शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

२४६ ग्रा.पं.त मग्रारोहयो ठप्प

By admin | Updated: June 22, 2017 23:23 IST

हिंगोली : जिल्ह्यात२४६ ग्रामपंचायतींनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत छदामही खर्च केला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात२४६ ग्रामपंचायतींनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत छदामही खर्च केला नाही. ग्रामपंचायतींचा १ लाख ७६ हजार कामांचा आराखडा प्रस्तावित केला असला तरीही प्रशासकीय औदासीन्य आणि मजुरांअभावी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनतेही एकही काम पूर्ण नाही.हिंगोली जिल्ह्यात ५६९ ग्रामपंचायती आहेत. मात्र अनेक ग्रामपंचायतींची मग्रारोहयोच्या कामांकडे पाठ आहे. विशेषत: वसमत तालुक्यात तर ८९ टक्के ग्रामपंचायती ही कामेच करायला तयार नाहीत. यात औंढ्यात १0२ पैकी २३, वसमतला ११९ पैकी १0६, हिंगोलीत ११ पैकी २७, कळमनुरीत १२५ पैकी ७३, सेनगावात ११२ पैकी १७ ग्रामपंचायतींचा खर्च शून्य आहे.एकीकडे मग्रारोहयोत सिंचन विहिरी, शेततळे ही कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधी कायम बोंब ठोकत असले तरीही अधिकाऱ्यांना त्याचे काहीच गांभिर्य नाही. विशेष म्हणजे समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत जिल्ह्याला ११ प्रकारच्या कामांसाठी भरघोस उद्दिष्ट मिळाले. कामांचा मात्र पत्ता नाही. यात सिंचन विहिरींचे १0 हजारांचे उद्दिष्ट असून त्यापैकी ५९६ कामे सुरू झाली आहेत. विहिरींचे ८६८५ प्रस्ताव आले अन् मान्यता २२११ प्रस्तावांना तर प्रशासकीय मान्यता ११६७ जणांना मिळाली. सुरू झालेल्या कामांनाही मे महिन्यात हात लावला. ही कामे पावसाळ्यात पूर्ण कशी करायची? हा प्रश्न आहे.यात औंढा-१३0, वसमत-२३, कळमनुरी-९१, हिंगोली-२२२, सेनगाव-१३0 कामांचा समावेश आहे.शेततळ्यांच्या तर कामांनाच सुरुवात नाही. मागेल त्याला शेततळेमध्येच जी कामे झाली ती झाली. यात ५६६0 एवढे उद्दिष्ट आहे. २५६ प्रस्ताव आल्यावर ६४ ला तांत्रिक त्यापैकी ३५ ला प्रशासकीय मान्यता दिली. एकही काम सुरू नाही. भूसंजीवनही व्हर्मी कंपोस्टिंगच्या २२00 च्या उद्दिष्टापोटी ६२५ प्रस्ताव आले. ३३७ ला तांत्रिक व त्यापैकी १८९ ला प्रशासकीय मान्यता दिली. कामे ठप्प आहेत. तेवढेच उद्दिष्ट असलेल्या नाडेप कंपोस्टिंगचीही हीच बोंब आहे. ४0७ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता असूनही काम सुरू नाही. फळबागांचे १८00 हेक्टरचे उद्दिष्ट आहे. ७५ चे प्रस्ताव आले. २४ ला तांत्रिक व त्यापैकी ९ ला प्रशासकीय मान्यता दिली. ही कामे सुरू झाली. निर्मल शौचालय व शोषखड्ड्यांचे ४२00 एवढे उद्दिष्ट आहे. यात २८ कामे सुरू झाली आहेत. समृद्ध गाव तलावांचा ११00 एवढे उद्दिष्ट असूनही प्रस्तावच नाही. रोपवाटिकेचे २२ लाख रोपांचे उद्दिष्ट असून २६ कामे सुरू आहेत. नंदनवन वृक्ष लागवडीची २ कामे होत आहेत. तर समृद्ध ग्राम योजनेत १६00 एवढे उद्दिष्ट असताना ४४१ प्रस्ताव आले. तांत्रिक मान्यतेनंतर प्रक्रिया ठप्प आहे.