शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

देशात २४ हजार, तर राज्यात २,५८० गावे ‘ऑऊट ऑफ कव्हरेज’

By संतोष हिरेमठ | Updated: July 29, 2023 20:45 IST

गावांमध्ये ‘बीएसएनएल’ देणार ‘४-जी’ सेवा : मनुष्यबळासाठी ‘आऊटसोर्सिंग’चा पर्याय

छत्रपती संभाजीनगर : जगभरात ‘५-जी’ चर्चा होत असताना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशातील २४ हजार आणि महाराष्ट्रातील तब्बल २,५८० गावांपर्यंत अद्यापही मोबाइलची रेंज पोहोचलेली नाही. या गावांमध्ये ‘बीएसएनएल’ ‘४-जी’ सेवा देणार आहे. त्यादृष्टीने डिसेंबरअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती ‘बीएसएनएल’चे मुख्य महाव्यवस्थापक रोहित शर्मा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाल्यानंतर रोहित शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी औरंगाबाद विभागाचे महाव्यवस्थापक संजयकुमार यांची उपस्थिती होती. रोहित शर्मा म्हणाले, जेही तंत्रज्ञान वापरले जाईल, ते भारतातच विकसित झालेले असावे, असे पंतप्रधानांचे व्हिजन आहे. त्यादृष्टीने ४-जी टेक्नाॅलाॅजी विकसित केले. मार्चमध्ये भारत पाचवा देश झाला, ज्याच्याकडे स्वत:ची ४-जी टेक्नाॅलाॅजी आहे. टीसीएसने तंत्रज्ञान विकसित केले असून, त्यांची सिस्टम चंडीगड येथे लावण्यात आली. त्यानंतर पंजाबसाठी २०० बेस ट्रान्सिवर स्टेशन (बीटीएस) ऑर्डर दिली आणि त्यांचा मार्चमध्ये पुरवठाही झाला. आता देशभरासाठी एक लाख ‘बीटीएस’ची ऑर्डर देण्यात आलेली आहे. त्यात महाराष्ट्रासाठी १० हजार असतील. सप्टेंबरपासून ते मिळण्यास सुरुवात होतील. महाराष्ट्रातील टाॅवरसाठी २ हजार बॅटरी उपलब्ध होणार आहेत. ‘बीएसएनएल’मध्ये सध्या मनुष्यबळासाठी ‘आउटसोर्सिंग’चाच पर्याय असल्याचे सांगण्यात आले.

जेथे कोणाचेही सिग्नल नाही, तेथे ‘बीएसएनएल’ शासनाने २०२२ मध्ये ‘अन् कव्हर्ड व्हिलेज’ हा प्राेजेक्ट हाती घेण्यात आला. ज्या गावांत कोणाचेही सिग्नल नाही, तेथे ‘बीएसएनएल’ ४-जी सेवा देईल. देशात अशी २४ हजार गावे आहेत. महाराष्ट्रातील २८०० गावांत ४-जी सेवा दिली जाईल. यातील २२५ गावांत २-जी, ३-जी सेवा आहे, तर नवीन २,५८० गावे असून, तेथे कोणाचेही सिग्नल नाही. तेथे जमीन घेऊन ‘बीटीएस’ लावण्यात येईल, असे रोहित शर्मा म्हणाले.

४-जी हे ५-जी सारखेच, पुण्यात ‘मोबाइल कोअर नेटवर्क’४-जी हे ५-जी सारखेच आहे. पुण्यात ‘मोबाइल कोअर नेटवर्क’ येत आहे. यातून पूर्ण झोन नियंत्रित करता येतो. औरंगाबाद जिल्ह्यातील या गावांत येणार ‘रेंज’ औरंगाबाद जिल्ह्यातील बेलखेडा तांडा, दस्तापूर, दुधमल, मालेगाव लोखंडी, पोफळा, जळगाव घाट, बोडखा, आडगाव माळी, तेरवाडी, लिंगदरी, कानकोरा, पुरणवाडी, गोकुळवाडी या गावांमध्ये लवकरच ४-जी रेंज येणार आहे.

टॅग्स :MobileमोबाइलAurangabadऔरंगाबाद