शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

देशात २४ हजार, तर राज्यात २,५८० गावे ‘ऑऊट ऑफ कव्हरेज’

By संतोष हिरेमठ | Updated: July 29, 2023 20:45 IST

गावांमध्ये ‘बीएसएनएल’ देणार ‘४-जी’ सेवा : मनुष्यबळासाठी ‘आऊटसोर्सिंग’चा पर्याय

छत्रपती संभाजीनगर : जगभरात ‘५-जी’ चर्चा होत असताना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशातील २४ हजार आणि महाराष्ट्रातील तब्बल २,५८० गावांपर्यंत अद्यापही मोबाइलची रेंज पोहोचलेली नाही. या गावांमध्ये ‘बीएसएनएल’ ‘४-जी’ सेवा देणार आहे. त्यादृष्टीने डिसेंबरअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती ‘बीएसएनएल’चे मुख्य महाव्यवस्थापक रोहित शर्मा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाल्यानंतर रोहित शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी औरंगाबाद विभागाचे महाव्यवस्थापक संजयकुमार यांची उपस्थिती होती. रोहित शर्मा म्हणाले, जेही तंत्रज्ञान वापरले जाईल, ते भारतातच विकसित झालेले असावे, असे पंतप्रधानांचे व्हिजन आहे. त्यादृष्टीने ४-जी टेक्नाॅलाॅजी विकसित केले. मार्चमध्ये भारत पाचवा देश झाला, ज्याच्याकडे स्वत:ची ४-जी टेक्नाॅलाॅजी आहे. टीसीएसने तंत्रज्ञान विकसित केले असून, त्यांची सिस्टम चंडीगड येथे लावण्यात आली. त्यानंतर पंजाबसाठी २०० बेस ट्रान्सिवर स्टेशन (बीटीएस) ऑर्डर दिली आणि त्यांचा मार्चमध्ये पुरवठाही झाला. आता देशभरासाठी एक लाख ‘बीटीएस’ची ऑर्डर देण्यात आलेली आहे. त्यात महाराष्ट्रासाठी १० हजार असतील. सप्टेंबरपासून ते मिळण्यास सुरुवात होतील. महाराष्ट्रातील टाॅवरसाठी २ हजार बॅटरी उपलब्ध होणार आहेत. ‘बीएसएनएल’मध्ये सध्या मनुष्यबळासाठी ‘आउटसोर्सिंग’चाच पर्याय असल्याचे सांगण्यात आले.

जेथे कोणाचेही सिग्नल नाही, तेथे ‘बीएसएनएल’ शासनाने २०२२ मध्ये ‘अन् कव्हर्ड व्हिलेज’ हा प्राेजेक्ट हाती घेण्यात आला. ज्या गावांत कोणाचेही सिग्नल नाही, तेथे ‘बीएसएनएल’ ४-जी सेवा देईल. देशात अशी २४ हजार गावे आहेत. महाराष्ट्रातील २८०० गावांत ४-जी सेवा दिली जाईल. यातील २२५ गावांत २-जी, ३-जी सेवा आहे, तर नवीन २,५८० गावे असून, तेथे कोणाचेही सिग्नल नाही. तेथे जमीन घेऊन ‘बीटीएस’ लावण्यात येईल, असे रोहित शर्मा म्हणाले.

४-जी हे ५-जी सारखेच, पुण्यात ‘मोबाइल कोअर नेटवर्क’४-जी हे ५-जी सारखेच आहे. पुण्यात ‘मोबाइल कोअर नेटवर्क’ येत आहे. यातून पूर्ण झोन नियंत्रित करता येतो. औरंगाबाद जिल्ह्यातील या गावांत येणार ‘रेंज’ औरंगाबाद जिल्ह्यातील बेलखेडा तांडा, दस्तापूर, दुधमल, मालेगाव लोखंडी, पोफळा, जळगाव घाट, बोडखा, आडगाव माळी, तेरवाडी, लिंगदरी, कानकोरा, पुरणवाडी, गोकुळवाडी या गावांमध्ये लवकरच ४-जी रेंज येणार आहे.

टॅग्स :MobileमोबाइलAurangabadऔरंगाबाद