे उद्दिष्ट असूनही प्रस्तावच नाही. रोपवाटिकेचे २२ लाख रोपांचे उद्दिष्ट असून २६ कामे सुरू आहेत. नंदनवन वृक्ष लागवडीची २ कामे होत आहेत. तर समृद्ध ग्राम योजनेत १६00 एवढे उद्दिष्ट असताना ४४१ प्रस्ताव आले. तांत्रिक मान्यतेनंतर प्रक्रिया ठप्प आहे.